शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

अन् ‘मेड इन वर्धा’ निर्माण करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:27 IST

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत ‘मेड इन इंडिया’ चा नारा दिला होता. मात्र, मागील चार वर्षांत मोबाईलसह बुटापर्यंत सर्वच वस्तूंवर ‘मेड इन चायना’ लिहिल्याचे दिसून येते.

ठळक मुद्देराहुल गांधी : शेतकऱ्यांना ७० हजार कोटींची कर्जमाफी देण्याचे आश्वासन

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत ‘मेड इन इंडिया’ चा नारा दिला होता. मात्र, मागील चार वर्षांत मोबाईलसह बुटापर्यंत सर्वच वस्तूंवर ‘मेड इन चायना’ लिहिल्याचे दिसून येते. काँग्रेसचे सरकार देशात आल्यास ‘मेड इन इंडिया पासून मेड इन वर्धा’ पर्यंत वस्तू निर्माण करून बेरोजगारांना काम देऊ, असे आश्वासन काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी दिले. स्थानिक सर्कस मैदानावरील काँग्रेस संकल्प मेळाव्यात ते बोलत होते.याप्रसंगी राहुल गांधी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टिका केली. काँग्रेसच्या काळात सोयाबीनचा भाव ४ हजार ५०० होता. भाजपच्या काळात अडीच हजार क्विंटलने सोयाबीन विकावे लागत आहे. काँग्रेसच्या काळात तुरीला ९ हजार होता. तर भाजपच्या काळात तुरीचा भाव ४ हजार रुपये झाला. देशातील विविध प्रांतातील शेतकरी मोदी सरकारकडे हात जोडून कर्जमाफी मागत आहे. परंतु सरकार त्याला कर्जमाफी द्यायला तयार नाही. काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास ७० हजार कोटींची कर्जमाफी दिली जाईल, असे भरीव आश्वासनही खा. राहुल गांधी यांनी दिले.स्थानिक नेत्यांनी केला मान्यवरांचा सत्कारजाहीर सभेत खासदार राहुल गांधी यांचा सत्कार आमदार रणजीत कांबळे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चारूलता टोकस यांनी केला. सोनिया गांधी, डॉ. मनमोहनसिंग, पी. चिदंबरम् आदींचा सत्कार आमदार अमर काळे, शेखर शेंडे, राधाकृष्ण विखे पाटील आदींनी केला.गांधीभूमी झाली काँग्रेसमयमहात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी आज अखिल भारतीय कॉंग्रेस पार्टीच्यावतीने सेवाग्राम परिसरात कार्यकारिणीची बैठक आणि शहरात पदायात्रा व जाहीर सभेचे आयोजन केले होते. यासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.राहुल गांधी, माजी अध्यक्षा सोनिया गांधी व माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह देशभरातील काँग्रेसचे नेते वर्ध्यात आले होते. खा.राहुल गांधी संबोधित करणार असल्याने महाराष्ट्रातून हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी वर्ध्यात दाखल झाले होते. त्यामुळे शहरातील मार्गामार्गावर हातात कॉग्रेसचे झेंडे आणि गळ्यात दुपट्टाधारण केलेले कार्यकर्ते फि रताना दिसत होते.कार्यकर्त्यांचे लोंढे सकाळपासूनच दाखलकाँग्रेसच्या कार्यक्रमाकरिता देशभरातील नेते मंडळी आणि महाराष्ट्रातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित झाले होते. काही पदाधिकारी व कार्यकर्ते सोमवारी तर काही मंगळवारी सकाळापासून वर्ध्यात आले. त्यांनी शहरातील जेल रोडवर आपली वाहने उभी केली होती. तर काही कार्यक्रमस्थळी सर्कस मैदानावर उपस्थित झाले. काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकाºयांचे लोंढे गांधी चौकात दाखल झाल्याने घोषणांमुळे परिसर दणाणून गेला होता.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस