शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

आईपासून दुरावलेल्या चिमुकल्याची अखेर वीस दिवसांनी झाली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2022 13:12 IST

कोमल ही २० दिवसांपासून तिच्या बाळाच्या भेटीच्या प्रतीक्षेत होती. पतीने वाद करून तिला घराबाहेर हकलून दिले व बाळाला घेऊन तो दुसरीकडे राहण्यास गेला. तो कुठे गेला याचा तिला थांगपत्ता नव्हता. ती बाळाचा अन् पतीचा शोध घेण्यासाठी वणवण भटकली.

ठळक मुद्देचाईल्ड लाईनचा पुढाकार बालकल्याण समितीने केली मदत

वर्धा : घरगुती कलहातून झालेल्या वादात आई आणि चिमुकले बाळ एकमेकांपासून दुरावले... यातूनच तब्बल २० दिवस बाळ आईपासून दूर राहिले. अखेर आईच्या दु:खाला पाहून सामाजिक कार्यकर्ता नम्रता भोंगाडे यांनी चाईल्ड लाईन व बाल संगोपन समितीकडे धाव घेत त्या मातेची तिच्या चिमुकल्या बाळाशी भेट घडवून आणली. अन् पाणावलेल्या डोळ्यांनी आईने बाळाला कुशीत घेत मिठी मारली.

कोमल अनुप पाटील (रा. बल्लारशा) ही मागील २० दिवसांपासून तिच्या बाळाच्या भेटीच्या प्रतीक्षेत होती. पतीने वाद करून तिला घराबाहेर हकलून दिले होते. बाळाला घेऊन तो दुसरीकडे राहण्यास गेला होता. तिच्याकडे पैसे, मोबाईल काहीच नव्हते. तरी ती बाळाचा अन् पतीचा शोध घेण्यासाठी वणवण भटकली. अखेर हताश होऊन ती वर्ध्याला माहेरी आली आणि दुसऱ्याच दिवशी घरच्यांना घेत पुन्हा तिच्या बाळाला शोधण्यासाठी बल्लारशा येथे गेली.

बाळ कुठेही दिसत नसल्याने अखेर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पण पती कुठे राहायला गेला याचा थांगपत्ता नव्हता. अखेर फोनवरुन संपर्क करुन पतीला पोलीस ठाण्यात बोलाविले. बाळाला घेऊन येण्याऐवजी तो वकिलाला घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला. आणि बाळ कोर्टातूनच देईल असे म्हणून पोलीस ठाण्यातून निघून गेला.

पोलिसांनीही कोर्टातून बाळाची कस्टडी मिळवा, असे सांगितल्याने विवाहिता निराश होऊन वर्ध्याला परत आली. चाईल्ड लाईनचे जिल्हा समन्वयक आशिष मोडक यांच्या मदतीने बालकल्याण समितीकडे प्रकरण जाताच अखेर आईची तिच्या बाळाशी भेट झाली.

...अन् सल्ला ठरला मोलाचा

विवाहिता तिच्या आईला घेऊन सामाजिक कार्यकर्ता नम्रता भोंगाडे यांच्याकडे गेल्या. त्यांनी चाईल्ड लाईनचे आशिष मोडक यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. मोडक यांनी आठ ते दहा दिवसांत बाळ मिळेल, असे आश्वासन दिले. सल्ला ऐकून चाईल्ड लाईनची मदत घेतली. शीतल घोडेस्वार यांनी प्रकरण बालकल्याण समितीकडे दाखल केले. तेथील अलका भूगल, अॅड. नीना वन्नलवार, रेखा भोयर, अॅड. जंगमवार यांच्या मदतीमुळे योग्य तो निकाल देऊन अखेर बाळ आईच्या स्वाधीन केले.

चाईल्ड लाईनची मदत घेण्याचे आवाहन

चाईल्ड लाईन व बालसंगोपन समितीच्या कार्याची माहिती अनेकांना नसते. अनेक वर्षे न्यायालयात प्रकरण प्रलंबित असते. अशा प्रकरणात बालमनावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे अशा प्रकरणात महिलांनी चाईल्ड लाईन व बाल संगोपन समितीची मदत घ्यावी, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समीतीच्या जिल्हा कार्याध्यक्ष नम्रता भोंगाडे यांनी केले.

टॅग्स :Socialसामाजिकwardha-acवर्धा