शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
3
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
4
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
5
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
6
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
7
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
8
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
9
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
10
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
11
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
13
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
14
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
15
Iran strikes US air base: इराणचे प्रत्युत्तर; कतारमधील अमेरिकन लष्करी तळांवर जोरदार मिसाईल हल्ला
16
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
17
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
18
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
19
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
20
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी

भाजीपाला पिकात सोडली जनावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST

पहिल्या टप्प्प्यात १४, नंतर ३० एप्रिल आणि ३ मे आणि नंतर १७ मे पर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ देण्यात आली. मार्च-एप्रिल आणि हे तीन महिने लग्नसराईचा हंगाम असतो. या हंगामाची तयारी म्हणून जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर वांगी, कारली, टमाटर, भेंडी, चवळी आदी भाजीपाला पिकांची लागवड केली. यंदा मात्र, लग्नसमारंभांसह सर्वच सोहळ्यांवर कोेरोनाचे सावट होते.

ठळक मुद्देमातीमोल भाव : शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशभरासह राज्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनसह संचारबंदीमुळे भाजीपाला पिकाचे भाव पडल्याने अनेक भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी पिकात चक्क जनावरे सोडली. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या संकटात सापडले आहे.जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील चिकणी (जामणी), पढेगाव, वर्धा तालुक्यातील चितोडा, बरबडी, सेवाग्राम, सेलू काटे, पवनार, तिगाव व अन्य भागात शेतकरी मोठ्या प्रमाणावर भाजीपाला पिकाची लागवड करतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २३ मार्चपासून जिल्ह्यात लॉकडाऊनचा अंमल करण्यात आला. पहिल्या टप्प्प्यात १४, नंतर ३० एप्रिल आणि ३ मे आणि नंतर १७ मे पर्यंत लॉकडाऊनला मुदतवाढ देण्यात आली. मार्च-एप्रिल आणि हे तीन महिने लग्नसराईचा हंगाम असतो. या हंगामाची तयारी म्हणून जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर वांगी, कारली, टमाटर, भेंडी, चवळी आदी भाजीपाला पिकांची लागवड केली. यंदा मात्र, लग्नसमारंभांसह सर्वच सोहळ्यांवर कोेरोनाचे सावट होते. त्यामुळे भाजीपाल्याला फारशी मागणी नसल्याने भाव पडले. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना १५ किलोची भाजीपाल्याची कॅरीबॅग १० रुपये इतक्या कवडीमोल भावात विकावी लागली. यात लागवडीचा दूर वाहतुकीचाही खर्च निघणे अवघड झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी एक ते पाच एकरात लागवड केलेल्या भाजीपाला पिकांत चक्क जनावरे सोडली.दलालांनीही खरेदीकडे फिरविली पाठभाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन झाले. मात्र, भावच नसल्याने दलालांनी शेतकऱ्यांचा भाजीपाला खरेदीकडे पाठ फिरविली. स्वत:च्या जबाबदारीवर भाजीपाला विक्रीसाठी आणा, असे दलालांकडून सांगणत आले. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला. यात अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची थेट ग्राहकांनाच विक्री केली.फळपिकालाही कवडीमोल भावजिल्ह्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणावर कलिंगड, डांगर आदी हंगामी फळपिकांची लागवड करतात. मात्र, कलिंगड, डांगर या फळपिकांनाही पाच ते सहा रुपये किलो इतका कवडीमोल भाव असल्याने अनेक फळ उत्पादक शेतकऱ्यांनी फळपिकाची थेट ग्राहकांना विक्री केली. तर भावच नसल्याने तोडणीअभावी अनेकांचे फळपीक शेतातच सडत राहिले.चरितार्थासाठी स्वीकारला भाजी विक्री व्यवसायकोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे लघु व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. शहरातील अनेक ऑटोरिक्षा चालक, कापड व इलेक्ट्रॉनिक्स, भांडी दुकानात रोजंदारीने नोकरी करणारे तरुण, चहा टपरीचालक, पानटपरी व्यावसायिक, अंडी, पाणीपुरी विक्रेते आदींनी चक्क भाजी आणि फळ विक्रीचा अस्थायी व्यवसाय स्वीकारला. शहरात अनेक रस्त्याच्या कडेला हातमाडीच्या माध्यमातून हे व्यावसायिक भाजीपाला, फळविक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे दिसून येते.

टॅग्स :vegetableभाज्याagricultureशेती