शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

ऐन दिवाळीत एटीएम ‘आऊट आॅफ सर्व्हिस’

By admin | Updated: November 10, 2015 02:45 IST

ऐन दिवाळी सणात शहरातील सर्व एटीएम केंद्र सोमवारी ‘आऊट आॅफ सर्व्हिस’ होते. यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला.

ग्राहकांची फजिती : बँकेत नागरिकांची रीघवर्धा : ऐन दिवाळी सणात शहरातील सर्व एटीएम केंद्र सोमवारी ‘आऊट आॅफ सर्व्हिस’ होते. यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. एटीएममधून होणारे व्यवहार ठप्प झाल्याने बँकेत ग्राहकांची रीघ पाहायला मिळाली. तर धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरल्या गेले. दिवाळीनिमित्त बँकेला सलग पाच दिवस सुटी आली आहे. यामुळे अनेकांनी सुविधेकरिता म्हणून जादाची रोख काढण्यासाठी एटीएम केंद्रावर गेले असता तिथे ‘आऊट आॅफ सर्व्हिस’ असे फलक पाहायला मिळाले. यानंतर अन्य बँकेच्या एटीएम केंद्राचा पर्याय पाहिला असता तिथेही व्यवहार शक्य झाले नाही. राष्ट्रीयकृत बँकेव्यतिरिक्त खासगी बँकेचेही एटीएम बंद होते. काही एटीएम केंद्राला लिंक नव्हती, तर काही केंद्र ‘आऊट आॅफ सर्व्हिस’ असल्याने रोख विड्रॉल करण्याकरिता आलेल्या ग्राहकांना आल्यापावली परत जावे लागले. याबाबत बँकेत विचारणा केली असता तांत्रिक बिघाड असल्याचे सांगत ग्राहकांची बोळवण करण्यात आली. काही ग्राहकांनी शहरातील सर्व एटीएम केंद्र पालथी घातली; मात्र मनस्ताप करण्याशिवाय पर्यायच नव्हता. गतवर्षी दिवाळीच्या सणाच्या काळात एटीएम केंद्राला बंदची घरघर लागली होती. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक व्यवहार करण्याकरिता बँक कार्यालयात जावे लागले होते. यंदाही असाच प्रकार घडत असल्याने बँक कार्यालयात ग्राहकांच्या रांगा होत्या.(स्थानिक प्रतिनिधी) धनत्रयोदशीला खरेदीचे खास महत्त्व असते. सोने-चांदी खरेदीला विशेष मान असतो. शिवाय घरात आज एकतरी वस्तू खरेदी करण्याचा प्रघात आहे. खरेदीकरिता निघालेल्या ग्राहकांना एटीएम केंद्र बंद असल्याने मनस्ताप झाला. शहरातील जवळपास सर्वच एटीएम केंद्र बंद असल्याने खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरल्या गेले. याबाबत विचारणा करण्याकरिता गेलेल्या ग्राहकांना तांत्रिक अडचण असल्याचे सांगत समजाविण्याचा प्रयत्न करण्यात आला.वेळेचा अपव्ययग्राहकांच्या वेळेचा अपव्यय होऊ नये. तसेच त्यांना कमी अंतरात रोख व्यवहार करता यावे म्हणून बँकेच्यावतीने ठिकठिकाणी एटीएम केंद्र सुरू करण्यात आले. मात्र त्याला बंदची घरघर असल्याने अनेकदा ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. याचाच प्रत्यय आजही आल्याने नागरिकांत संताप व्यक्त करण्यात आला. दिवाळीच्या काळात आर्थिक व्यवहार अधिक होतात. खात्यातून रक्कम विड्रॉल करण्याकरिता ग्राहकांच्या दरवर्षी बँकेत रांगा असतात. हा ताण कमी करण्याकरिता एटीएम सेवा सुरू करण्यात आली. मात्र या सेवेत वारंवार व्यत्यय येत असल्याने ग्राहकांकरिता ही सेवा सणासुदीच्या काळात डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येते.