शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

शांतता व सुव्यस्थेसाठी ९० जण स्थानबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:20 IST

जिल्ह्यातील २९८ ग्रामपंचायतींची निवडणूक तसेच होळी या सणादरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी या उद्देशाने कलम ६८ अंतर्गत तब्बल ९० जणांना ताब्यात घेऊन त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. पोलीस विभागाने विशेष मोहीम हाती घेऊन त्यावर प्रभावी अंमलबजावणी केली.

ठळक मुद्देकलम ६८ अंतर्गत कोंम्बिग : पोलीस विभागाची विशेष मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जिल्ह्यातील २९८ ग्रामपंचायतींची निवडणूक तसेच होळी या सणादरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी या उद्देशाने कलम ६८ अंतर्गत तब्बल ९० जणांना ताब्यात घेऊन त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. पोलीस विभागाने विशेष मोहीम हाती घेऊन त्यावर प्रभावी अंमलबजावणी केली. ही मोहीम २४ मार्च रोजीपर्यंत राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तसेच दारूविक्री, तस्करी आणि दारूनिर्मिती आदी गुन्हे दाखल असलेल्यांची यादीच पोलीस विभागाकडे आहे. यंदाची होळी ग्रामपंचायत आणि लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान आल्याने या कालावधीत कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हा गुन्हे आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी दिल्या होत्या. त्याच सूचनांना केंद्रस्थानी ठेवून २० मार्चपासून विशेष मोहीम हाती घेऊन अवैध व्यवसाय करणारे व गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्यांना कलम ६८ अन्वये ताब्यात घेण्यासंबंधीची कारवाई करण्यात आली. जिल्ह्यातील १९ पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी २१ मार्चला ही मोहीम प्रभावीपणे राबवून तब्बल ९० जणांना ताब्यात घेत त्यांना स्थानबद्ध केल्याचे सांगण्यात आले. यात पो.स्टे. वर्धा येथे ८, रामनगर ६, वडनेर ७, आष्टी ४, सावंगी (मेघे) ५, खरांगणा ६, सेवाग्राम २, कारंजा ४, पुलगाव १, तळेगाव १, सिंदी रेल्वे १३, सेलू ५, हिंगणघाट १२, समुद्रपूर ४, दहेगाव ३, देवळी ४ व गिरड पोलीस ठाण्यातील ५ जणांचा समावेश आहे.रविवारपर्यंत सुरू राहणार मोहीमबुधवार २० मार्च पासून सुरू करण्यात आलेली ही मोहीम रविवार २४ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. कलम ६८ अन्वये ताब्यात घेण्यात आलेल्याला पोलीस जास्तीत जास्त २४ तास स्थानबद्ध करून ठेवत असून त्यांची कलम ६९ अन्वये सुटकाही करण्यात येते. विशेष म्हणजे ताब्यात असलेल्याला मतदान करण्यासाठी काही सवड दिली जात असते, असे सांगण्यात आले. २० मार्चलाही ही मोहीम राबवून काहींना ताब्यात घेत स्थानबद्ध करण्यात आले होते.

टॅग्स :Policeपोलिस