शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
2
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
3
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
4
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
5
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
6
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
7
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
8
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
11
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
12
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
13
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
14
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
15
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
16
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
17
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
18
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
19
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
20
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
Daily Top 2Weekly Top 5

आदर्शनगरवासींची घागरीसह ग्रामपंचायत कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 21:14 IST

आदर्शनगर येथील रहिवासी पाणीसमस्येचा सामना करीत आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने आश्वासनापलीकडे काहीही केले नाही. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी शनिवारी रिकाम्या घागरीसह ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत आवारात धरणे दिले.

ठळक मुद्देदिले धरणे, टंचाईवर तोडगा काढण्याची मागणी । तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : आदर्शनगर येथील रहिवासी पाणीसमस्येचा सामना करीत आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने आश्वासनापलीकडे काहीही केले नाही. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी शनिवारी रिकाम्या घागरीसह ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत आवारात धरणे दिले. सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देत पाणीटंचाईवर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करीत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला.दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच आदर्श नगरवासीयांना पाणी समस्येचा सामना करावा लागतो. आश्वासन आणि थातूरमातूर उपाययोजना करून बोळवणूक करण्यात येते. ग्रामपंचायत कार्यालयात याबाबत चौकशी केली तर उलटसुलट उत्तरे दिली जातात. इतकी वर्षे लोटूनही ग्रा.पं. प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही. पाणी समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येइल असा इशारा रहिवाशांनी दिला.शनिवारी ग्रामपंचायतीची मासिक सभा सुरू असताना संतप्त नागरिकांनी धडक दिली. यावेळी नवनिर्वाचित सदस्य मुरलीधर कुमरे व अर्चना कांबळे, विमल बोरकर, गीता गावंडे, रिना पाटील, वंदना खंडारकर, शुभांगी परचाके, नमिता ताकसांडे, शोभा वाघमारे, निर्मला मानकर, पंकज भुजाडे, शंकर ताकसांडे, राहुल पंधरे, आदेश कांबळे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.अगोदरच पाणी समस्येने रहिवासी त्रस्त झाले असून ग्रा.पं.प्रशासन खोटे आश्वासन देऊन दिशाभूल करीत आहे.दरवर्षीच पाण्याची समस्या उभी ठाकते. मात्र, ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. रहिवाशांनी त्रासच सहन करायचा का? पाणीसमस्येवर लवकर तोडगा काढण्यात यावा.-रोशन तेलंग,रहिवासी आदर्शनगर.आदर्शनगरात पाणीटंचाई आहे. उपाययोजनेबाबतचा ठराव घेण्यात आला असून सोमवारी जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल. टँकरने पाणीपुरवठा किंवा अन्य ठिकाणाहून उपाययोजना करावी याकरिता जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.-रोशना जामलेकर, सरपंच सेवाग्राम.पथदिव्यांचे देयक जि.प.भरत होते. ते त्यांनी भरण्यास नकार दिला. आता देयक थकीत आहे. वीज वितरण कंपनीला प्राकलन पाठविले; पण त्यांनीसुद्धा ते मान्य केले नाही. ज्या विहिरीतून पाणी देण्याचे ठरले होते, तेथे वीजजोडणी नसल्याने आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी काम करायला तयार नसल्याने तो प्रस्ताव बारगळला.- संजय जवादे, सदस्य आदर्शनगर.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई