शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

वर्ध्यातील ८,७०६ कर्मचाऱ्यांच्या वेतनाला लागणार ९.१४ कोटींची कात्री

By महेश सायखेडे | Updated: March 31, 2023 17:52 IST

जुन्या पेन्शनसाठी मारल्या होत्या बोंबा : ‘असाधारण रजे’च्या नावाखाली शासनाने सात दिवसांचा पगार केला लंबा

वर्धा : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला. संपाच्या सातव्या दिवशी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात त्रि-सदस्यीय समितीच्या अहवालानंतर आवश्यक तो सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलनकर्त्यांनी २० मार्चला सूर्य मावळतीला जात असताना आपले आंदोलन मागे घेतले.

संपात सहभागी झालेले कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित होते. त्याची अनुपस्थिती नियमित करण्याबाबची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याच विषयी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासनाने २८ मार्चला एक शासन आदेश निर्गमित केला आहे. या आदेशानुसार संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांची कार्यालयातील अनुपस्थिती सेवेतील खंड न समजता असाधारण रजा म्हणून नियमित करण्यात यावी, तसेच संबंधित असाधारण रजेचा कालावधी शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक सेनिवे १००१/२९/सेवा-४, दिनांक १४ जानेवारी २००१ च्या आदेशास अपवाद करून सेवेतील खंड न समजता निवृत्ती वेतनासाठी अर्हताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे बेमुदत संपात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील ८ हजार ७०६ कर्मचाऱ्यांची सेवा खंडित होण्यापासून वाचली असली तरी या काळातील त्यांचा पगार कापला जाणार आहे. जुन्या पेन्शनसाठी लढा देणाऱ्या जिल्ह्यातील आंदोलनकर्त्यांच्या वेतन कपातीची ही रक्कम ९.१४ कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. एकूणच असाधारण रजा मान्य करीत शासनाने ९.१४ कोटींची बचत केल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी १४ ते २० मार्च या काळात कर्मचाऱ्यांनी संप केला. हा सात दिवसांचा संप कालावधी आता असाधारण रजेत पकडला जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे. संबंधित शासन निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची संप काळातील गैरहजेरी ही असाधारण रजेत पकडण्यात येणार असून कर्मचाऱ्यांची सेवा खंडित होण्यापासून वाचली आहे. मात्र, या काळातील त्यांचा पगार कापला जाणार आहे.

- अर्चना मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :Employeeकर्मचारीwardha-acवर्धाGovernmentसरकार