शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांचा आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 23:34 IST

शेतकºयांच्या सोयाबीनला प्रती क्विंटल ५ हजार रुपये अन् कापसाला प्रती क्विंटल ७ हजार रुपये भाव जाहीर करावा या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी भूमिपूत्र संघर्ष वाहिनीच्या नेतृत्वात ....

ठळक मुद्देभूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे आंदोलन : सोयाबीन अन् कापसाला भावाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकºयांच्या सोयाबीनला प्रती क्विंटल ५ हजार रुपये अन् कापसाला प्रती क्विंटल ७ हजार रुपये भाव जाहीर करावा या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी भूमिपूत्र संघर्ष वाहिनीच्या नेतृत्वात वर्धा बाजार समिती ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. सदर मोर्चाच्या माध्यमातून शेतकºयांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करीत शासनाप्रती आपला आक्रोश व्यक्त केला.कृषी उत्पन्न बाजार समिती येथून विदर्भातील शेतकºयांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भूमिपूत्र संघर्ष वाहिनीच्या नेतृत्त्वात शेतकरी आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला. मोर्चात सहभागी होण्यासाठी सकाळी ११ वाजतापासून शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एकत्र येणे सुरू झाले. सुरुवातीला कृउबा समितीच्या आवारात अल्प आंदोलनकर्ते दिसून येत असल्याने हे आंदोलन फोल ठरेल, अशीच चर्चा आंदोलनस्थळी होती; पण अवघ्या काही वेळेतच मोठ्या संख्येने शेतकरी आपल्या समस्या शासनदरबारी रेटण्यासाठी या आंदोलनात सहभागी झाल्याने चित्रच बदलून गेले. मोर्चाला प्रारंभ होण्यापूर्वी भूमिपूत्र संघर्ष वाहिनीचे अध्यक्ष अभिजीत फाळके यांच्यासह काही मान्यवरांनी तसेच शेतकºयांनी मनोगत व्यक्त केले.दुपारी १ वाजताच्या सुमारास वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून निघालेला मोर्चा ३ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चा वर्धा पंचायत समितीच्या मुख्य द्वारासमोर आला असता तो पोलिसांनी अडवून धरला. यावेळी मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले. मोर्चात मनोज चांदूरकर, सुधीर पांगुळ, प्रशांत देशमुख, अतुल पाळेकर, किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे, प्रहारचे शहर अध्यक्ष विकास दांडगे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.आंदोलनकर्त्यांच्या मागण्यासोयाबीनला प्रती क्विंटल ५ हजार व कापसाला प्रती क्विंटल ७ हजार रुपये भाव जाहीर करावा.शेतकºयांची होणारी लूट थांबविण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावी.ओलितासाठी शेतीपंपाला दिवसाला किमान १२ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा.शेतमाल विक्रीची आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया तात्काळ रद्द करावी.नरभक्षक वाघिणीच्या आकस्मिक मृत्यूला जबादार ठरवून कारंजा तालुक्यातील शेतकºयावर दाखल केलेले गुन्हे वनविभागाने मागे घ्यावे.कुठल्याही कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाºयांकडून शेतकºयांच्या शेतमालाला हमीभावापेक्षा कमी भाव दिले जात असल्यास त्या व्यापाºयाविरुद्ध कठोर कार्यवाही करीत त्याचा परवाना रद्द करावा.विविध शेतोपयोगी साहित्यावर वस्तुसेवा कर लावण्यात आला असून शेतीपयोगी साहित्याला तात्काळ वस्तुसेवा करातून मुक्त करण्यात यावे.पोलिसांची उडाली तारांबळभूमिपूत्र संघर्ष वाहिनीच्यावतीने आयोजित शेतकºयांचा मोर्चा वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून दुपारी १ वाजताच्या सुमारास बाहेर पडला. सुरूवातीला या परिसरात एक पोलीस शिपाई व एक वाहतूक पोलीस उपस्थित होता. सदर मोर्चाने अवघ्या आठ मिनीटांत वर्धा कृउबा समिती ते बजाज चौक, हे अंतर पूर्ण केले. दरम्यान, पोलिसांच्या नियोजनशून्य कारभारामुळे नियोजित ठिकाणाहून मोर्चा निघताच अवघ्या काही मिनीटांतच बजाज चौक भागातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलावरील वाहतूक खोळंबली होती. परिणामी, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. तब्बल अर्धा तास कसरत करून वाहतूक पोलिसांनी उड्डाणपुलावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.