शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यपूर्व काळातील वास्तू कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:05 IST

देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जिल्ह्याचा कारभार चालणाऱ्या इमारतीतूनच स्वातंत्र्यानंतरही आतापर्यंत कामकाज चालत होते. आज कालौघात जिल्हाधिकारी कार्यालयाची ऐतिहासिक वास्तू खिळखिळी झाल्याने तिच्यावर हातोडा चालविण्यात आला.

ठळक मुद्देनियोजनभवन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे नवनिर्माण : पर्यावरणपूरक इमारत ठरणार ‘युनिक’

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जिल्ह्याचा कारभार चालणाऱ्या इमारतीतूनच स्वातंत्र्यानंतरही आतापर्यंत कामकाज चालत होते. आज कालौघात जिल्हाधिकारी कार्यालयाची ऐतिहासिक वास्तू खिळखिळी झाल्याने तिच्यावर हातोडा चालविण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील गतवैभवाची साक्ष देणारी वास्तू आता आठवडाभरात इतिहासजमा होणार आहे.स्थानिक महात्मा गांधी पुतळ्याच्या बाजूला जिल्ह्याधिकारी कार्यालयाची ऐतिहासिक वास्तू आहे. ही इमारत १९०५ ते १० या कालखंडातील असल्याचे सांगितले जाते. याच इमारत परिसरात कालांतराने पोलीस अधीक्षक कार्यालय व इतर कार्यालयांची निर्मिती करण्यात आली. विशेषत: या परिसरातील रेकॉर्ड रुमची इमारत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीपूर्वीची असल्याचे सांगितले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीची मध्यंतरी १९२३ मध्ये दुरुस्ती करण्यात आली. पण, त्यानंतर मात्र ही इमारत खिळखिळी व्हायला लागली. जिल्ह्याचा कारभार चालणाºया इमारतीच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष केल्याने या इमारतीतील मनरेगा विभागात कार्यालयीन वेळेत स्लॅबचा काही भाग खाली कोसळला. त्यावेळी कार्यालयातील कर्मचारी ‘लंच टाईम‘ असल्याने चहा पिण्यासाठी बाहेर गेले असल्याने सुदैवाने दुर्घटना टळली. त्यानंतर या इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. या प्रस्तावाने चार ते पाच वर्षे मंत्रालयाच्या वाºया केल्यानंतर मागीलवर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नियोजनभवन व जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या बांधकामाला हिरवी झेंडी देण्यात आली.त्यामुळे येथील सर्व कार्यालये इतरत्र हलवून इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आल्याने स्वातंत्र्यपूर्व काळातील ऐतिहासिक वास्तू पाडली जात आहे. इमारतीचे छत व इतर साहित्य काढले असून आता इमारतीवर गजराज चालविला जात आहे. त्यामुळे ऐतिहासिक वास्तू लवकरच नामशेष होणार आहे.पंधरा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे लक्ष्यजिल्हाधिकारी कार्यालय व नियोजन भवनाच्या इमारतीच्या बांधकामाचा श्रीगणेशा २ आॅक्टोबर, गांधी जयंतीदिनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. तेव्हापासून १५ महिन्यांत ही इमारत पूर्ण करण्याचे निर्देशित केले आहे. त्यानुसार कंत्राटदाराने आपले काम सुरूही केले. सुरुवातीला जुन्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील साहित्य काढून कार्यालय मोकळे करण्यात आले. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयातील साहित्य काढण्यातच वेळ गेला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नोटीसही बजावण्यात आली होती. हे कार्यालय खाली करण्यासाठी तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लागल्याने बांधकामही सहा महिन्यांपर्यंत खोळंबले होते. आता कामाने वेग घेतल्याचे दिसून येत आहे.इमारतीसमोरील बगिचा देणार गांधी विचारांची साक्षजिल्हाधिकारी कार्यालय व नियोजनभवनाच्या निर्मितीकरिता शासनाकडून जवळपास ४० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या इमारतीच्या बांधकामाची निविदा २० कोटींमध्ये गेली असून कामालाही प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या संकल्पनेनुसार या इमारतीची डिझाईन तयार करण्यात आली आहे. ही इमारत पर्यावरणपूक असून १४८ बाय ३८ मीटर इतक्या आकारात साकार होणार आहे. सूर्यप्रकाश थेट या इमारतीत पडणार आहे. तसेच अधिकाºयांची दालने आणि इतर कार्यालयेही आगळी-वेगळीच राहणार असून येथे गांधींच्या विचारांची साक्ष देणारा बगिचाही साकारण्यात येणार आहे. त्यामुळे ही इमारत निश्चित युनिक ठरणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद