शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांना भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 05:00 IST

पॅसेंजर रेल्वेगाड्यांमधून जास्तीत जास्त गरीब प्रवासी प्रवास करताना दिसतात. प्रवासभाडे कमी असल्याने सवारी गाड्यांमधून प्रवास करताना दिसतात. मात्र, सध्या पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्याने गरीब प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून चांगलाच आर्थिक फटका बसत आहे. पॅसेंजर गाड्या अभावी गरीब प्रवाशांची होरपळ होत असल्याचे चित्र बघावयास मिळत असून वेळीच पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू झाल्यास सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळेल.

ठळक मुद्देकेवळ विशेष रेल्वेगाड्याच सुरू

  लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यातील सर्व रेल्वेस्थानकाहून केवळ कोविड विशेष रेल्वेगाड्या धावतात. त्यातही आरक्षण असल्याशिवाय रेल्वेगाडीत बसता येत नसल्याने अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच होरपळ होत असून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे. वर्धा रेल्वेस्थानक हे जंक्श्न असल्याने या स्थानकावरुन मोठ्याप्रमाणात रेल्वेगाड्या धावतात. सध्या वर्धा रेल्वेस्थानकावरुन अप आणि डाऊन मार्गावर ३६ कोविड स्पेशल ट्रेन धावत आहेत. मात्र, वर्धा येथून पुलगाव, धामणगाव, हिंगणघाट, सेलू रोड, बडनेरा आदी ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी गाड्या बंद केल्याने बाहेरगावी शिक्षण घेणारे, नोकरीवर असणारे तसेच विविध शासकीय कार्यालयासह बॅंकेत काम करणाऱ्यांसह गोरगरीबांची होरपळ होत असून जादा प्रवासभाडे देवून त्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. यात सर्वसामान्य प्रवाशांचे कंबरडे मोडत असल्याने  पॅसेंजर सुरु करण्याची मागणी आहे.

पुणे, मुंबई रेल्वेगाड्या सुरू सध्या ३६ स्पेशल गाड्या वर्धा रेल्वेस्थानकावरून धावतात. त्यामध्ये विर्दर्भ एक्सप्रेस, मेल एक्सप्रेस, नागपूर ते पुणे एक्सप्रेस आदी रेल्वेगाड्या धावतात. मात्र, या गाड्यांमध्ये आरक्षण असल्याशिवाय बसता येत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे.

नागपूर-भूसावळ-नागपूर पॅसेंजर गाडी बंदचनागपूर ते भूसावळ तसेच भूसावळ ते नागपूर, नागपूर ते बल्लारशाह आदी  ६ प्रवासी रेल्वेगाड्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही बंद आहे. त्या सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

रेल्वेत आरक्षणाविना प्रवासास बंदी आहे. एका सीटवर तीन प्रवासी असे धोरण असल्याने अप-डाऊन शक्य नाही. खासगी वाहनाने जास्त खर्च लागत असून पॅसेंजर गाड्या सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. - डॉ. नीलेश वाघ, अध्यक्ष प्रवासी संघटना.  

गरीब प्रवाशांसमोर आर्थिक संकटपॅसेंजर रेल्वेगाड्यांमधून जास्तीत जास्त गरीब प्रवासी प्रवास करताना दिसतात. प्रवासभाडे कमी असल्याने सवारी गाड्यांमधून प्रवास करताना दिसतात. मात्र, सध्या पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्याने गरीब प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून चांगलाच आर्थिक फटका बसत आहे. पॅसेंजर गाड्या अभावी गरीब प्रवाशांची होरपळ होत असल्याचे चित्र बघावयास मिळत असून वेळीच पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू झाल्यास सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळेल. 

टॅग्स :railwayरेल्वेCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या