शहरं
Join us  
Trending Stories
1
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
2
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
3
"अल्पसंख्याकांवरील अत्याचार खपवून घेणार नाही" २,९०० हून अधिक हल्ल्यांचा पुरावा; भारताचा बांगलादेशला गंभीर इशारा
4
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
5
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
6
"इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
7
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
8
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
9
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
10
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
11
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
12
कन्या राशीसाठी नवीन वर्ष 2026 बदलांचे आणि आत्मशोधाचे वर्ष; संघर्षातून गवसणार यशाचा मार्ग!
13
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
14
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
15
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
16
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
17
MNS: गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
18
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
19
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
20
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
Daily Top 2Weekly Top 5

‘अपघात’ विमा योजनेने केला आठ शेतकऱ्यांचा ‘घात’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 10:30 IST

प्रस्ताव जिल्हास्तरीय कृषी कार्यालयातून शासनाने नेमून दिलेल्या विमा सल्लागार कंपनीकडे जातो. या ठिकाणी प्रस्तावाची छाननी होऊन पुढे तो विमा कंपनीकडे वळता केला जातो. परिपूर्ण कागदपत्रे असतील तर विमा कंपनी मृताच्या वारसदाराच्या बँक खात्यात दोन लाखांची रक्कम वळती करते. असे असले तरी आतापर्यंत ७६ पैकी केवळ २४ प्रकरणे योजनेच्या लाभासाठी पात्र ठरवून मृतांच्या वारसाच्या बँक खात्यात रक्कम वळती करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे४४ वारसदारांना योजनेच्या लाभाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : एखाद्या शेतकऱ्याचे तसेच शेतकरी कुटुंबातील व्यक्तीचे अपघाती निधन झाल्यास राज्य शासन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या माध्यमातून दोन लाख रुपयांची भरपाई देते. ही योजना लागू झाल्यापासून जिल्ह्यात या योजनेच्या लाभासाठी एकूण ७६ प्रकरणे आली. पण त्यापैकी आठ प्रकरणे विमा कंपनीने अपात्र ठरविल्याने शेतकरी ‘अपघात’ विमा योजनेनेच त्या आठ कुटुंबाचा ‘घात’ केल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्याला आपले आवेदन आवश्यक कागदपत्रांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जमा करावा लागते. त्यानंतर हा प्रस्ताव जिल्हास्तरीय कृषी कार्यालयातून शासनाने नेमून दिलेल्या विमा सल्लागार कंपनीकडे जातो. या ठिकाणी प्रस्तावाची छाननी होऊन पुढे तो विमा कंपनीकडे वळता केला जातो. परिपूर्ण कागदपत्रे असतील तर विमा कंपनी मृताच्या वारसदाराच्या बँक खात्यात दोन लाखांची रक्कम वळती करते. असे असले तरी आतापर्यंत ७६ पैकी केवळ २४ प्रकरणे योजनेच्या लाभासाठी पात्र ठरवून मृतांच्या वारसाच्या बँक खात्यात रक्कम वळती करण्यात आली आहे. 

मृतांच्या वारसदाराला किती मिळते रक्कमआवश्यक कागदपत्रांसह सादर करण्यात आलेले प्रकरण पात्र ठरल्यावर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होत मृताच्या वारसदाराच्या बँक खात्यात विमा कंपनी दोन लाखांची रक्कम वळती करीत असल्याचे सांगण्यात आले.

या वारसदारांचा प्रस्ताव केला नामंजूरआर्वी तालुक्यातील उमरी येथील मंदा धर्मराज धुर्वे, हिंगणघाट तालुक्यातील मनसावळी येथील पुष्पा बाबाराव भुसारी, कारंजा तालुक्यातील लिंगा येथील लता शिवाजी धोंगडे, वर्धा तालुक्यातील प्रमिला शंकर भुरे, हिंगणघाट तालुक्यातील शेलापूर येथील सुधा विलास राऊत, देवळी तालुक्यातील हरलेपूर येथील सुधोदन ज्ञानेश्वर सोमकुवर, देवळी तालुक्यातील लोणी येथील माया गौतम फुलझेले तर आर्वी तालुक्यातील दिघी पानवाडी येथील भारत सदाशीव ठाकरे या वारसदाराचा प्रस्ताव विमा कंपनीने नामंजूर केला आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेच्या लाभासाठी एकूण ७६ प्रस्ताव प्राप्त झालेत. त्यापैकी २४ प्रस्ताव पात्र ठरवून मृतांच्या वारसाला नियमानुसार रक्कम देण्यात आली आहे. तर १५ प्रकरणे त्रुटींमुळे प्रलंबित असून २९ प्रकरणे प्रक्रियेत आहेत. आतापर्यंत आठ प्रकरणे योजनेच्या लाभासाठी अपात्र ठरविण्यात आली आहेत.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Farmerशेतकरी