शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

आरोग्य सेतू अ‍ॅप वापरताय.. जरा मुलांपासून दूर ठेवा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 20:10 IST

वर्धा शहरातील खडकपुरा गणपती वॉर्डातील एका व्यापाऱ्याच्या मुलाने वडिलांचा मोबाईल उघडला. त्यावरील आरोग्य सेतू अ‍ॅपवरील प्रश्नाची सर्व सकारात्मक उत्तरे दिली. सर्व उत्तरे सकारात्मक येताच या चाचणीचा संदेश केंद्रीय आरोग्य कोरोना टास्क फोर्सकडे गेला.

ठळक मुद्देमुलाच्या हाती लागला मोबाईल आणि घरच्यांना व्हावे लागले क्वारंटाईन

राजेश सोळंकीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: आर्वी येथील गणपती वॉर्डातील एका शालेय विद्यार्थ्याने आपल्या वडिलांचा भ्रमणध्वनी त्यांच्या नकळत घेतला. त्यातील आरोग्य सेतू अ‍ॅप उघडला आणि त्यावरील प्रश्नांची सविस्तर सकारात्मक उत्तरे देऊन सबमिटही केली. त्यामुळे लागलीच तात्काळ केंद्रीय आरोग्य टास्क फोर्सने कार्यवाही करून कोरोनाची कोणतीही लागण नसलेल्या एका कुटुंबाला विनाकारण सात दिवसासाठी क्वारंटाईन केले..भारतात कोरोनाची लागण झाल्यावर भारत सरकारच्या आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य सेतू अ‍ॅप सुरू केला या अ‍ॅपमध्ये वैयक्तिक तपासणीसाठीची प्रश्नावली असून त्याची अचूक उत्तरे दिल्यास वापरकर्त्यांची आत्म मूल्यांकन चाचणी घेतली जाते. या अ‍ॅपच्या माध्यमातून वापरकर्ता व संशयित कोरनाबाधित पाचशे मीटर ते दहा किलोमीटरच्या परिसरात असले व दोघांचेही ब्ल्यू टूथ सुरू असेल तर प्रत्येकाला धोक्याची सूचना किंवा माहिती प्राप्त होत होती.मात्र वर्धा शहरातील खडकपुरा गणपती वॉर्डातील एका व्यापाऱ्याच्या मुलाने वडिलांचा मोबाईल उघडला. त्यावरील आरोग्य सेतू अ‍ॅपवरील प्रश्नाची सर्व सकारात्मक उत्तरे दिली. ही बाब त्याच्या कुटुंबातील कुणालाच माहिती नव्हती. सर्व उत्तरे सकारात्मक येताच या चाचणीचा संदेश केंद्रीय आरोग्य कोरोना टास्क फोर्सकडे गेला. त्यांनी तो फोन नंबर व सर्व पत्त्यासहित जिल्हा आपत्कालीन व्यवस्थापनाला कळविला. त्यांनी आर्वीच्या आरोग्य विभागाला त्वरित माहिती दिली आणि आरोग्य पथक त्याचे घरी पोहोचले. त्यांची विचारपूस करण्यात आली. आपल्या मुलाच्या चुकीमुळे असा प्रकार घडला, यात आम्हाला काहीही माहित नाही असे या जोडप्याने सांगितले. तरीही प्रशासनाने त्या दोघांनाही सात दिवसासाठी क्वारंटाईन केले . 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस