शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
2
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
3
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
4
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
5
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
6
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
7
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
8
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
9
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
10
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
11
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
13
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
14
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
15
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
16
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
17
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
18
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
19
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
20
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  

स्वातंत्र्यपूर्व काळातील वास्तू कालबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:05 IST

देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जिल्ह्याचा कारभार चालणाऱ्या इमारतीतूनच स्वातंत्र्यानंतरही आतापर्यंत कामकाज चालत होते. आज कालौघात जिल्हाधिकारी कार्यालयाची ऐतिहासिक वास्तू खिळखिळी झाल्याने तिच्यावर हातोडा चालविण्यात आला.

ठळक मुद्देनियोजनभवन, जिल्हाधिकारी कार्यालयाचे नवनिर्माण : पर्यावरणपूरक इमारत ठरणार ‘युनिक’

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी जिल्ह्याचा कारभार चालणाऱ्या इमारतीतूनच स्वातंत्र्यानंतरही आतापर्यंत कामकाज चालत होते. आज कालौघात जिल्हाधिकारी कार्यालयाची ऐतिहासिक वास्तू खिळखिळी झाल्याने तिच्यावर हातोडा चालविण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातील गतवैभवाची साक्ष देणारी वास्तू आता आठवडाभरात इतिहासजमा होणार आहे.स्थानिक महात्मा गांधी पुतळ्याच्या बाजूला जिल्ह्याधिकारी कार्यालयाची ऐतिहासिक वास्तू आहे. ही इमारत १९०५ ते १० या कालखंडातील असल्याचे सांगितले जाते. याच इमारत परिसरात कालांतराने पोलीस अधीक्षक कार्यालय व इतर कार्यालयांची निर्मिती करण्यात आली. विशेषत: या परिसरातील रेकॉर्ड रुमची इमारत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीपूर्वीची असल्याचे सांगितले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीची मध्यंतरी १९२३ मध्ये दुरुस्ती करण्यात आली. पण, त्यानंतर मात्र ही इमारत खिळखिळी व्हायला लागली. जिल्ह्याचा कारभार चालणाºया इमारतीच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष केल्याने या इमारतीतील मनरेगा विभागात कार्यालयीन वेळेत स्लॅबचा काही भाग खाली कोसळला. त्यावेळी कार्यालयातील कर्मचारी ‘लंच टाईम‘ असल्याने चहा पिण्यासाठी बाहेर गेले असल्याने सुदैवाने दुर्घटना टळली. त्यानंतर या इमारतीच्या बांधकामाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. या प्रस्तावाने चार ते पाच वर्षे मंत्रालयाच्या वाºया केल्यानंतर मागीलवर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात नियोजनभवन व जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या बांधकामाला हिरवी झेंडी देण्यात आली.त्यामुळे येथील सर्व कार्यालये इतरत्र हलवून इमारतीच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आल्याने स्वातंत्र्यपूर्व काळातील ऐतिहासिक वास्तू पाडली जात आहे. इमारतीचे छत व इतर साहित्य काढले असून आता इमारतीवर गजराज चालविला जात आहे. त्यामुळे ऐतिहासिक वास्तू लवकरच नामशेष होणार आहे.पंधरा महिन्यांत काम पूर्ण करण्याचे लक्ष्यजिल्हाधिकारी कार्यालय व नियोजन भवनाच्या इमारतीच्या बांधकामाचा श्रीगणेशा २ आॅक्टोबर, गांधी जयंतीदिनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. तेव्हापासून १५ महिन्यांत ही इमारत पूर्ण करण्याचे निर्देशित केले आहे. त्यानुसार कंत्राटदाराने आपले काम सुरूही केले. सुरुवातीला जुन्या पोलीस अधीक्षक कार्यालयातील साहित्य काढून कार्यालय मोकळे करण्यात आले. परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयातील साहित्य काढण्यातच वेळ गेला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नोटीसही बजावण्यात आली होती. हे कार्यालय खाली करण्यासाठी तब्बल सहा महिन्यांचा कालावधी लागल्याने बांधकामही सहा महिन्यांपर्यंत खोळंबले होते. आता कामाने वेग घेतल्याचे दिसून येत आहे.इमारतीसमोरील बगिचा देणार गांधी विचारांची साक्षजिल्हाधिकारी कार्यालय व नियोजनभवनाच्या निर्मितीकरिता शासनाकडून जवळपास ४० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या इमारतीच्या बांधकामाची निविदा २० कोटींमध्ये गेली असून कामालाही प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या संकल्पनेनुसार या इमारतीची डिझाईन तयार करण्यात आली आहे. ही इमारत पर्यावरणपूक असून १४८ बाय ३८ मीटर इतक्या आकारात साकार होणार आहे. सूर्यप्रकाश थेट या इमारतीत पडणार आहे. तसेच अधिकाºयांची दालने आणि इतर कार्यालयेही आगळी-वेगळीच राहणार असून येथे गांधींच्या विचारांची साक्ष देणारा बगिचाही साकारण्यात येणार आहे. त्यामुळे ही इमारत निश्चित युनिक ठरणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद