शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

विद्रोही साहित्य संमेलनासाठी एक मूठ धान्य, एक रुपया दान मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 16:41 IST

वर्ध्यातून केली सुरुवात : संमेलन ४ व ५ फेब्रुवारीला

वर्धा : ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची घोषणा झाल्यानंतर १७ वे अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनही नियोजित करण्यात आले आहे. ४ व ५ फेब्रुवारीला हे विद्रोही साहित्य संमेलन होणार असल्याने या संमेलनात सहभागी होणाऱ्या साहित्यप्रेमींना भोजन व साहित्यनगरी निर्माण करण्यासाठी, अनुषंगिक सुविधांसाठी धान्य आणि पैशाची गरज आहे. यासाठी आयोजकांनी ‘एक मूठ धान्य व एक रुपया सम्यक दान मोहीम’ सुरू केली आहे. आर्वी नाका परिसरातून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.

सिद्धार्थ गौतम बुद्धांनी सम्यकदानाचा अर्थ समजावून सांगितला आहे. देणाऱ्याला अहंकार वाटता कामा नये व घेणाऱ्याला न्यूनगंड वाटता कामा नये, या संकल्पनेवर आधारित निधी गोळा करता आला पाहिजे, अशी भूमिका १७ व्या साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक डॉ. अशोक चोपडे यांनी मांडली. तसेच जनतेच्या क्रांतिकारी पर्यायी साहित्य-संस्कृतीच्या जागरात सर्वांनी तन-मन-धनाने मदत करून सर्व बहुजन, आदिवासी, भटके, महिला, शोषित, वंचित, पीडित व सर्वहारा घटकांचे हे संमेलन यशस्वी करा, असे आवाहनही त्यांनी केले. 

संमेलनाला मिळणारा शासकीय निधी बंद करावा - नीतेश कराळे

सरकारी पैसा साहित्य संमेलनावर खर्च न करता विद्यार्थी, शेतकरी, कष्टकरी व कामगार आदींसाठी खर्च करावा. शासनाकडून मिळणारा निधी बंद करून थेट विद्रोही साहित्य चळवळीसारखे जनतेत जाऊन मदत मागावी. साधे जेवण आणि समतावादी साहित्य व मूल्य संस्कृतीचा जागर आणि विचारांची मेजवानी हे विद्रोहीचे वैशिष्ट्य आहे. त्यासाठी एक मूठ धान्य व एक रुपया सम्यक दान करावे, असे मत अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नीतेश कराळे यांनी मांडले.

नुसता कल्ला म्हणजे विद्रोह नव्हे : चंद्रकांत वानखडे

वर्धा येथे ४ व ५ फेब्रुवारी रोजी अ. भा. विद्रोही साहित्य संमेलन होऊ घातले आहे. विद्रोही साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून नुसता कल्ला झाला म्हणजे विद्रोह होय, हा विचार मला मान्य नाही. शाहू, फुले, आंबेडकर यांच्यासह गांधीही विद्रोहाचे प्रतिक आहे, ही भूमिकाच आपण स्वीकारली असून, याच भूमिकेतून साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून मी विचार व्यक्त करणार आहोत. विद्रोहीवाद्यांना गांधी तसा मान्य होत नाही. मात्र, मी माझी भूमिका स्पष्ट केली आहे. जमिनीच्या पोटातून उगविणारा अंकुर जसा परिश्रमाने वर येतो, त्याचे हे परिश्रमही मी विद्रोह मानतो. त्यामुळे विद्रोही साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर यावेळी गांधीही असतील, अशी भूमिका विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष व ज्येष्ठ संपादक चंद्रकांत वानखडे यांनी व्यक्त केली. संमेलनापूर्वी त्यांनी सोमवारी वर्धा येथील ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली, यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत ज्येष्ठ लेखक संतोष अरसोड हेही उपस्थित होते.

टॅग्स :literatureसाहित्यSocialसामाजिकwardha-acवर्धा