शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

शेतकºयांचा आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 23:34 IST

शेतकºयांच्या सोयाबीनला प्रती क्विंटल ५ हजार रुपये अन् कापसाला प्रती क्विंटल ७ हजार रुपये भाव जाहीर करावा या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी भूमिपूत्र संघर्ष वाहिनीच्या नेतृत्वात ....

ठळक मुद्देभूमिपुत्र संघर्ष वाहिनीचे आंदोलन : सोयाबीन अन् कापसाला भावाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकºयांच्या सोयाबीनला प्रती क्विंटल ५ हजार रुपये अन् कापसाला प्रती क्विंटल ७ हजार रुपये भाव जाहीर करावा या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी भूमिपूत्र संघर्ष वाहिनीच्या नेतृत्वात वर्धा बाजार समिती ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. सदर मोर्चाच्या माध्यमातून शेतकºयांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करीत शासनाप्रती आपला आक्रोश व्यक्त केला.कृषी उत्पन्न बाजार समिती येथून विदर्भातील शेतकºयांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भूमिपूत्र संघर्ष वाहिनीच्या नेतृत्त्वात शेतकरी आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला. मोर्चात सहभागी होण्यासाठी सकाळी ११ वाजतापासून शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एकत्र येणे सुरू झाले. सुरुवातीला कृउबा समितीच्या आवारात अल्प आंदोलनकर्ते दिसून येत असल्याने हे आंदोलन फोल ठरेल, अशीच चर्चा आंदोलनस्थळी होती; पण अवघ्या काही वेळेतच मोठ्या संख्येने शेतकरी आपल्या समस्या शासनदरबारी रेटण्यासाठी या आंदोलनात सहभागी झाल्याने चित्रच बदलून गेले. मोर्चाला प्रारंभ होण्यापूर्वी भूमिपूत्र संघर्ष वाहिनीचे अध्यक्ष अभिजीत फाळके यांच्यासह काही मान्यवरांनी तसेच शेतकºयांनी मनोगत व्यक्त केले.दुपारी १ वाजताच्या सुमारास वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून निघालेला मोर्चा ३ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चा वर्धा पंचायत समितीच्या मुख्य द्वारासमोर आला असता तो पोलिसांनी अडवून धरला. यावेळी मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर केले. मोर्चात मनोज चांदूरकर, सुधीर पांगुळ, प्रशांत देशमुख, अतुल पाळेकर, किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे, प्रहारचे शहर अध्यक्ष विकास दांडगे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते.आंदोलनकर्त्यांच्या मागण्यासोयाबीनला प्रती क्विंटल ५ हजार व कापसाला प्रती क्विंटल ७ हजार रुपये भाव जाहीर करावा.शेतकºयांची होणारी लूट थांबविण्यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावी.ओलितासाठी शेतीपंपाला दिवसाला किमान १२ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा.शेतमाल विक्रीची आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया तात्काळ रद्द करावी.नरभक्षक वाघिणीच्या आकस्मिक मृत्यूला जबादार ठरवून कारंजा तालुक्यातील शेतकºयावर दाखल केलेले गुन्हे वनविभागाने मागे घ्यावे.कुठल्याही कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापाºयांकडून शेतकºयांच्या शेतमालाला हमीभावापेक्षा कमी भाव दिले जात असल्यास त्या व्यापाºयाविरुद्ध कठोर कार्यवाही करीत त्याचा परवाना रद्द करावा.विविध शेतोपयोगी साहित्यावर वस्तुसेवा कर लावण्यात आला असून शेतीपयोगी साहित्याला तात्काळ वस्तुसेवा करातून मुक्त करण्यात यावे.पोलिसांची उडाली तारांबळभूमिपूत्र संघर्ष वाहिनीच्यावतीने आयोजित शेतकºयांचा मोर्चा वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातून दुपारी १ वाजताच्या सुमारास बाहेर पडला. सुरूवातीला या परिसरात एक पोलीस शिपाई व एक वाहतूक पोलीस उपस्थित होता. सदर मोर्चाने अवघ्या आठ मिनीटांत वर्धा कृउबा समिती ते बजाज चौक, हे अंतर पूर्ण केले. दरम्यान, पोलिसांच्या नियोजनशून्य कारभारामुळे नियोजित ठिकाणाहून मोर्चा निघताच अवघ्या काही मिनीटांतच बजाज चौक भागातील आचार्य विनोबा भावे उड्डाण पुलावरील वाहतूक खोळंबली होती. परिणामी, नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. तब्बल अर्धा तास कसरत करून वाहतूक पोलिसांनी उड्डाणपुलावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली.