शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

आश्रमातील उपक्रम देतात बापूंच्या कार्याची साक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2019 06:00 IST

महात्मा गांधीजींची जयंती अहिंसा दिवस म्हणून साजरी करण्याचे संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केले तर बापूंनी चरखा दिवस म्हणून सांगितले. बापूंचे जीवन व कार्य पाहिले तर अहिंसा आणि चरखा हे दोन्ही शस्त्र त्यांची ताकद होती. त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग होता. सेवाग्राम आश्रमात असताना चरखा आणि ग्रामोद्योगाला चालणा देण्याचे काम सुरू केले. जे आजही सुरू आहे.

ठळक मुद्देदिनविशेष : अनेक जण होणार नतमस्तक

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : महत्मा गांधी यांनी येथील आश्रमातूनच स्वातंत्र्य चळवलीला दिशा देण्याचे काम केले. २ आॅक्टोबरचे औचित्य साधून येथे अनेकजण नतमस्तक होणार असून आजही आश्रमातील विविध उपक्रम बाजूंच्या कार्याची साक्ष देत असल्याचे बघावयास मिळते.महात्मा गांधीजींची जयंती अहिंसा दिवस म्हणून साजरी करण्याचे संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केले तर बापूंनी चरखा दिवस म्हणून सांगितले. बापूंचे जीवन व कार्य पाहिले तर अहिंसा आणि चरखा हे दोन्ही शस्त्र त्यांची ताकद होती. त्यांच्या जीवनातील महत्त्वाचा भाग होता. सेवाग्राम आश्रमात असताना चरखा आणि ग्रामोद्योगाला चालणा देण्याचे काम सुरू केले. जे आजही सुरू आहे. बापूंचा आश्रम नियम, कार्य, उद्योग आदी तत्व व मूल्यांवर आधारीत होता. जो आजही कायम असल्याने इथे येणाऱ्यांना नवी उर्जाच मिळते. शिवाय येथील सुरू असलेले उपक्रम बापूंच्या कार्य व विचारांची साक्ष देतात. गांधीजींनी आपल्या आयुष्यातील साठ वर्षे सार्वजनिक व समाज कार्यासाठी वेचले.यामुळे बापूंचे विचार व कार्य लोकांसाठी आदर्श व मार्गदर्शक राहिले आहे. स्वातंत्र्य चळवळीसाठी सत्य, अहिंसा, सत्याग्रह आणि रचनात्मक कार्य महत्वाचे ठरून बहुसंख्येने युवक आकर्षिल्या गेल्या. याच मूल्यातून व कार्यातून देशसेवेचा नवा आदर्श आपल्या प्रत्यक्ष जीवन कार्यातून समाजापुढे ठेवला. आजच्या आधुनिक काळात वाढत्या औद्योगिकीकरण आणि तंत्रज्ञानच्या युगातही बापूंच्या जीवन कार्याचे आणि रचनात्मक कार्याची गरज प्रकर्षाने जानवत आहे हे सत्य नाकारता येत नाही. २ आॅक्टोबरला गांधीजींच्या जयंतीनिमित्त त्यांचे विचार व त्यांच्या कार्याचे स्मरण जगभरात होणार आहे.१९३६ मध्ये आश्रमाची स्थापना१९३६ मध्ये सेवाग्रामला आश्रमची स्थापना केली. आपण खेड्यातील जीवन अनुभवायला आणि ग्रामीणोत्थानासाठी आलो आहे असे त्यांनी सांगितले. त्या काळी सेवाग्राम खेड्याचे उत्तम उदाहरण होते. त्यामुळेच गांधीजींनी आपली पसंती दर्शवून राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.अन् घडला इतिहासआश्रमातील जीवन सामुदायिक होते. पहाटे ते रात्रीपर्यंतचे दैनंदिन कार्यक्रम ते पण नियम व शिस्तीत होतात. येथूनच शिक्षण, उद्योग, सूतकताई ते कापड, स्वावलंबन आणि मूल्यांवरील जीवन पद्धतीचे शिक्षण दिल्याने देशातील विविध भागात कार्यकर्ते जाऊन काम करू लागले. यातूनच रोजगार, विचार आणि स्वातंत्र्य चळवळीसाठी बळ मिळायला लागले; पण यासाठी सर्व प्रथम आश्रमातच शेती, गोशाळा, रचनात्मक कार्य, एकादश व्रते, देशनिष्ठा आणि सामुदायिक जीवन पद्धतीचे ज्ञान देण्यात आल्याने अन्य भागात कार्य करण्यासाठी सोईस्कर झाले. यातूनच पुढे स्वातंत्र्याचा इतिहास घडला.

टॅग्स :Sewagramसेवाग्राम