शहरं
Join us  
Trending Stories
1
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
2
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
3
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
4
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
5
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
6
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
7
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
8
नवीन वर्षात करा नवीन भाषा शिकण्याचा संकल्प, मिळेल आयुष्याला कलाटणी; पाहा सोप्या टिप्स
9
३१ डिसेंबरला अयोध्येतील राम मंदिर खरोखरच बंद राहणार का? महत्त्वाची माहिती आली समोर
10
विधानसभेला संधी हुकली कृष्णराज महाडिक आता महापालिका निवडणूक लढवणार, प्रभागही ठरला!
11
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये मविआ-मनसतील ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
12
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
14
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
15
Crime: धक्कादायक! आयटी कंपनीच्या महिला मॅनेजरवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
16
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
17
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
18
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
19
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
20
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

इस्माईलपूरच्या घाटातून रेती चोरणाऱ्यांना अभय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 23:51 IST

गोदावरी रस्ता रेतीच्या जड वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात दबाला आहे. या गावाच्या हद्दीतून ईस्माइलपूर रेतीघाट आहे. सदर घाटाचा लिलाव पुलगाव येथील गुप्ता नामक इसमाने घेतला. त्याने मुदत संपल्यानंतही विना परवाना उत्खनन करून रेतीची वाहतूक केली. ११ जुलै २०१९ ला खडकी येथील तलाठीने या घाटाची पाहणी केली. तेव्हा जेसीबी व बोटीने पाण्यातून रेतीचा उपसा सुरू होता.

ठळक मुद्देतहसीलदाराच्या पत्राला जिल्हा प्रशासनाचा खो

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : ईस्माईलपूरचा रेतीघाट बंद कॅमेºयाच्या सहाय्याने पोकलँड, बोटी लावून अक्षरश: पोखरून काढला. आतापर्यंत दोन कोटीच्यावर रेती काढून माफियाने कहर केला आहे. याप्रकरणी आष्टी तहसीलदारांनी रेतीघाट बंद करा असे पत्र वर्धा जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले; पण या पत्राला खो देण्यात आला आहे. याप्रकरणी विभागीय आयुक्तांना गोदावरीच्या ग्रामस्थांनी लेखी तक्रार पाठविली आहे.गोदावरी रस्ता रेतीच्या जड वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात दबाला आहे. या गावाच्या हद्दीतून ईस्माइलपूर रेतीघाट आहे. सदर घाटाचा लिलाव पुलगाव येथील गुप्ता नामक इसमाने घेतला. त्याने मुदत संपल्यानंतही विना परवाना उत्खनन करून रेतीची वाहतूक केली. ११ जुलै २०१९ ला खडकी येथील तलाठीने या घाटाची पाहणी केली. तेव्हा जेसीबी व बोटीने पाण्यातून रेतीचा उपसा सुरू होता. अट क्र.१५ नुसार नदीपात्रात निश्चित केलेल्या वाळुघाटातून वाळूचे उत्खनन हाताने करावे लागेल असे असताना बोट व पोकलँडचा वापर करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रेतीघाट लिलावाधारक यांना मंजूर वाळुघाटाचे निश्चित केलेल्या क्षेत्राबाहेरील अमरावती जिल्ह्याचे हद्दीत उत्खनन करीत आहे. हे उत्खनन बोटीने व जेसीबीचा वापर करून केल्याचे महसूल विभागाच्या प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बंद असून रिकामी बॉक्स असल्याचे दिसून आले.रेतीघाटाचे सीमांकन खांब अजूनही लावलेले नाही. त्यामुळे अटी व शर्ती धाब्यावर बसविल्याने सदर वाळूघाट त्वरीत बंद करण्यात यावा, असे पत्र १६ जुलै २०१९ ला तहसीलदारांनी जिल्हाधिकारी यांना पाठविले; पण अजूनही घाटातून नियमडावलून उत्खनन केले जात आहे. या ठिकाणावरून दिवसाकाठी दीडशे गाड्या अमरावती जिल्ह्यात जात आहेत. धमकी देऊन सर्रास लूट केली जात आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देत तातडीने योग्य कार्यवाही करावी अशी मागणी आहे.पोखरले जात आहेत नाल्यांचेही पात्रअवैध उत्खनन करणाºयांची मोठी टोळीत सध्या तालुक्यात सक्रिय झाली आहे. परंतु, त्यांच्या मनमर्जी कारभाराला आळा घालण्यासाठी पाहिजे तसे प्रभावी काम शासकीय अधिकाºयांकडून होत नसल्याने त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. तालुक्यातील नदी पात्रांसह मोठाल्या नाल्यांमधून हे उत्खनन माफिया वाळूची चोरी करीत असून तालुका प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेण्याची मागणी आहे.ईस्माइलपूर रेतीघाट बंद करण्याचे पत्र महिन्याभरापूर्वी शासनाला पाठविले आहे. घाट बंद करण्याचे निर्णय जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत आहे.- आशीष वानखडे, तहसीलदार, आष्टी (शहीद).

टॅग्स :sandवाळूTahasildarतहसीलदार