शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

आदर्शनगरवासींची घागरीसह ग्रामपंचायत कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 21:14 IST

आदर्शनगर येथील रहिवासी पाणीसमस्येचा सामना करीत आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने आश्वासनापलीकडे काहीही केले नाही. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी शनिवारी रिकाम्या घागरीसह ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत आवारात धरणे दिले.

ठळक मुद्देदिले धरणे, टंचाईवर तोडगा काढण्याची मागणी । तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : आदर्शनगर येथील रहिवासी पाणीसमस्येचा सामना करीत आहे. मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने आश्वासनापलीकडे काहीही केले नाही. त्यामुळे संतप्त रहिवाशांनी शनिवारी रिकाम्या घागरीसह ग्रामपंचायत कार्यालयावर धडक देत आवारात धरणे दिले. सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देत पाणीटंचाईवर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी करीत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला.दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच आदर्श नगरवासीयांना पाणी समस्येचा सामना करावा लागतो. आश्वासन आणि थातूरमातूर उपाययोजना करून बोळवणूक करण्यात येते. ग्रामपंचायत कार्यालयात याबाबत चौकशी केली तर उलटसुलट उत्तरे दिली जातात. इतकी वर्षे लोटूनही ग्रा.पं. प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही. पाणी समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, अन्यथा आंदोलन करण्यात येइल असा इशारा रहिवाशांनी दिला.शनिवारी ग्रामपंचायतीची मासिक सभा सुरू असताना संतप्त नागरिकांनी धडक दिली. यावेळी नवनिर्वाचित सदस्य मुरलीधर कुमरे व अर्चना कांबळे, विमल बोरकर, गीता गावंडे, रिना पाटील, वंदना खंडारकर, शुभांगी परचाके, नमिता ताकसांडे, शोभा वाघमारे, निर्मला मानकर, पंकज भुजाडे, शंकर ताकसांडे, राहुल पंधरे, आदेश कांबळे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.अगोदरच पाणी समस्येने रहिवासी त्रस्त झाले असून ग्रा.पं.प्रशासन खोटे आश्वासन देऊन दिशाभूल करीत आहे.दरवर्षीच पाण्याची समस्या उभी ठाकते. मात्र, ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. रहिवाशांनी त्रासच सहन करायचा का? पाणीसमस्येवर लवकर तोडगा काढण्यात यावा.-रोशन तेलंग,रहिवासी आदर्शनगर.आदर्शनगरात पाणीटंचाई आहे. उपाययोजनेबाबतचा ठराव घेण्यात आला असून सोमवारी जिल्हाधिकारी यांना देण्यात येईल. टँकरने पाणीपुरवठा किंवा अन्य ठिकाणाहून उपाययोजना करावी याकरिता जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.-रोशना जामलेकर, सरपंच सेवाग्राम.पथदिव्यांचे देयक जि.प.भरत होते. ते त्यांनी भरण्यास नकार दिला. आता देयक थकीत आहे. वीज वितरण कंपनीला प्राकलन पाठविले; पण त्यांनीसुद्धा ते मान्य केले नाही. ज्या विहिरीतून पाणी देण्याचे ठरले होते, तेथे वीजजोडणी नसल्याने आणि वीज वितरण कंपनीचे अधिकारी काम करायला तयार नसल्याने तो प्रस्ताव बारगळला.- संजय जवादे, सदस्य आदर्शनगर.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई