शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

बँक ऑफ इंडियासमोर ‘प्रहार’चे ढोलताशा आंदोलन; तत्कालीन व्यवस्थापकावर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 18:38 IST

तत्कालीन कर्मचाऱ्यांवर कार्यवाही व्हावी, ज्या गरीब, शेतकरी, शेतमजूर, निराधारांचे पैसे बँक मित्र व कर्मचाऱ्यांनी हडपले ते त्यांना तत्काळ मिळण्यासाठी सर्व पीडित खातेधारक व प्रहार कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले.

आर्वी (वर्धा) :बँक ऑफ इंडिया शाखेतील बँक मित्राने बँकेतील तत्कालीन कर्मचारी व व्यवस्थापकाच्या संगनमताने कोटी रुपयांचा केलेला अपहार प्रहारचे बाळा जगताप यांनी उघडकीस आणला होता. मात्र, घोटाळ्यातील बँक मित्रासह तत्कालीन शाखा व्यवस्थापक व बँक कर्मचाऱ्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रहारचे बाळा जगताप यांच्या नेतृत्वात बँक ऑफ इंडिया शाखेसमोर ढोलताशा वाजवून अधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले.

तत्कालीन कर्मचाऱ्यांवर कार्यवाही व्हावी, ज्या गरीब, शेतकरी, शेतमजूर, निराधारांचे पैसे बँक मित्र व कर्मचाऱ्यांनी हडपले ते त्यांना तत्काळ मिळण्यासाठी सर्व पीडित खातेधारक व प्रहार कार्यकर्त्यांनी हे आंदोलन सुरू केलेले आहे.

यापूर्वी केलेल्या आंदोलन व बैठकीनंतर पीडित ग्राहकांना त्यांचे नुकसानाचे पैसे मिळणे सुरू झाले होते. काही ग्राहकांना पैसेही मिळाले. मात्र,त्यानंतर याकडे दुर्लक्ष झाले. तत्कालीन कर्मचाऱ्यांवर कार्यवाही न करता बँक प्रशासन त्यांना यापेक्षाही मोठा दरोडा टाकण्याची सूट तर देत नाही ना? हा प्रश्न यानिमित्ताने उभा होतो. या सर्व प्रकरणात सहभागी सर्वांची चौकशी करून गुन्हे दाखल करावे, अशी मागणी बाळा जगताप यांनी आंदोलनादरम्यान केली.

टॅग्स :agitationआंदोलनbankबँकBank of Indiaबँक ऑफ इंडियाarvi-acआर्वी