शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

कृषी महोत्सवापाठोपाठ पशु प्रदर्शनाचा ‘फ्लॉप शो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 05:00 IST

पशुसंवर्धन विभागामार्फत वायगाव (निपाणी) येथे देवळी मार्गालगतच्या सिंघानिया ले-आउटमध्ये आयोजित या पशुप्रदर्शनाकरिता जिल्हा नियोजनसमितीमधून ५ लाख इतकी भरीव तरतूद करण्यात आली होती. मात्र, आयोजकांनी प्रदर्शनाविषयी प्रभावी जनजागृती करण्यात काही कारणास्तव प्रचंड निरुत्साह दाखविला.

ठळक मुद्देवायगाव (नि.) येथील आयोजन । अधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनाचा फटका

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पशुसंवर्धनातून रोजगारनिर्मिती, पर्यायाने शेतकऱ्यांचा पशुपालनाकडे कल वाढावा, त्यांना प्रोत्साहन मिळावे याकरिता जिल्हा परिषद, पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वायगाव (निपाणी) येथे पशु प्रदर्शनाचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. मात्र, अधिकाºयांचे ढिसाळ नियोजन, शेतकरी, पशुपालकांचा अत्यल्प प्रतिसाद आणि लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविल्याने हे पशुप्रदर्शन ‘फ्लॉप’ ठरले.पशुसंवर्धन विभागामार्फत वायगाव (निपाणी) येथे देवळी मार्गालगतच्या सिंघानिया ले-आउटमध्ये आयोजित या पशुप्रदर्शनाकरिता जिल्हा नियोजनसमितीमधून ५ लाख इतकी भरीव तरतूद करण्यात आली होती. मात्र, आयोजकांनी प्रदर्शनाविषयी प्रभावी जनजागृती करण्यात काही कारणास्तव प्रचंड निरुत्साह दाखविला. त्यामुळे पशुंची नोंदणीही अत्यंत कमी झाली. ढिसाळ नियोजनाची कुणकुण लागली म्हणावी की काय खुद्द खासदार, आमदार एवढेच नव्हे तर जिल्हा परिषद अध्यक्षांनीदेखील ‘भव्य’ असे नामाभिधान केलेल्या या पशुप्रदर्शनाकडे पाठ फिरविली. निधीची पुरेशी तरतूद असतानाही प्रदर्शनस्थळी सोयी-सुविधांचाही प्रचंड दुष्काळ होता. त्यामुळे पशुपालक आणि शेतकऱ्यांचा मोठा हिरमोड झाला. अनेकांनी या ‘भव्य’ आयोजनाविषयी संतप्त प्रतिक्रिया नोंदविल्या. नियोजनाच्या अभावामुळे दुपारनंतरच प्रदर्शनस्थळी वैरणटंचाई निर्माण झाल्याने शेतकरी पशुपालकांची मोठी धावपळ झाली. जनावरांना याचा फटका बसला.उत्कृष्ट जनावरे निवडीची प्रक्रिया जिल्ह्याबाहेरील तज्ज्ञ अधिकाºयांमार्फत होणे गरजेचे आहे. तसा नियमदेखील आहे. या प्रक्रियेकरिता केवळ एका अधिकाºयाने हजेरी दर्शविली.त्यामुळे जिल्ह्यातील अधिकाºयांमार्फत निवड प्रक्रियेचे सोपस्कार पार पाडण्यात आले. प्रदर्शनाकरिता बोटावर मोजण्याइतकेच लोकप्रतिनिधी उपस्थित होते. त्यामुळे आयोजक अधिकाऱ्यांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असमन्वयाचाही प्रत्यय आला. कार्यक्रमाच्या संचालनात पशुधन विकास अधिकारी डॉ. अश्विन मेश्राम यांनी सन्माननीय पाहुण्यांचा चक्क एकेरी शब्दात नामोल्लेख केला. यात समाजकल्याण सभापती, कृषी व पशुसंवर्धन सभापती यांचा समावेश होता.हा विषयही प्रदर्शनस्थळी चर्चेचा विषय ठरला. आयोजनात नियोजनाचा पदोपदी अभाव असल्याने हे पशुप्रदर्शन ‘फ्लॉप शो’ ठरले. शासनाने या आयोजनावर केलेला खर्चही व्यर्थ ठरल्याचेच अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.जनावरे वाहतुकीसाठी तोकडी तरतूदपशुपालकांनी आपली जनावरे प्रदर्शनात सहभागी करावी याकरिता वाहतूक खर्च दिला जातो. मात्र, प्रतिजनावरे केवळ ३०० रुपये इतकी तोकडी तरतूद करण्यात आली. परिणामी अनेकांना अनावश्यक भुर्दंड सोसावा लागला. यात अधिकाºयांनी मोठे ‘अर्थ’कारण केल्याचा आरोपही पशुपालक आणि शेतकऱ्यांनी केला.

जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावीपशु प्रदर्शनाच्या आयोजनाकरिता जिल्हा नियोजन समितीतून पाच लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. एवढी भरीव तरतूद असतानाही अधिकाऱ्यांनी ‘पुअर शो’ केला. पशुपालक, शेतकºयांना आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या प्रदर्शनावर झालेल्या खर्चाचे स्वतंत्र लेखापरीक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणेला द्यावे, अशी मागणीही होत आहे.पैसा गेला तरी कुठे?पशुप्रदर्शनाच्या आयोजनाकरिता जिल्हा नियोजन समितीतून ५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. असे असतानाही प्रदर्शनस्थळी सोयी-सुविधांचा प्रचंड अभाव होता. निधी खर्चच करण्यात आला नसल्याचा आरोप शेतकरी-पशुपालकांनी केला. खर्च करताना संबंधित अधिकाऱ्यांना हात आखडता का घेतला, असावा याविषयीही चर्चेला पेव फुटले होते. एकूणच अधिकाºयांच्या उदासीनतेचा पशुपालक शेतकºयांना फटका बसला. आयोजनाची चौकशी करण्याची मागणी शेतकºयांनी केली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक