शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

मानव जातीसाठी सक्षम मार्गदर्शक ‘आचार्य भावे’

By admin | Updated: September 10, 2014 23:53 IST

आचार्य विनोबा भावे असामान्य प्रतिमांचे धनी होते़ महापुरूष होते. ऋषी, मुनी, संतांची अध्यात्मिक परंपरा त्यांनी निस्सीमपणे चालविली. वास्तविक, ते परंपरा चालविणारे साधक नव्हते तर अध्यात्म विद्येला

दिलीप चव्हाण - सेवाग्रामआचार्य विनोबा भावे असामान्य प्रतिमांचे धनी होते़ महापुरूष होते. ऋषी, मुनी, संतांची अध्यात्मिक परंपरा त्यांनी निस्सीमपणे चालविली. वास्तविक, ते परंपरा चालविणारे साधक नव्हते तर अध्यात्म विद्येला नवी दिशा देणारे होते. मठ वा संप्रदायता ते गुरफटणारे नव्हते तर कर्मक्षेत्रात साहसपणाने प्रयोग करणारे असल्याने अनंत काळापर्यंत मानवजातीसाठी मार्गदर्शनाची क्षमता ठेवणारे महान पुरूष होते. विनायक नरहरी भावे यांचा जन्म कोकणातील गागोदे या खेड्यात ११ सप्टेंबर १८९५ मध्ये एका मध्यमवर्गीय परिवारात झाला. आई धार्मिकवृत्तीची तर वडील वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणारे़ असे दोघांचेही संस्कार विनायक यांच्यावर झाले; पण यात अध्यात्माचे बाळकडू त्यांना आपल्या मातोश्रीच्या प्रभाव व सहवासातून मिळाले. युवाअवस्थेत ब्रह्मचारी राहण्याचा संकल्प केला. तरुणपणात अध्यात्म साधनेची ओढ तर दुसरीकडे स्वातंत्र्य संग्राम आणि राष्ट्रसेवेचे आकर्षण! १६ मार्च १९१६ मध्ये घर सोडले. बडोदा, नंतर मुंबई पूढे ते आपल्या मित्रासोबत काशीला गेले. तेथे ते अध्ययन करू लागले. काशी विद्यापीठाच्या उद्घाटनप्रसंगी गांधीजींनी भाषण दिले. त्यांनी ब्रिटीशशासक व देशातील राजांसमोर निर्भयपणे विचार मांडले. गांधीजींचे भाषण विनायकने वाचले व वेगळेपणा जाणवला. काही शंकांच्या निरसनासाठी बापूंना पत्र लिहिले़ बापूंनी उत्तर पाठविले; पण शंका होत्याच! शेवटी गांधीजींनी पत्र पाठवून बोलविले. ७ जून १९१६ मध्ये कोचरब आश्रमात (गुजरात) बापूंची त्यांनी भेट घेतली. हिमालयाकडे निघालेला युवक काशीमध्ये अध्ययनास थांबला़ बापूंच्या भाषणाने ते आश्रमवासी झाले. गांधीजींमध्ये त्यांना शांती व क्रांतीचा संगम दिसला़ कोचरब आश्रम मातृस्थान बनले. गांधीजींनी नाव दिले ‘विनोबा’. विनोबाजींच्या वडिलांना बापूनी पत्र पाठविले. इतक्या कमी वयात तेजस्विता व वैराग्याचा विकास केला. मला यासाठी अनेक वर्षे लागली, असे लिहिले. आश्रमात जे दुर्लभ रत्न आहेत, त्यातील एक विनोबा असून ते घ्यायला नाही द्यायला आले, असे गांधीजींनी दिनबंधू एंन्ड्रयूज यांना म्हटले.गांधीजींची सूचना व जमनालाल बजाज यांच्या इच्छेनुसार वर्धेला आश्रमची शाखा काढून ३० वर्षे संचालन केले. दरम्यान सहकाऱ्यांसह वर्धा, नालवाडी व जवळपासच्या गावांत सुतकताई, विनाई आदींसह ग्रामसेवेचे कार्य केले. आरोग्याच्या कारणास्तव ते पवनारमध्ये झोपडी बांधून राहू लागले़ १९४८ मध्ये सेवाग्रामला रचनात्मक कार्यकर्ता संमेलन झाले. यात सर्वोदयवर भाष्य केले. या महान योगीने १५ नोव्हेंबर १९८२ मध्ये स्वेच्छामरण स्वीकारले.