शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

शेतमालाला १५० टक्के भाव वाढीचे कायम धोरण स्वीकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:07 IST

शेतकऱ्याला सुलभ व सोपी कर्जमुक्ती ही रास्त व प्रासंगीक मागणी आहे. मात्र, तो नेहमीचा उपाय होणे शक्य नाही. उत्पादन खर्चाच्या हिशोबात खर्चाचे अनेक मुद्दे न धरता सरळ सरळ आधारित खर्चाच्या १५० टक्के भाव मिळायला हवा.

ठळक मुद्देमागणी : केंद्र सरकारच्या धोरणावर टीका

ऑनलाईन लोकमतवर्धा : शेतकऱ्याला सुलभ व सोपी कर्जमुक्ती ही रास्त व प्रासंगीक मागणी आहे. मात्र, तो नेहमीचा उपाय होणे शक्य नाही. उत्पादन खर्चाच्या हिशोबात खर्चाचे अनेक मुद्दे न धरता सरळ सरळ आधारित खर्चाच्या १५० टक्के भाव मिळायला हवा. दरवर्षी मागणीची गरज न ठेवता राष्ट्रीय वेतन आयोगाप्रमाणे तिची अंमलबजावणी करावी, हे धोरण कायम स्वरूपी अंगीकारण्याची मागणी वर्धेतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.१३० कोटी लोकांचा अन्नदाता प्रचंड प्रमाणात संकटात सापडला आहे. शेतकºयाला त्याच्या घामाचे, भांडवलाचे व कौशल्यात्मक बौद्धीक मॅनेजमेंटचे दामही मिळत नाही. नफा तर दूर जवळपास ३० लाख शेतकºयांनी आत्महत्या केल्या. एकाच शेतकरी कुटुंबात तीन-तीन आत्महत्या झाल्या आहे. याची दाहकता केंद्रीय कापूस संशोधन संस्था पंजाबराव कृषी विद्यापीठ, स्वामीनाथन यांच्या नेतृत्वातील किसान राष्ट्रीय आयोग, डंकेल प्रस्ताव, गॅट करार आदीतून सिद्ध झाली आहे. भारतीय शेतकºयांवर ६९ टक्के ऊणे सबसीडी लादली जाते. सरकार ठरवून सवरून ६९ टक्क्यांनी शेती क्षेत्राला लुटत आहे. इतके करूनही शेतकऱ्यांना मिंधे बनविणारी कर्जमाफी देण्याचा आव आणला जातो. २०१६-१७ मध्ये ८१ हजार कोटींची कर्जमाफी तर २०१२ पासून पाच वर्षात उद्योग क्षेत्राला २५० हजार कोटींची कर्जमाफी देण्यात आली. यावरून शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याचे स्पष्ट होत आहे, असे अशोक बंग, अतुल शर्मा, डॉ. उल्हास जाजू, सुषमा शर्मा, करूणा फुटाणे, ओजस, मालती, भरत महोदय, निरंजना मारू, स्वाती सगरे, डॉ. आलोक बंग, किशोर, डॉ. सोहम पंड्या, अनिल फरसोले आदींचे मत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी