शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

शहरालगतच्या ११ गावांत कृत्रिम ‘पाणीबाणी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2019 23:27 IST

शहरानजीकच्या ११ ग्रा.पं.तील सुमारे १६ हजार कुटुंबीयांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा करीत असून यंदाच्या वर्षी झालेल्या अल्प पावसामुळे उपलब्ध पाण्याचे सध्या योग्य नियोजन केले जात आहे. त्यातच पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेला महिन्याभऱ्याचा स्टॉक संपल्याने सध्या जीवन प्राधिकरणकडे कृत्रिम पाणीबाणी निर्माण झाली आहे.

ठळक मुद्दे१६ हजार कुटुंबांंना सहा दिवस होणार नाही पाणीपुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरानजीकच्या ११ ग्रा.पं.तील सुमारे १६ हजार कुटुंबीयांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा करीत असून यंदाच्या वर्षी झालेल्या अल्प पावसामुळे उपलब्ध पाण्याचे सध्या योग्य नियोजन केले जात आहे. त्यातच पाटबंधारे विभागाकडून देण्यात आलेला महिन्याभऱ्याचा स्टॉक संपल्याने सध्या जीवन प्राधिकरणकडे कृत्रिम पाणीबाणी निर्माण झाली आहे. यामुळे येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत पिपरी (मेघे)सह वर्धा शहरालगतच्या ११ गावांतील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येणार नसल्याचे जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार, पिपरी (मेघे), सिंदी (मेघे), सावंगी (मेघे), बोरगाव (मेघे), वायगाव (नि.), कारला, आलोडी, साटोडा, नालवाडी, म्हसाळा व वरूड या ११ गावांना जीवन प्राधिकरणच्यावतीने पाणीपुरवठा केल्या जातो. शहरानजीकच्या सावंगी (मेघे) येथे वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय तर वर्धा शहराच्या शेजारीच महात्मा गांधी आंतराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ आहे. त्यांनाही जीवन प्राधिकरणच पाणी पुरवठा करते. परंतु, गुरूवार २८ फेबु्रवारीपर्यंत पाणी पुरवठा केल्या जाणार नसल्याने याचा परिणाम सदर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आणि हिंदी विद्यापीठाच्या अडचणीत भर पडणार आहे. यंदाच्यावर्षी जिल्ह्यात कमी पाऊस पडल्याने भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने उपलब्ध पाण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार वर्धा शहराशेजारच्या ११ ग्रा.पं.तील नागरिकांसाठी १३.०१ द.ल.घ.मी. पाणी सोडण्यात आले होते. ते फेब्रुवारी महिना लोटण्यापूर्वीच संपल्याने आणि पाटबंधारे विभाग आता मार्च महिन्यात जलाशयातील पाणी सोडणार असल्याने येत्या २८ फेबु्रवारीपर्यंत जीवन प्राधिकरणद्वारे ११ गावांमधील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येणार नाही. पाटबंधारे विभागाकडून जलाशयातील पाणी सोडल्यानंतर त्याची उचल करून त्याचा पुरवठा सदर ११ ग्रा.पं.तील सुमारे १६ हजार कुटुंबियांना करण्यात येणार आहे.येळाकेळीच्या धामनदीपात्रातून होते पाण्याची उचलजीवन प्राधिकरण विभाग येळाकेळी येथील धाम नदीपात्रातून पाण्याची उचल करून त्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाण्याचा पुरवठा पिपरी (मेघे), सिंदी (मेघे), सावंगी (मेघे), बोरगाव (मेघे), वायगाव (नि.), कारला, आलोडी, साटोडा, नालवाडी, म्हसाळा व वरूड या गावांमधील नागरिकांना करते; पण सहा दिवस नळाला पाणी येणार नसल्याचे वास्तव आहे.जिल्ह्यातील जलाशयांत २१.८७ टक्के जलसाठाजीवन प्राधिकरणच्यावतीने सध्या दोन दिवसांआड वर्धा शहराच्या शेजारील ११ ग्रा.पं.तील रहिवाशांना पाणीपुरवठा केला जातो. असे असले तरी जिल्ह्यातील जलाशयांत सध्या केवळ २१.८७ टक्केच पाणी शिल्लक असून एप्रिल महिन्यात जलसंकट गडद होण्याची करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्याच अनुषंगाने दोन दिवसाआड नागरिकांना पाणी पुरवठा सध्या करण्यात येत आहे. फेबु्रवारी महिन्याचा स्टॉक संपल्याने आणि उपलब्ध पाणी पावसाळा सुरू होण्यापर्यंत पुरवायचे असल्याने वर्धा शहराशेजारच्या ११ गावांमधील नागरिकांना २८ फेब्रुवारीपर्यंत पाणी पुरवठा करण्यात येणार नसून जीवन प्राधिकरणकडून जलाशयातील पाणी सोडण्यात आल्यावर त्याची उचल करून नागरिकाना पाणीपुरवठा करण्यात येईल. नागरिकांनीही उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा.- व्ही. पी. उमाळे, उपविभागीय अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, वर्धा.

टॅग्स :Waterपाणी