शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
5
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
6
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
7
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
8
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
9
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
11
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
12
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
13
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
14
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
15
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
16
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
17
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
18
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
19
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
20
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही

अबब... दारुबंदी जिल्ह्यात 1 कोटी 25 लाख 89 हजारांचा दारुसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2022 05:00 IST

 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारुची विक्री केली जाते. दारु विक्रीवर अंकुश लावण्यासाठी पोलीस विभागासह राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यरत आहेत. मात्र, केवळ पोलिसांकडूनच शहरातील दारु विक्रेत्यांवर कारवाई केली जात असल्याचे अनेकदा दिसून आले. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे.

चैतन्य जोशीलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा :  वर्धा जिल्ह्याला थोर पुरुषांचा वारसा लाभल्याने जिल्हा दारुबंदी म्हणून घोषित करण्यात आला. मात्र, तरीही वर्धा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दारुची वाहतूक तसेच विक्री होताना दिसते. याच दारुबंदी जिल्ह्यात मागील वर्षभरात केवळ वर्धा उपविभागातील सात पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाई करत २० हजार ५१३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, तब्बल १ कोटी २५ लाख ८९ हजार रुपयांचा देशी, विदेशी दारुसाठा पोलिसांनी जप्त करत सुमारे दीडशेवर दारु विक्रेत्यांना बेड्या ठोकल्याची माहिती आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारुची विक्री केली जाते. दारु विक्रीवर अंकुश लावण्यासाठी पोलीस विभागासह राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यरत आहेत. मात्र, केवळ पोलिसांकडूनच शहरातील दारु विक्रेत्यांवर कारवाई केली जात असल्याचे अनेकदा दिसून आले. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभाग केवळ कागदावरच राहिल्याचे दिसून येत आहे. वर्धा उपविभागात येणाऱ्या वर्धा, रामनगर, सावंगी, सेवाग्राम, दहेगाव, सेलू तसेच सिंदी रेल्वे पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आपापल्या हद्दीत कारवाई करत तब्बल सव्वा कोटी रुपयांचा दारुसाठा हस्तगत करत दारु विक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले आहे. पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनात कारवाई केल्या जात आहे.

वाहनांसह १.१८ कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत- पोलिसांनी मागील वर्षभरात जप्त केलेल्या दारुसाठ्यासह विविध प्रकारच्या दारुची वाहतूक करणारे वाहन तसेच इतर साहित्य असा एकूण १ कोटी १८ लाख ३१ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, ही जप्त केलेली वाहने पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत. 

गांजाचे झुरके ओढणारे २८ गुन्हेगार जेरबंद - गांजा किंवा तत्सम प्रकारच्या अमली पदार्थांचे सेवन करणे तसेच त्याची विक्री करणे कायद्याने गुन्हा असल्याने पोलिसांनी गांजाचे झुरके ओढणाऱ्या २८ जणांना पोलिसी हिसका दाखवून अटक केली आहे. तसेच विक्रेत्यांवरही कारवाई केली आहे. 

३००वर जुगाऱ्यांना ठोकल्या बेड्या - मागील वर्षभरात वर्धा उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात सातही पोलीस ठाण्यांतील पोलिसांनी जुगाऱ्यांवर कारवाई करत तब्बल ३४२ गुन्हे दाखल करुन सुमारे ३००वर जुगाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच २४ लाख ४२ हजार १०१० रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली. 

शस्त्र बाळगणाऱ्या १०३ जणांवर कारवाई - शस्त्राच्या धाकावर नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या तसेच शिवीगाळ करणाऱ्या तब्बल १०३ गावगुंडांवर पोलिसांनी कारवाई करत त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.  

 

टॅग्स :liquor banदारूबंदी