शहरं
Join us  
Trending Stories
1
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
2
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
3
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
4
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
5
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
6
"पाच टप्प्यांतच भाजपा तीनशेपार, तर काँग्रेस…’’,  अमित शाहांचा मोठा दावा 
7
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई
8
अपचनाच्या त्रासापासून आता होईल सुटका; जेवताना 'ही' 3 पथ्यं नक्की पाळा
9
"माझ्या संयमाची आणखी परीक्षा घेऊ नका, लवकरात लवकर ..." एचडी देवेगौडांचा प्रज्वल रेवण्णा यांना इशारा
10
ना गळ्यात 'भाजपा'चा गमछा, ना भाषणात मोदींचा उल्लेख... Maneka Gandhi यांच्या प्रचारसभेत दिसला Varun Gandhi यांच्यातील बदल
11
Narendra Modi : "काँग्रेसचं सरकार 7 जन्मात येणार नाही; गाय दूध देत नाही तोवर तूप खाण्यासाठी..."
12
"नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे पुणे अपघातावर गप्प का आहेत?" नितेश राणेंचा सवाल
13
"4 जून रोजी भरपूर पाणी जवळ ठेवा...", प्रशांत किशोर यांचा टीकाकारांवर निशाणा
14
PHOTOS : लोकसभा निवडणुकीत कलाकारांची एन्ट्री; म्हणाले, 'अब की पार 400 पार' निश्चित
15
IPL क्वालिफायर २ अन् फायनल लढतीत पावसाचा बाधा; सामना रद्द झाल्यास कोण जिंकणार ट्रॉफी?
16
T20 WC मध्ये टीम इंडियाला घाबरू नका, त्यांना १० वर्षात...; इंग्लंडच्या माजी खेळाडूने उगाच डिवचले
17
"कुणी कितीही बोललं तरी बटण..."; भाजपने मतदारांना पैसे वाटल्याचा शरद पवार गटाचा आरोप
18
जानकरांकडून महायुतीला ४२ जागांचा अंदाज, पण आठवलेंचा रिव्हर्स गियर; म्हणाले...
19
Swami Samartha: रोजच्या पूजेत 'या' गोष्टींचा समावेश केला तर स्वामी समर्थांची निश्चितच होईल कृपा!
20
"माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको..." प्रज्वल रेवन्नाला आजोबा देवेगौडांचा इशारा

शहरालगतच्या ११ गावांत कृत्रिम ‘पाणीबाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 11:26 PM

शहरानजीकच्या ११ ग्रा.पं.तील सुमारे १६ हजार कुटुंबीयांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा करीत असून यंदाच्या वर्षी झालेल्या अल्प पावसामुळे उपलब्ध पाण्याचे सध्या योग्य नियोजन केले जात आहे. त्यातच पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेला महिन्याभऱ्याचा स्टॉक संपल्याने सध्या जीवन प्राधिकरणकडे कृत्रिम पाणीबाणी निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे१६ हजार कुटुंबांंना सहा दिवस होणार नाही पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरानजीकच्या ११ ग्रा.पं.तील सुमारे १६ हजार कुटुंबीयांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा करीत असून यंदाच्या वर्षी झालेल्या अल्प पावसामुळे उपलब्ध पाण्याचे सध्या योग्य नियोजन केले जात आहे. त्यातच पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेला महिन्याभऱ्याचा स्टॉक संपल्याने सध्या जीवन प्राधिकरणकडे कृत्रिम पाणीबाणी निर्माण झाली आहे. यामुळे येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत पिपरी (मेघे)सह वर्धा शहरालगतच्या ११ गावांतील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येणार नसल्याचे जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार, पिपरी (मेघे), सिंदी (मेघे), सावंगी (मेघे), बोरगाव (मेघे), वायगाव (नि.), कारला, आलोडी, साटोडा, नालवाडी, म्हसाळा व वरूड या ११ गावांना जीवन प्राधिकरणच्यावतीने पाणीपुरवठा केल्या जातो. शहरानजीकच्या सावंगी (मेघे) येथे वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय तर वर्धा शहराच्या शेजारीच महात्मा गांधी आंतराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ आहे. त्यांनाही जीवन प्राधिकरणच पाणी पुरवठा करते. परंतु, गुरूवार २८ फेबु्रवारीपर्यंत पाणी पुरवठा केल्या जाणार नसल्याने याचा परिणाम सदर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि हिंदी विद्यापीठाच्या अडचणीत भर पडणार आहे. यंदाच्यावर्षी जिल्ह्यात कमी पाऊस पडल्याने भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने उपलब्ध पाण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार वर्धा शहराशेजारच्या ११ ग्रा.पं.तील नागरिकांसाठी १३.०१ द.ल.घ.मी. पाणी सोडण्यात आले होते. ते फेब्रुवारी महिना लोटण्यापूर्वीच संपल्याने आणि पाटबंधारे विभाग आता मार्च महिन्यात जलाशयातील पाणी सोडणार असल्याने येत्या २८ फेबु्रवारीपर्यंत जीवन प्राधिकरणद्वारे ११ गावांमधील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येणार नाही. पाटबंधारे विभागाकडून जलाशयातील पाणी सोडल्यानंतर त्याची उचल करून त्याचा पुरवठा सदर ११ ग्रा.पं.तील सुमारे १६ हजार कुटुंबियांना करण्यात येणार आहे.येळाकेळीच्या धामनदीपात्रातून होते पाण्याची उचलजीवन प्राधिकरण विभाग येळाकेळी येथील धाम नदीपात्रातून पाण्याची उचल करून त्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाण्याचा पुरवठा पिपरी (मेघे), सिंदी (मेघे), सावंगी (मेघे), बोरगाव (मेघे), वायगाव (नि.), कारला, आलोडी, साटोडा, नालवाडी, म्हसाळा व वरूड या गावांमधील नागरिकांना करते; पण सहा दिवस नळाला पाणी येणार नसल्याचे वास्तव आहे.जिल्ह्यातील जलाशयांत २१.८७ टक्के जलसाठाजीवन प्राधिकरणच्यावतीने सध्या दोन दिवसांआड वर्धा शहराच्या शेजारील ११ ग्रा.पं.तील रहिवाशांना पाणीपुरवठा केला जातो. असे असले तरी जिल्ह्यातील जलाशयांत सध्या केवळ २१.८७ टक्केच पाणी शिल्लक असून एप्रिल महिन्यात जलसंकट गडद होण्याची करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने दोन दिवसाआड नागरिकांना पाणी पुरवठा सध्या करण्यात येत आहे. फेबु्रवारी महिन्याचा स्टॉक संपल्याने आणि उपलब्ध पाणी पावसाळा सुरू होण्यापर्यंत पुरवायचे असल्याने वर्धा शहराशेजारच्या ११ गावांमधील नागरिकांना २८ फेब्रुवारीपर्यंत पाणी पुरवठा करण्यात येणार नसून जीवन प्राधिकरणकडून जलाशयातील पाणी सोडण्यात आल्यावर त्याची उचल करून नागरिकाना पाणीपुरवठा करण्यात येईल. नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा.- व्ही. पी. उमाळे, उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वर्धा.

टॅग्स :Waterपाणी