शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

वर्ध्यातील ८,७०६ कर्मचाऱ्यांच्या वेतनाला लागणार ९.१४ कोटींची कात्री

By महेश सायखेडे | Updated: March 31, 2023 17:52 IST

जुन्या पेन्शनसाठी मारल्या होत्या बोंबा : ‘असाधारण रजे’च्या नावाखाली शासनाने सात दिवसांचा पगार केला लंबा

वर्धा : जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी एकत्र येत १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला. संपाच्या सातव्या दिवशी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात त्रि-सदस्यीय समितीच्या अहवालानंतर आवश्यक तो सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलनकर्त्यांनी २० मार्चला सूर्य मावळतीला जात असताना आपले आंदोलन मागे घेतले.

संपात सहभागी झालेले कर्मचारी कार्यालयात अनुपस्थित होते. त्याची अनुपस्थिती नियमित करण्याबाबची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याच विषयी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासनाने २८ मार्चला एक शासन आदेश निर्गमित केला आहे. या आदेशानुसार संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांची कार्यालयातील अनुपस्थिती सेवेतील खंड न समजता असाधारण रजा म्हणून नियमित करण्यात यावी, तसेच संबंधित असाधारण रजेचा कालावधी शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक सेनिवे १००१/२९/सेवा-४, दिनांक १४ जानेवारी २००१ च्या आदेशास अपवाद करून सेवेतील खंड न समजता निवृत्ती वेतनासाठी अर्हताकारी सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे बेमुदत संपात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील ८ हजार ७०६ कर्मचाऱ्यांची सेवा खंडित होण्यापासून वाचली असली तरी या काळातील त्यांचा पगार कापला जाणार आहे. जुन्या पेन्शनसाठी लढा देणाऱ्या जिल्ह्यातील आंदोलनकर्त्यांच्या वेतन कपातीची ही रक्कम ९.१४ कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. एकूणच असाधारण रजा मान्य करीत शासनाने ९.१४ कोटींची बचत केल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी १४ ते २० मार्च या काळात कर्मचाऱ्यांनी संप केला. हा सात दिवसांचा संप कालावधी आता असाधारण रजेत पकडला जाणार आहे. याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे. संबंधित शासन निर्णयामुळे कर्मचाऱ्यांची संप काळातील गैरहजेरी ही असाधारण रजेत पकडण्यात येणार असून कर्मचाऱ्यांची सेवा खंडित होण्यापासून वाचली आहे. मात्र, या काळातील त्यांचा पगार कापला जाणार आहे.

- अर्चना मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी, वर्धा.

टॅग्स :Employeeकर्मचारीwardha-acवर्धाGovernmentसरकार