शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

वर्ध्यातील ८,७०६ कर्मचाऱ्यांच्या वेतनाला लागणार ९.१४ कोटींची कात्री

By महेश सायखेडे | Updated: March 31, 2023 17:52 IST

जुन्या पेन्शनसाठी मारल्या होत्या बोंबा : ‘असाधारण रजे’च्या नावाखाली शासनाने सात दिवसांचा पगार केला लंबा

वर्धा : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला. संपाच्या सातव्या दिवशी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात त्रि-सदस्यीय समितीच्या अहवालानंतर आवश्यक तो सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलनकर्त्यांनी २० मार्चला सूर्य मावळतीला जात असताना आपले आंदोलन मागे घेतले.

संपात सहभागी झालेले कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित होते. त्याची अनुपस्थिती नियमित करण्याबाबची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याच विषयी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासनाने २८ मार्चला एक शासन आदेश निर्गमित केला आहे. या आदेशानुसार संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांची कार्यालयातील अनुपस्थिती सेवेतील खंड न समजता असाधारण रजा म्हणून नियमित करण्यात यावी, तसेच संबंधित असाधारण रजेचा कालावधी शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक सेनिवे १००१/२९/सेवा-४, दिनांक १४ जानेवारी २००१ च्या आदेशास अपवाद करून सेवेतील खंड न समजता निवृत्ती वेतनासाठी अर्हताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे बेमुदत संपात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील ८ हजार ७०६ कर्मचाऱ्यांची सेवा खंडित होण्यापासून वाचली असली तरी या काळातील त्यांचा पगार कापला जाणार आहे. जुन्या पेन्शनसाठी लढा देणाऱ्या जिल्ह्यातील आंदोलनकर्त्यांच्या वेतन कपातीची ही रक्कम ९.१४ कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. एकूणच असाधारण रजा मान्य करीत शासनाने ९.१४ कोटींची बचत केल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी १४ ते २० मार्च या काळात कर्मचाऱ्यांनी संप केला. हा सात दिवसांचा संप कालावधी आता असाधारण रजेत पकडला जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे. संबंधित शासन निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची संप काळातील गैरहजेरी ही असाधारण रजेत पकडण्यात येणार असून कर्मचाऱ्यांची सेवा खंडित होण्यापासून वाचली आहे. मात्र, या काळातील त्यांचा पगार कापला जाणार आहे.

- अर्चना मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :Employeeकर्मचारीwardha-acवर्धाGovernmentसरकार