शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

नवपिढीच्या जनजागृतीसाठी ७३ वर्षीय चिरतरुणाची सायकलवारी; श्रीनगर ते कन्याकुमारी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2022 18:06 IST

पवनार, बजाजवाडी, सेवाग्रामला दिली भेट

वर्धा : युवा पिढी ही या देशाचे भवितव्य असून त्यांना आपल्या देशाची संस्कृती, परंपरा आणि पर्यावरणासंदर्भात माहिती देण्यासाठी ७३ वर्षीय चिरतरुणाने श्रीनगर ते कन्याकुमारीपर्यंत सायकल यात्रा सुरु केली आहे. गावागावात जाऊन ते शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतात. हा चिरतरुण व्यक्ती मंगळवारी वर्धा जिल्ह्यात दाखल झाला असून त्यांनी पवनार, बजाजवाडी आणि सेवाग्रामला भेट दिली.

किरण सेठ, असे या ७३ वर्षीय चिरतरुणाचे नाव आहे. ते ‘सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ इंडियन क्लासिकल म्युझिक ॲण्ड कल्चर अमंग असिस्टेट युथ’(स्पिक मैके) याचे सदस्य असून आयआयटी दिल्लीमध्ये प्राध्यापक आहे. स्पिक मैकेच्या माध्यमातून युवकांमध्ये भारतीय संस्कृती आणि शास्त्रीय संगीताला चालना देण्यासोबतच लोककला, हस्तकला, शिल्पकला, चलचित्र आदींचा प्रचार-प्रसार व्हावा, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे ‘साधी राहणी, उच्च विचार’ हे जीवनमूल्य रुजावे आणि पर्यावरणाचे संवर्धन केले जावे, या तीन उद्देशाला घेऊन किरण सेठ यांनी श्रीनगर ते कन्याकुमारीपर्यंत ही सायकल यात्रा काढली आहे.

१५ ऑगस्टला श्रीनगर येथून ही यात्रा सुरु झाली असून २ ऑक्टोबरला राजघाट येथे पोहोचली. तेथून ते मंगळवारी वर्ध्यात पोहोचले असून पवनार येथे त्यांचे स्वागत करण्यात आले. शिक्षा मंडळाचे सभापती तथा स्पिक मैकेच्या वर्धा चॅप्टरचे संजय भार्गव आणि जी.एस. कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी पवनार येथे किरण सेठ यांचे स्वागत करुन त्यांच्यासोबत पवनार ते वर्धा असा सायकल प्रवास केला. बुधवारी ही सायकल यात्रा पुढच्या प्रवासाला निघणार असून फेब्रुवारी महिन्यात या यात्रेचा शेवट होणार असल्याचे सांगण्यात आले.

जी.एस. कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी साधला संवाद

नवपिढीच्या जनजागृतीकरिता सायकलने निघालेले किरण सेठ मंगळवारी वर्ध्यात पोहोचले. त्यांनी जी. एस. कॉमर्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. देशाची संस्कृती, शास्त्र, कला यासह बापूंचे विचार आणि पर्यावरण यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी सेवाग्राम येथील आनंद निकेतनच्या विद्यार्थ्यांशीही संवाद साधला असून बजाजवाडीमध्ये मुक्काम केला. बुधवारी ते पुढच्या प्रवासाकरिता निघणार आहे.

मिळत असलेला सन्मान अविस्मरणीय : किरण सेठ

स्पिक मैके हे एक स्वयंसेवी आंदोलन असून युवकांमध्ये प्रचार-प्रसार करण्याचे काम करतात. देश-विदेशातील २० लाख संस्थांना भेट देण्याचा मानस आहे. वर्षभरामध्ये ५ हजार संस्थांना भेट देण्याचे लक्ष्य असल्याने ही सायकल यात्रा सुरु केली. या भ्रमंतीदरम्यान हा देश विविधतेने नटलेला असून ग्रामीण भागात आणि लहान शहरामध्ये अजूनही संस्कृती कायम असल्याचे लक्षात आले आहे. येथे मिळालेला मान-सन्मान न विसरणारा असून ‘अतिथी देवो भव’ची प्रचिती आली आहे, असे मत किरण सेठ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले. एका दिवसाला ३० ते ६० किलोमीटरपर्यंत प्रवास करीत असून आतापर्यंत २ हजार किमीच्यावर प्रवास करुन ८ ते ९ लाख विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :SocialसामाजिकCyclingसायकलिंगwardha-acवर्धा