शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

दीड दशकात ॲनोफिलीस जातीच्या डासांनी घेतले सहा बळी

By महेश सायखेडे | Updated: April 25, 2023 17:22 IST

आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे ठरते फायद्याचे

वर्धा : मलेरिया म्हणजेच हिवताप. हा एक संसर्गजन्य आजार असून, मलेरिया हा आजार ॲनोफिलीस जातीचा बाधित डास चावल्यामुळे होतो. डासांद्वारे संक्रमित होणाऱ्या आजारांपैकी मलेरिया सर्वांत धोकादायक मानला जातो. मागील दीड दशकात वर्धा जिल्ह्यात मलेरिया या आजाराची ४ हजार ४१९ व्यक्तींना लागण झाली. तर याच काळात तब्बल सहा व्यक्तींचा मलेरियामुळे मृत्यू झाल्याचे वास्तव असून, त्याबाबतची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे. कीटकजन्य आजारांवर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे फायद्याचे ठरते. तसे आवाहन आरोग्य यंत्रणेतील तज्ज्ञांकडूनही केले जाते.कसा होतो मलेरिया?

संबंधित डास जेव्हा चावतो तेव्हा प्लाज्मोडियम परजीवी हे त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात. नंतर परजीवी रक्तामधून त्या व्यक्तीच्या यकृतात प्रवेश करतात. परजीवी रक्तात मिसळून त्या व्यक्तीच्या रक्तातील लाल रक्तपेशींना बाधित करतात, असे सांगण्यात आले.मलेरियाचे प्रकार

प्लाज्मोडियम वायवॅक्स, ‎प्लाज्मोडियम ओवेल, ‎प्लाज्मोडियम फैल्सिपैरम, प्लाज्मोडियम मलेरिया हे चार मलेरियाचे प्रकार असल्याचे सांगण्यात आले.

मलेरियाची लक्षणे

थंडी वाजून ताप येणे, ‎थांबून-थांबून अधिक ताप येणे, ‎डोकेदुखी, मळमळ व उलट्या, पोटदुखी, जुलाब व अतिसार होणे, नाडीची गती जलद होणे, सांध्यांमध्ये वेदना होणे, अंगदुखी, शरीरात वेदना होणे ही मलेरियाची प्राथमिक लक्षणे आहेत.कुठल्या वर्षी किती मृत्यू?

* २००८ : ०१* २०११ : ०१* २०१२ : ०२* २०१५ : ०२

मलेरिया हा कीटकजन्य आजार असून, लक्षणे असलेल्या व्यक्तीने कुठलाही घरगुती उपाय न करता नजीकच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत. कीटकजन्य आजारांवर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळणे फायद्याचे ठरते. नागरिकांनीही आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा.

- डॉ. जयश्री थोटे, जिल्हा हिवताप अधिकारी, वर्धा

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यूwardha-acवर्धा