शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

दीड दशकात ॲनोफिलीस जातीच्या डासांनी घेतले सहा बळी

By महेश सायखेडे | Updated: April 25, 2023 17:22 IST

आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे ठरते फायद्याचे

वर्धा : मलेरिया म्हणजेच हिवताप. हा एक संसर्गजन्य आजार असून, मलेरिया हा आजार ॲनोफिलीस जातीचा बाधित डास चावल्यामुळे होतो. डासांद्वारे संक्रमित होणाऱ्या आजारांपैकी मलेरिया सर्वांत धोकादायक मानला जातो. मागील दीड दशकात वर्धा जिल्ह्यात मलेरिया या आजाराची ४ हजार ४१९ व्यक्तींना लागण झाली. तर याच काळात तब्बल सहा व्यक्तींचा मलेरियामुळे मृत्यू झाल्याचे वास्तव असून, त्याबाबतची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. कीटकजन्य आजारांवर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे फायद्याचे ठरते. तसे आवाहन आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांकडूनही केले जाते.कसा होतो मलेरिया?

संबंधित डास जेव्हा चावतो तेव्हा प्लाज्मोडियम परजीवी हे त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. नंतर परजीवी रक्तामधून त्या व्यक्तीच्या यकृतात प्रवेश करतात. परजीवी रक्तात मिसळून त्या व्यक्तीच्या रक्तातील लाल रक्तपेशींना बाधित करतात, असे सांगण्यात आले.मलेरियाचे प्रकार

प्लाज्मोडियम वायवॅक्स, ‎प्लाज्मोडियम ओवेल, ‎प्लाज्मोडियम फैल्सिपैरम, प्लाज्मोडियम मलेरिया हे चार मलेरियाचे प्रकार असल्याचे सांगण्यात आले.

मलेरियाची लक्षणे

थंडी वाजून ताप येणे, ‎थांबून-थांबून अधिक ताप येणे, ‎डोकेदुखी, मळमळ व उलट्या, पोटदुखी, जुलाब व अतिसार होणे, नाडीची गती जलद होणे, सांध्यांमध्ये वेदना होणे, अंगदुखी, शरीरात वेदना होणे ही मलेरियाची प्राथमिक लक्षणे आहेत.कुठल्या वर्षी किती मृत्यू?

* २००८ : ०१* २०११ : ०१* २०१२ : ०२* २०१५ : ०२

मलेरिया हा कीटकजन्य आजार असून, लक्षणे असलेल्या व्यक्तीने कुठलाही घरगुती उपाय न करता नजीकच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. कीटकजन्य आजारांवर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे फायद्याचे ठरते. नागरिकांनीही आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा.

- डॉ. जयश्री थोटे, जिल्हा हिवताप अधिकारी, वर्धा

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यूwardha-acवर्धा