शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
4
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
5
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
6
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
7
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
8
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
9
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
10
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
12
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
13
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
15
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
16
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
17
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
19
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
20
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले

कारागृहातून घरी येताच व्यक्तीच्या घरावर सशस्त्र हल्ला; दोन आरोपी अटकेत, दोघांचा शोध सुरु

By चैतन्य जोशी | Updated: September 6, 2022 17:33 IST

ईतवारा येथील घटना

वर्धा : कारागृहातून सुटल्यावर पहिल्यांदाच घरी गेलेल्या व्यक्तीच्या घरावर चार युवकांनी सशस्त्र हल्ला करुन लाठ्या काठ्यांनी तसेच रॉडने युवकास मारहाण करीत जखमी केले. ही घटना ईतवारा परिसरात ५ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. शहर पोलिसांनी रात्री उशिरा यातील दोन आरोपींना अटक केली. तर दोघांचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती दिली. राजू उर्फ बबलू भीमराव भगत (४२) असे जखमीचे नाव आहे. तर पोलिसांनी अटक केलेल्यांत सागर गेडाम रा. इतवारा आणि गुड्डू लोखंडे रा. रामनगर यांचा समावेश आहे. सागर घोडे रा. बोरगाव मेघे व अमोल गेडाम याचा शोध पोलीस घेत आहेत.

राजू उर्फ बबलू भगत याने सागर गेडाम याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणात राजू हा कारागृहात होता. चार महिन्यांपूर्वी राजू हा कारागृहातून सुटला होता. मात्र, जीवाच्या भितीमुळे तो घरी न परतता थेट मुंबई येथे वास्तव्य करीत होता. ५ रोजी तो मुंबईवरुन सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास त्याच्या ईतवारा येथील घरी परतला. तो त्याच्या कुटुंबासह घरी असताना रात्रीच्या सुमारास सागर गेडाम, गुड्डू लोखंडे, सागर घोडे, अमोल गेडाम हे हातात लाठ्याकाठ्या तसेच रॉड घेऊन राजूच्या घरात अनाधिकृतपणे शिरले.

सागर गेडाम याने तु कारागृहातून सुटून आला आता तुला जिवाने ठार मारतो, अशी धमकी देत रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. राजूच्या डोक्यावर मारहाण करीत त्यास जखमी केले. तसेच इतर तिन्ही आरोपींनी देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. घरात सुरु असलेली मारहाण पाहून राजूची पत्नी व मुलाने घरातून पळ काढत परिसरात आरडाओरड करण्यास सुरुवात केली. लोकांची गर्दी जमा होताच चारही आरोपींनी तेथून पळ काढला. याप्रकरणी राजूने शहर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन सागर गेडाम आणि गुड्डू लोखंडे या दोघांना रात्रीच अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बैरागी यांनी दिली.

‘राजू’ पहिल्यांदाच आला घरी

राजू भगत याने पाच महिन्यांपूर्वी सागर गेडाम याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून तो कारागृहात होता. चार महिन्यांपूर्वी राजू कारागृहातून बाहेर आला. मात्र, जिवाच्या भीतीमुळे तो घरी न जाता थेट मुंबईला गेला. मुंबईवरुन परतताच याची भनक आरोपींना लागली अन् आरोपींनी थेट राजूच्या घरावर चाल करुन सागरच्या मारहाणीचा वचपा काढला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwardha-acवर्धा