शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

वर्धा जिल्ह्यात पीककर्जासाठी आलेल्या शेतकऱ्याला शिवीगाळ; बँक कर्मचारी व कार्यकर्त्यांमध्ये जुंपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 15:51 IST

पीककर्जाविषयी अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला साल्या म्हटल्याचे पुढे आल्यावर हा विषय चिघळला गेला.

ठळक मुद्देसाहूरच्या बँक ऑफ इंडियातील प्रकारशेतकऱ्याला म्हटले साल्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: पीक कर्जाची प्रकरणे वेळीच निकाली काढण्याची विनंती करण्यासाठी गेलेल्या प्रहारच्या जिल्हा प्रमुखांशी हुज्जत घालत बँकेच्या अधिकाऱ्यांनी चक्क हातापाई केल्याची घटना बुधवारी आष्टी तालुक्यातील साहूर येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत घडली. विशेष म्हणजे पीककर्जाविषयी अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्याला साल्या म्हटल्याचे पुढे आल्यावर हा विषय चिघळला गेला.

खरीप हंगाम सुरू झाला असला तरी साहूर येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत पीक कर्जाची अनेक प्रकरणे प्रलंबीत असल्याच्या तक्रारी प्रहारकडे प्राप्त झाल्या. त्यानंतर प्रहारचे जिल्हा प्रमुख विकास दांडगे यांनी प्रत्यक्ष साहूर येथील बँक ऑफ इंडियाची शाखा गाठून संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली. बँकेचे अधिकारी आणि प्रहारच्या जिल्हा प्रमुख यांच्यात चर्चा सुरू असतानाच पीक कर्जाचे प्रकरण निकाली निघाले काय अशी विचारणा करण्यासाठी आलेल्या एका शेतकऱ्याला बँकेच्या अधिकाऱ्याने साल्या म्हणत हाकलून लावल्याची बाब पुढे आली.

त्यानंतर बँकेचे अधिकारी आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांमधील शाब्दिक वाद विकोपाला जाऊन प्रकरण हातापायीपर्यंत पोहोचले. पण वेळीच विकास दांडगे यांनी मध्यस्थी केल्याने वाद निवळला. बँकेचे अधिकारी पीककर्ज घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना विविध कारणे पुढे करून नाहक त्रासच देत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. येत्या चार दिवसात ही प्रकरणे निकाली काढा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा प्रहारने दिला आहे.

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरी