शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत एटीएम ‘आऊट आॅफ सर्व्हिस’

By admin | Updated: November 10, 2015 02:45 IST

ऐन दिवाळी सणात शहरातील सर्व एटीएम केंद्र सोमवारी ‘आऊट आॅफ सर्व्हिस’ होते. यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला.

ग्राहकांची फजिती : बँकेत नागरिकांची रीघवर्धा : ऐन दिवाळी सणात शहरातील सर्व एटीएम केंद्र सोमवारी ‘आऊट आॅफ सर्व्हिस’ होते. यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला. एटीएममधून होणारे व्यवहार ठप्प झाल्याने बँकेत ग्राहकांची रीघ पाहायला मिळाली. तर धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरल्या गेले. दिवाळीनिमित्त बँकेला सलग पाच दिवस सुटी आली आहे. यामुळे अनेकांनी सुविधेकरिता म्हणून जादाची रोख काढण्यासाठी एटीएम केंद्रावर गेले असता तिथे ‘आऊट आॅफ सर्व्हिस’ असे फलक पाहायला मिळाले. यानंतर अन्य बँकेच्या एटीएम केंद्राचा पर्याय पाहिला असता तिथेही व्यवहार शक्य झाले नाही. राष्ट्रीयकृत बँकेव्यतिरिक्त खासगी बँकेचेही एटीएम बंद होते. काही एटीएम केंद्राला लिंक नव्हती, तर काही केंद्र ‘आऊट आॅफ सर्व्हिस’ असल्याने रोख विड्रॉल करण्याकरिता आलेल्या ग्राहकांना आल्यापावली परत जावे लागले. याबाबत बँकेत विचारणा केली असता तांत्रिक बिघाड असल्याचे सांगत ग्राहकांची बोळवण करण्यात आली. काही ग्राहकांनी शहरातील सर्व एटीएम केंद्र पालथी घातली; मात्र मनस्ताप करण्याशिवाय पर्यायच नव्हता. गतवर्षी दिवाळीच्या सणाच्या काळात एटीएम केंद्राला बंदची घरघर लागली होती. त्यामुळे ग्राहकांना आर्थिक व्यवहार करण्याकरिता बँक कार्यालयात जावे लागले होते. यंदाही असाच प्रकार घडत असल्याने बँक कार्यालयात ग्राहकांच्या रांगा होत्या.(स्थानिक प्रतिनिधी) धनत्रयोदशीला खरेदीचे खास महत्त्व असते. सोने-चांदी खरेदीला विशेष मान असतो. शिवाय घरात आज एकतरी वस्तू खरेदी करण्याचा प्रघात आहे. खरेदीकरिता निघालेल्या ग्राहकांना एटीएम केंद्र बंद असल्याने मनस्ताप झाला. शहरातील जवळपास सर्वच एटीएम केंद्र बंद असल्याने खरेदीच्या उत्साहावर पाणी फेरल्या गेले. याबाबत विचारणा करण्याकरिता गेलेल्या ग्राहकांना तांत्रिक अडचण असल्याचे सांगत समजाविण्याचा प्रयत्न करण्यात आला.वेळेचा अपव्ययग्राहकांच्या वेळेचा अपव्यय होऊ नये. तसेच त्यांना कमी अंतरात रोख व्यवहार करता यावे म्हणून बँकेच्यावतीने ठिकठिकाणी एटीएम केंद्र सुरू करण्यात आले. मात्र त्याला बंदची घरघर असल्याने अनेकदा ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. याचाच प्रत्यय आजही आल्याने नागरिकांत संताप व्यक्त करण्यात आला. दिवाळीच्या काळात आर्थिक व्यवहार अधिक होतात. खात्यातून रक्कम विड्रॉल करण्याकरिता ग्राहकांच्या दरवर्षी बँकेत रांगा असतात. हा ताण कमी करण्याकरिता एटीएम सेवा सुरू करण्यात आली. मात्र या सेवेत वारंवार व्यत्यय येत असल्याने ग्राहकांकरिता ही सेवा सणासुदीच्या काळात डोकेदुखी ठरत असल्याचे दिसून येते.