शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

मागणी नसतानाही गावालगत शेतजमिनी करणार अकृषक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 2:27 PM

शेतकऱ्यांची कोणतीही मागणी नसताना राज्य शासनाने प्रत्येक गावच्या नगराच्या किंवा शहराच्या हद्दीपासून २०० मीटरच्या आतील क्षेत्रात येणारी शेतजमीन अकृषक रूपांतरीत करण्याचा शासन निर्णय घेतला.

ठळक मुद्देशासनाचा अफलातून निर्णय शेतकरी होणार दिवाळखोर

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्यांची कोणतीही मागणी नसताना राज्य शासनाने प्रत्येक गावच्या नगराच्या किंवा शहराच्या हद्दीपासून २०० मीटरच्या आतील क्षेत्रात येणारी शेतजमीन अकृषक रूपांतरीत करण्याचा शासन निर्णय घेतला. त्यासाठी लागणारा कर शेतकऱ्यांनी भरावा असे लेखी पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी तलाठ्यामार्फत शेतकऱ्यांना दिले आहे. हे लेखी पत्र पाहून धास्तावले आहेत.शासनाने राज्यातील सर्व गाव नगर व शहराच्या हद्दीपासून २०० मीटरच्या आत जी शेतजमीन आहे. ती शासन स्वत:हून अकृषक रूपांतरण करणार आहे. त्यासाठी शासनाच्या महसूल विभागाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत अशा शेतजमिनीच्या भोगवटदार शेतकऱ्यांची माहिती गोळा केली. अशा सर्व शेतकऱ्यांना तलाठ्यांनी प्रति आर १४० रुपये दराने जमीन रूपांतरण कर आकारून हजारो रुपयांच्या लेखी नोटीसा दिल्या आहे. सदर नोटीसा प्राप्त होताच शेतकरी अंचब्यात पडले आहेत आमची कोणतीही मागणी नसताना हा आर्थिक भुर्दंड आम्ही का भरावा असा प्रश्न शेतकऱ्यांनी केला आहे. खेड्यात निवासी वस्ती वाढण्याची कोणतीच शक्यता नाही. आहे तीच घरे सोडून खेड्यातील अनेकजण रोजी रोटीच्या शोधात शहरात जातात. दिवसेंदिवस खेडी ओस पडत आहे.शेतसाऱ्याएैवजी भरावा लागणारा निवासी वाढीव करगौरखेडा येथील एका शेतकऱ्याला सिलींगमध्ये जमीन प्राप्त झाली होती. ती मिळाल्यापासून ती पडीतच आहे. पण आता त्याला ११ हजार रुपये भरण्याची नोटीस मिळाली. या जमिनी एकदा अकृषक रूपांतरीत झाल्या की मग पुढे शेतकऱ्यांना शेतसाऱ्याऐवजी निवासी उद्देशाने वापरात येणाऱ्या जमिनीवर लागणारा वाढीव कर दरवर्षी भरावा लागणार आहे.सक्तीने जमिनी अकृषक करून शेतकऱ्यांजवळून हजारो रुपये वसुल करण्याचा हा शासन निर्णय म्हणजे आधुनिक पेशवाईतील सिझीया कर आहे.शिरीष वाघ, शेतकरी, रोहणा

टॅग्स :agricultureशेतीGovernmentसरकार