शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

शेतमालाला १५० टक्के भाव वाढीचे कायम धोरण स्वीकारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 00:07 IST

शेतकऱ्याला सुलभ व सोपी कर्जमुक्ती ही रास्त व प्रासंगीक मागणी आहे. मात्र, तो नेहमीचा उपाय होणे शक्य नाही. उत्पादन खर्चाच्या हिशोबात खर्चाचे अनेक मुद्दे न धरता सरळ सरळ आधारित खर्चाच्या १५० टक्के भाव मिळायला हवा.

ठळक मुद्देमागणी : केंद्र सरकारच्या धोरणावर टीका

ऑनलाईन लोकमतवर्धा : शेतकऱ्याला सुलभ व सोपी कर्जमुक्ती ही रास्त व प्रासंगीक मागणी आहे. मात्र, तो नेहमीचा उपाय होणे शक्य नाही. उत्पादन खर्चाच्या हिशोबात खर्चाचे अनेक मुद्दे न धरता सरळ सरळ आधारित खर्चाच्या १५० टक्के भाव मिळायला हवा. दरवर्षी मागणीची गरज न ठेवता राष्ट्रीय वेतन आयोगाप्रमाणे तिची अंमलबजावणी करावी, हे धोरण कायम स्वरूपी अंगीकारण्याची मागणी वर्धेतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.१३० कोटी लोकांचा अन्नदाता प्रचंड प्रमाणात संकटात सापडला आहे. शेतकºयाला त्याच्या घामाचे, भांडवलाचे व कौशल्यात्मक बौद्धीक मॅनेजमेंटचे दामही मिळत नाही. नफा तर दूर जवळपास ३० लाख शेतकºयांनी आत्महत्या केल्या. एकाच शेतकरी कुटुंबात तीन-तीन आत्महत्या झाल्या आहे. याची दाहकता केंद्रीय कापूस संशोधन संस्था पंजाबराव कृषी विद्यापीठ, स्वामीनाथन यांच्या नेतृत्वातील किसान राष्ट्रीय आयोग, डंकेल प्रस्ताव, गॅट करार आदीतून सिद्ध झाली आहे. भारतीय शेतकºयांवर ६९ टक्के ऊणे सबसीडी लादली जाते. सरकार ठरवून सवरून ६९ टक्क्यांनी शेती क्षेत्राला लुटत आहे. इतके करूनही शेतकऱ्यांना मिंधे बनविणारी कर्जमाफी देण्याचा आव आणला जातो. २०१६-१७ मध्ये ८१ हजार कोटींची कर्जमाफी तर २०१२ पासून पाच वर्षात उद्योग क्षेत्राला २५० हजार कोटींची कर्जमाफी देण्यात आली. यावरून शेतकऱ्यावर अन्याय होत असल्याचे स्पष्ट होत आहे, असे अशोक बंग, अतुल शर्मा, डॉ. उल्हास जाजू, सुषमा शर्मा, करूणा फुटाणे, ओजस, मालती, भरत महोदय, निरंजना मारू, स्वाती सगरे, डॉ. आलोक बंग, किशोर, डॉ. सोहम पंड्या, अनिल फरसोले आदींचे मत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी