शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
2
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
3
पुन्हा राज्यसभेवर संधी मिळेल का? मोदी सरकारमधील सहा मंत्र्यांची 2026 मध्ये ‘अग्निपरीक्षा’
4
सरकारी कर्मचारी दांपत्यांना दिलासा! पती-पत्नीची एकाच शहरात नियुक्ती करण्याचे केंद्राचे निर्देश
5
Accident : भाड्याने थार घेतली, गर्लफ्रेंडला भेटायला निघाला; समोर कुटुंब दिसताच गाडी पळवू लागला अन्... 
6
Ola Electric ला सरकारकडून मिळणार ३६६.७८ कोटी रुपयांचा मोठा दिलासा; शेअरमध्ये जोरदार तेजी, जाणून घ्या
7
क्रिकेटमधील उल्लेखनीय कामगिरीची दखल; वैभव सूर्यवंशीचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
8
सर्व (पक्ष) समावेशक भाजपा नीती! काँग्रेस रिकामी, उद्धवसेनेचे घर खाली, मनसेचा कणा मोडला
9
कोंबडी आधी की अंडं? शतकानुशतके पडलेल्या या जुन्या प्रश्नाचं उत्तर अखेर वैज्ञानिकांना सापडलं
10
तुम्ही सुद्धा 'हर्बल टी' पिता का? FSSAI नं कंपन्यांना दिला इशारा, नक्की प्रकरण काय?
11
Girish Mahajan : भाजपामध्ये प्रवेशाचे 'महाभारत'; मंत्री गिरीश महाजन यांना घेराव; निष्ठावंतांवरच अन्याय का?
12
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
13
Viral : टेक्नोलॉजिया! अवघ्या एका विटेत पठ्ठ्याने तयार केला रूम हीटर; ५० रुपयांच्या खर्चात थंडी केली गायब
14
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
15
शिंदेसेनेकडून ४२ जागांचा प्रस्ताव, जागा वाटपाचा तिढा सुटेना; तीन मंत्र्यांसह नेत्यांची जंबो बैठक
16
"मला खूप दुखतंय...", उपचारांसाठी ८ तास वेटिंग; कॅनडात वडिलांसमोर भारतीयाचा तडफडून मृत्यू
17
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
18
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
19
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
20
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाला पिकात सोडली जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST

पहिल्या टप्प्प्यात १४, नंतर ३० एप्रिल आणि ३ मे आणि नंतर १७ मे पर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ देण्यात आली. मार्च-एप्रिल आणि हे तीन महिने लग्नसराईचा हंगाम असतो. या हंगामाची तयारी म्हणून जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर वांगी, कारली, टमाटर, भेंडी, चवळी आदी भाजीपाला पिकांची लागवड केली. यंदा मात्र, लग्नसमारंभांसह सर्वच सोहळ्यांवर कोेरोनाचे सावट होते.

ठळक मुद्देमातीमोल भाव : शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशभरासह राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनसह संचारबंदीमुळे भाजीपाला पिकाचे भाव पडल्याने अनेक भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी पिकात चक्क जनावरे सोडली. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले आहे.जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील चिकणी (जामणी), पढेगाव, वर्धा तालुक्यातील चितोडा, बरबडी, सेवाग्राम, सेलू काटे, पवनार, तिगाव व अन्य भागात शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकाची लागवड करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊनचा अंमल करण्यात आला. पहिल्या टप्प्प्यात १४, नंतर ३० एप्रिल आणि ३ मे आणि नंतर १७ मे पर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ देण्यात आली. मार्च-एप्रिल आणि हे तीन महिने लग्नसराईचा हंगाम असतो. या हंगामाची तयारी म्हणून जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर वांगी, कारली, टमाटर, भेंडी, चवळी आदी भाजीपाला पिकांची लागवड केली. यंदा मात्र, लग्नसमारंभांसह सर्वच सोहळ्यांवर कोेरोनाचे सावट होते. त्यामुळे भाजीपाल्याला फारशी मागणी नसल्याने भाव पडले. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना १५ किलोची भाजीपाल्याची कॅरीबॅग १० रुपये इतक्या कवडीमोल भावात विकावी लागली. यात लागवडीचा दूर वाहतुकीचाही खर्च निघणे अवघड झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी एक ते पाच एकरात लागवड केलेल्या भाजीपाला पिकांत चक्क जनावरे सोडली.दलालांनीही खरेदीकडे फिरविली पाठभाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले. मात्र, भावच नसल्याने दलालांनी शेतकऱ्यांचा भाजीपाला खरेदीकडे पाठ फिरविली. स्वत:च्या जबाबदारीवर भाजीपाला विक्रीसाठी आणा, असे दलालांकडून सांगणत आले. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला. यात अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची थेट ग्राहकांनाच विक्री केली.फळपिकालाही कवडीमोल भावजिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर कलिंगड, डांगर आदी हंगामी फळपिकांची लागवड करतात. मात्र, कलिंगड, डांगर या फळपिकांनाही पाच ते सहा रुपये किलो इतका कवडीमोल भाव असल्याने अनेक फळ उत्पादक शेतकऱ्यांनी फळपिकाची थेट ग्राहकांना विक्री केली. तर भावच नसल्याने तोडणीअभावी अनेकांचे फळपीक शेतातच सडत राहिले.चरितार्थासाठी स्वीकारला भाजी विक्री व्यवसायकोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे लघु व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. शहरातील अनेक ऑटोरिक्षा चालक, कापड व इलेक्ट्रॉनिक्स, भांडी दुकानात रोजंदारीने नोकरी करणारे तरुण, चहा टपरीचालक, पानटपरी व्यावसायिक, अंडी, पाणीपुरी विक्रेते आदींनी चक्क भाजी आणि फळ विक्रीचा अस्थायी व्यवसाय स्वीकारला. शहरात अनेक रस्त्याच्या कडेला हातमाडीच्या माध्यमातून हे व्यावसायिक भाजीपाला, फळविक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :vegetableभाज्याagricultureशेती