तळेगाव (श्या़पंत़) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्या व समस्याकडे शासनाचे लक्ष वेधण्याकरिता आर्वी विधानसभा मतदार संघाचे आमदार अमर काळे यांनी शुक्रवारी ५ डिसेंबर रोजी आर्वी ते नागपूर विधानभवनावर पायदळ मोर्चा काढला. सोमवार ८ डिसेंबर रोजी ही पदयात्रा विधानभवनावर धडकणार आहे़पिकांची आणेवारी ५० टक्क्यापेक्षा कमी असावी़, सोयाबीनचा योग्य मोबदला मिळावा़, वन्यप्राण्यांपासून होणाऱ्या शेती नुकसानीसाठी बाबत उपाययोजना, प्रकल्प ग्रस्तांच्या समस्या, बेरोजगारी, आदी मागण्यांवर तोडगा काढण्याकरिता ही पदयात्रा शुक्रवारी सकाळी ११ वाजता आर्वीवरून निघाली. दुपारी ३ वाजता ही पदयात्रा तळेगाव(श्या.प.) येथे पोहोचल्यावर पदयात्रेचे आणि आमदार अमर काळे यांचे स्वागत करण्यात आले़ निसर्गाच्या अवकृपेने आर्वी, आष्टी, कारंजा या तीनही तालुक्यांत दृष्काळाने थैमान घातले. सोयाबीन पीक हातचे गेले तर कपाशी पिकावर लाल्या रोगाचे अतिक्रमण होऊन खरीप व रब्बी हे दोन्ही हंगाम शेतकऱ्यांच्या हातून गेले़ त्यातही कमी भावात सोयाबीन खरेदी, कापसाला योग्य भाव नाही, अशी स्थिती आहे़ राज्य सरकारने अद्याप कापूस खरेदी केंद्र सुरू केली नाही़ खासगी व सीसीआयची खरेदी ४०५० पर्यंत सुरू आहे; पण हा भाव शेतकऱ्यांना खर्च बघता परवडणारा नाही़ ही दाहकता प्रशासनाला कळावी यासाठी पदयात्रा काढण्यात आली. आष्टी तालुक्यातील शेतकरी, तरूण यात सहभागी आहेत. सत्याग्रही घाटाच्या पायथ्याशी असलेल्या बाहुबली मंदिरामध्ये सर्वांच्या जेवणाची होती. त्यानंतर पदयात्रा सारवाडी, कारंजा कडे रवाना झाली़(वार्ताहर)
शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी आर्वी आमदाराची विधान भवनावर पदयात्रा सुरू
By admin | Updated: December 6, 2014 00:24 IST