शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

प्रशासनाने कडक निर्बंध वाढविला; फळे-भाजीपाला शेतातच सडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 05:00 IST

कडक लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाला व फळे विक्री करण्यास ब्रेक लागला. त्यामुळे बेलोरा (बुजरुक) येथील ११ शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पिकविलेले २६० टन टरबूज आणि खरबूज खराब झाले. बरीच फळे सडली असून ती शेताच्या बांधावर फेकावी लागली तर काही जनावरांना चारावी लागल्याने तब्बल १६ लाखांचे नुकसान झाले.

ठळक मुद्देबेलोराच्या अकरा शेतकऱ्यांचा टाहो, २६० टन टरबूज-खरबुजाचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरुवातीला पाच दिवस कडक लॉकडाऊन लावला. त्यामध्ये आता पुन्हा पाच दिवसांची मुदतवाढ करण्यात आल्याने सर्व उलाढाल ठप्प झाली आहे. याचा सर्वाधिक फटका शेतमाल उत्पादकांना बसला असून शेतकऱ्यांना फळे व भाजीपाला शेताच्या बांधावर किंवा जनावरांना चारण्याची वेळ आली आहे. आधीच खरीप हंगाम आणि रब्बी हंगामात तोट्यात गेल्यानंतर आता  उन्हाळी पिकेही लॉकडाऊनमुळे हातची गेली आहेत.कडक लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाला व फळे विक्री करण्यास ब्रेक लागला. त्यामुळे बेलोरा (बुजरुक) येथील ११ शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पिकविलेले २६० टन टरबूज आणि खरबूज खराब झाले. बरीच फळे सडली असून ती शेताच्या बांधावर फेकावी लागली तर काही जनावरांना चारावी लागल्याने तब्बल १६ लाखांचे नुकसान झाले. बेलोरा येथील हुकुम जाणे, उमेश अरुण जाणे, उमेश दयाराम जाणे, वीरेंद्र जाणे, गजानन जाणे, अशोक बोरवार, मनोहर गडलिंग, नकुल जाणे, अजय जाणे, सुरेश जाणे, रमेश जाणे या अकरा शेतकऱ्यांनी टरबूज व खरबूज या फळांची लागवड केली होती. उन्हाळ्यात या फळांना मोठी मागणी राहत असल्याने शेतकऱ्यांनी चांगलीच मेहनत घेतली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या फळबागाही चांगल्या बहरल्यामुळे भरघोस उत्पन्न मिळण्याची आशा पल्लवित झाली होती. मात्र, फळे तोडणीवर आल्यानंतर अचानक प्रशासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केल्याने आष्टी, आर्वी व कारंजा हे तिन्ही तालुक्यांचे ठिकाण कडकडीत बंद होते. त्यामुळे शेतमाल शेतातच पडून राहिल्याने खराब झाला. शेवटी सर्व शेतकऱ्यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी फळे जनावरांना खाऊ घातली. आर्वीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना घरपोच फळे विक्री करण्यासाठी परवानगी दिली. मात्र, तोपर्यंत या शेतकऱ्यांच्या हातून चांगली फळे निघून गेली होती. आता सडलेला माल कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

शेतकऱ्यांसाठीचे नियोजनच कोलमडलेजिल्हा प्रशासनासह जिल्हा कृषी अधीक्षक व आत्मा प्रकल्पाच्या संचालकांनी या लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांचा शेतमाल विकण्याकरिता नियोजन करणे अपेक्षित होते; परंतु कोणतेही नियोजन न करता कडक लॉकडाऊन करून त्यात मुदतवाढ केली. बऱ्याच फळ व भाजीपाला उत्पादकांचा शेतमाल खराब झाल्यानंतर घरपोच विक्री करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊन काळात सुरुवातीपासून शेतकऱ्यांना विक्री करण्याकरिता पासेस दिल्या असत्या तर ही वेळ आली नसती, असा संताप शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. प्रशासनाच्या या नियोजनशून्यतेचा शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे.

नरसुल्याच्या शेतकऱ्याचेही नुकसाननरसुला येथील शेतकरी आशिष साठोणे यांनी साडेतीन एकरामध्ये डांगर आणि खरबुजाची लागवड केली. या दोन्ही पिकांच्या लागवडीकरिता एकरी ७० हजार रुपये खर्च आला. यासोबतच या फळांना चांगले रसदार करण्यासाठी शेतकरी परिवाराने मोठे परिश्रम घेतले. फळही चांगले बहरल्याने त्यांनी विकण्याकरिता तोडणी केली. मात्र, अचानक लॉकडाऊन लागल्याने फळे शेतातच पडून आहेत. आता लॉकडाऊन वाढविल्याने सर्व फळे जागेवर खराब झाल्याने आशिष साठोणे यांना आतापर्यंत दीड लाखांचे नुकसान सहन करावे लागले. या फळांच्या विक्रीकरिता प्रशासनाने परवानगी दिली नाही, तर या नुकसानीमध्ये आणखीच भर पडणार असल्याचेही साठोणे यांनी सांगितले.

तोंडले, वांगे पिकले; चवळी जरड झालीवर्ध्यालगतच्या उमरी (मेघे) येथील वाल्मिक उघडे या शेतकऱ्याने सव्वा एकरामध्ये तोंडले, एक एकरात चवळी आणि अर्ध्या एकरामध्ये वांग्याची लागवड केली. या तिन्ही पिकांच्या विक्रीतून लॉकडाऊनपूर्वी वीस हजार रुपये एका हप्ताचे यायचे. आता पीक चांगले बहरल्याने उत्पादनही चांगले निघत आहे; परंतु बाजारपेठ बंद असल्याने विक्री करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे सध्या वांगे आणि तोंडली झाडालाच पिकली असून चवळी जरड व्हायला लागली आहे. यामुळे दर दिवसाला दहा हजार रुपयांचे नुकसान होत आहे.

 

टॅग्स :vegetableभाज्याcorona virusकोरोना वायरस बातम्या