शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

आदर्शनगरवासींची घागरीसह ग्रामपंचायत कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 21:14 IST

आदर्शनगर येथील रहिवासी पाणीसमस्येचा सामना करीत आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने आश्वासनापलीकडे काहीही केले नाही. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी शनिवारी रिकाम्या घागरीसह ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत आवारात धरणे दिले.

ठळक मुद्देदिले धरणे, टंचाईवर तोडगा काढण्याची मागणी । तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : आदर्शनगर येथील रहिवासी पाणीसमस्येचा सामना करीत आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने आश्वासनापलीकडे काहीही केले नाही. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी शनिवारी रिकाम्या घागरीसह ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत आवारात धरणे दिले. सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देत पाणीटंचाईवर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करीत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला.दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच आदर्श नगरवासीयांना पाणी समस्येचा सामना करावा लागतो. आश्वासन आणि थातूरमातूर उपाययोजना करून बोळवणूक करण्यात येते. ग्रामपंचायत कार्यालयात याबाबत चौकशी केली तर उलटसुलट उत्तरे दिली जातात. इतकी वर्षे लोटूनही ग्रा.पं. प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही. पाणी समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येइल असा इशारा रहिवाशांनी दिला.शनिवारी ग्रामपंचायतीची मासिक सभा सुरू असताना संतप्त नागरिकांनी धडक दिली. यावेळी नवनिर्वाचित सदस्य मुरलीधर कुमरे व अर्चना कांबळे, विमल बोरकर, गीता गावंडे, रिना पाटील, वंदना खंडारकर, शुभांगी परचाके, नमिता ताकसांडे, शोभा वाघमारे, निर्मला मानकर, पंकज भुजाडे, शंकर ताकसांडे, राहुल पंधरे, आदेश कांबळे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.अगोदरच पाणी समस्येने रहिवासी त्रस्त झाले असून ग्रा.पं.प्रशासन खोटे आश्वासन देऊन दिशाभूल करीत आहे.दरवर्षीच पाण्याची समस्या उभी ठाकते. मात्र, ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. रहिवाशांनी त्रासच सहन करायचा का? पाणीसमस्येवर लवकर तोडगा काढण्यात यावा.-रोशन तेलंग,रहिवासी आदर्शनगर.आदर्शनगरात पाणीटंचाई आहे. उपाययोजनेबाबतचा ठराव घेण्यात आला असून सोमवारी जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल. टँकरने पाणीपुरवठा किंवा अन्य ठिकाणाहून उपाययोजना करावी याकरिता जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.-रोशना जामलेकर, सरपंच सेवाग्राम.पथदिव्यांचे देयक जि.प.भरत होते. ते त्यांनी भरण्यास नकार दिला. आता देयक थकीत आहे. वीज वितरण कंपनीला प्राकलन पाठविले; पण त्यांनीसुद्धा ते मान्य केले नाही. ज्या विहिरीतून पाणी देण्याचे ठरले होते, तेथे वीजजोडणी नसल्याने आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी काम करायला तयार नसल्याने तो प्रस्ताव बारगळला.- संजय जवादे, सदस्य आदर्शनगर.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई