शहरं
Join us  
Trending Stories
1
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
2
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
3
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
4
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
5
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
6
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
7
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
8
धुळ्यात भरचौकात गोळीबार करत मुंबईतील ज्वेलर्सच्याय कर्मचाऱ्यांकडून लाखोंचे सोने लुटले
9
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  
10
वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल
11
IND vs ENG: चेंडू खेळला नाही म्हणून पंचांनी गिलला दिलं OUT; स्टोक्सच्या गोलंदाजीवर काय घडलं? (VIDEO)
12
बहीण मित्रासोबत गेली लॉजवर, पाठलाग करत पोहचला भाऊ, रंगेहात पकडलं आणि...
13
IND vs ENG : यशस्वीची फिफ्टी ठरली खास; कारण ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानात ५० वर्षांनी असं घडलं
14
Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!
15
मुंबईकरांसाठी खुशखबर! शहराला पाणीपुरवठा करणारा तानसा तलाव ओसंडून वाहू लागला!
16
३२ लाखांची FD, संपत्तीची हाव... दत्तक मुलाचं आईसोबत भयंकर कृत्य, आता मिळाली शिक्षा
17
VIDEO: कॉलर पकडली, डोक्यावर फाईट मारली.. भिवंडीत टेम्पोचालक व पोलिसांमध्ये तुंबळ हाणामारी
18
चार किलो सोनं चोरलं, जुगारात २५ लाख जिंकले, पण सेकंड हॅड मोबाईलच्या नादात अडकला चोर  
19
...अन् यशस्वी जैस्वालची बॅट दांड्यातून निखळली; किती वेगाने आला होता चेंडू? जाणून घ्या बॅटची किंमत
20
गुजरात ATS ची मोठी कारवाई; अल-कायदाशी संबंधित चार दहशतवाद्यांना अटक

पॅसेंजर गाड्या बंद असल्यामुळे अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांना भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 05:00 IST

पॅसेंजर रेल्वेगाड्यांमधून जास्तीत जास्त गरीब प्रवासी प्रवास करताना दिसतात. प्रवासभाडे कमी असल्याने सवारी गाड्यांमधून प्रवास करताना दिसतात. मात्र, सध्या पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्याने गरीब प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून चांगलाच आर्थिक फटका बसत आहे. पॅसेंजर गाड्या अभावी गरीब प्रवाशांची होरपळ होत असल्याचे चित्र बघावयास मिळत असून वेळीच पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू झाल्यास सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळेल.

ठळक मुद्देकेवळ विशेष रेल्वेगाड्याच सुरू

  लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जिल्ह्यातील सर्व रेल्वेस्थानकाहून केवळ कोविड विशेष रेल्वेगाड्या धावतात. त्यातही आरक्षण असल्याशिवाय रेल्वेगाडीत बसता येत नसल्याने अप-डाऊन करणाऱ्या प्रवाशांची चांगलीच होरपळ होत असून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो आहे. वर्धा रेल्वेस्थानक हे जंक्श्न असल्याने या स्थानकावरुन मोठ्याप्रमाणात रेल्वेगाड्या धावतात. सध्या वर्धा रेल्वेस्थानकावरुन अप आणि डाऊन मार्गावर ३६ कोविड स्पेशल ट्रेन धावत आहेत. मात्र, वर्धा येथून पुलगाव, धामणगाव, हिंगणघाट, सेलू रोड, बडनेरा आदी ठिकाणी जाण्यासाठी प्रवासी गाड्या बंद केल्याने बाहेरगावी शिक्षण घेणारे, नोकरीवर असणारे तसेच विविध शासकीय कार्यालयासह बॅंकेत काम करणाऱ्यांसह गोरगरीबांची होरपळ होत असून जादा प्रवासभाडे देवून त्यांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. यात सर्वसामान्य प्रवाशांचे कंबरडे मोडत असल्याने  पॅसेंजर सुरु करण्याची मागणी आहे.

पुणे, मुंबई रेल्वेगाड्या सुरू सध्या ३६ स्पेशल गाड्या वर्धा रेल्वेस्थानकावरून धावतात. त्यामध्ये विर्दर्भ एक्सप्रेस, मेल एक्सप्रेस, नागपूर ते पुणे एक्सप्रेस आदी रेल्वेगाड्या धावतात. मात्र, या गाड्यांमध्ये आरक्षण असल्याशिवाय बसता येत नाही. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत आहे.

नागपूर-भूसावळ-नागपूर पॅसेंजर गाडी बंदचनागपूर ते भूसावळ तसेच भूसावळ ते नागपूर, नागपूर ते बल्लारशाह आदी  ६ प्रवासी रेल्वेगाड्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अजूनही बंद आहे. त्या सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.

रेल्वेत आरक्षणाविना प्रवासास बंदी आहे. एका सीटवर तीन प्रवासी असे धोरण असल्याने अप-डाऊन शक्य नाही. खासगी वाहनाने जास्त खर्च लागत असून पॅसेंजर गाड्या सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे. - डॉ. नीलेश वाघ, अध्यक्ष प्रवासी संघटना.  

गरीब प्रवाशांसमोर आर्थिक संकटपॅसेंजर रेल्वेगाड्यांमधून जास्तीत जास्त गरीब प्रवासी प्रवास करताना दिसतात. प्रवासभाडे कमी असल्याने सवारी गाड्यांमधून प्रवास करताना दिसतात. मात्र, सध्या पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद असल्याने गरीब प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत असून चांगलाच आर्थिक फटका बसत आहे. पॅसेंजर गाड्या अभावी गरीब प्रवाशांची होरपळ होत असल्याचे चित्र बघावयास मिळत असून वेळीच पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू झाल्यास सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा मिळेल. 

टॅग्स :railwayरेल्वेCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या