शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

संतप्त कापूस उत्पादकांनी रोखला वर्धा-यवतमाळ महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 10:52 AM

जिनिंग फॅक्टरीत कापूस टाकण्यासाठी जागा नसल्याचे कारण सांगून देवळी व परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बुधवारी सायंकाळपर्यंत कापसाच्या लिलावाअभावी वेठीस धरण्यात आले.

ठळक मुद्देजागेचे कारण दाखवून थांबविली होती कापूस खरेदीसायंकाळी उशीरा निघाला तोडगा

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: जिनिंग फॅक्टरीत कापूस टाकण्यासाठी जागा नसल्याचे कारण सांगून देवळी व परिसरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना बुधवारी सायंकाळपर्यंत कापसाच्या लिलावाअभावी वेठीस धरण्यात आले. मान्सूनपूर्व पावसाची रिपरिप तसेच चक्रीवादळाचा संभावीत धोका लक्षात घेवून या संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या हक्कासाठी वर्धा-यवतमाळ महामार्गावर येत रास्ता रोको आंदोलन केले.भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश बकाने यांनी कास्तकारांची बाजू घेवून बैठा सत्याग्रहात सहभाग घेतला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीतील नियोजनाचा अभाव तसेच जिनिंग मालकांच्या दुर्लक्षीत प्रवृत्तीचा निषेध करण्यात आला. अखेर सायंकाळी बाजार समितीचे सभापती मनोहर खडसे, तहसीलदार राजेश सरवदे, पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, नायब तहसीलदार राजेंद्र देशमुख, संचालक अयुब अली पटेल व अमोल कसनारे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत तोडगा निघाल्यानंतर कापसाच्या लिलावाला सुरुवात करण्यात आली. पावसाळा जवळ येवूनही कापसाच्या खरेदीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने सीसीआयची खरेदी असलेल्या जिनिंग मालकांची बैठक बोलावून धोरणात्मक निर्णय घेण्यात आले. या निर्णयानुसार येत्या काही दिवसात फक्त एक हजार कापूस गाड्यांची खरेदी व जिनिंग करण्याची अट टाकून भूमिका घेण्यात आली. त्यानुसार सीसीआयची खरेदी असलेल्या चार जिनिंगमध्ये २०० ते २५० कापूस गाड्या घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पण, या निर्णयाचा दोन दिवसातच फुगा फुटून कापूस उत्पादकांना लिलावाअभावी दिवसभर वेठीस धरण्यात आले. यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या गाड्या बाजार समितीच्या नियमानुसार मार्केट यार्डमध्ये आणल्या होत्या. सीसीआयचे ग्रेडर रमेश बोरवले यांची कापूस गाड्या घेण्यास कोणतीही अडचण नसताना जिनिंग मालकांकडून यामध्ये खोडा टाकण्यात आला. या जिनिंगमालकांची प्रशासनाच्यावतीने दिवसभर मनधरणी करूनही त्यांना कोणताही प्रतिसाद न दिल्याने या जिनिंगमालकांचे परवाने रद्द करण्याची मागणी याप्रसंगी आंदोलनकर्त्यांनी केली. बाजार समिती व जिनिंगमालक यांच्यातील निर्णयानुसार एक हजार कापूस गाड्या घेतल्यानंतर मार्केट यार्डमध्ये येणाऱ्या उर्वरित कापूस गाड्यांचे काय? याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम होता. सीसीआयच्या कापूस खरेदीची भिस्त जिनिंग कामगारावर अवलंबून असल्याचे चित्र रंगविले जात आहे. एक हजार क्विंटल कापसाची खरेदी केल्यानंतर संबंधीत जिनिंग कामगार आपल्या गृह राज्यात जाणार असल्याचे जिनिंग मालकांनी सांगितले. मान्सूनपूर्व पाऊस लक्षात घेता या केंद्रावरील कापूस खरेदी पुढील आदेशापर्यंत थांबविण्यात आली आहे.

जिनिंग मालकासोबतच्या निर्णयानुसार एक हजार क्विंटल कापसाची खरेदी झाल्यानंतरही काही जिनिंगमध्ये ही खरेदी सुरू राहणार आहे. पावसाचा अंदाज घेवून टप्प्याटप्प्याने ही खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.- मनोहर खडसे, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, पुलगाव.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस