शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
4
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
5
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
6
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
7
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
8
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
9
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
10
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
11
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
12
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
13
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
14
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
15
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
16
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
17
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
18
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
19
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
20
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा

९८५ शेतकरी चणा विक्रीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 23:55 IST

शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. या हंगामात बियाणे आणि खतांकरिता रक्कम गरजेची असताना नाफेडच्यावतीने खरेदी करण्यात आलेल्या शेतमालाचे चुकारे देण्यात आले नाही.

ठळक मुद्देशासकीय खरेदी बंद झाल्याने अनेक अडचणी : हंगाम तोंडावर असताना नाफेडची पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. या हंगामात बियाणे आणि खतांकरिता रक्कम गरजेची असताना नाफेडच्यावतीने खरेदी करण्यात आलेल्या शेतमालाचे चुकारे देण्यात आले नाही. शिवाय आॅनलाईन नोंदणी झाली असताना सेलू तालुक्यातील ९८५ शेतकरी चणा ठेवून आहेत.शेतातील चणा पीक घरी आले. शासनाची खरेदी सुरू होईल. बाजारात असलेल्या दरापेक्षा शासनाने जाहीर केलेला हमीभाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. यातून आलेल्या रकमेतून खरीपाच्या बी-बियाण्याची खरेदी होईल अशी शेतकऱ्यांची आशा पुरती मावळली. अनेक शेतकऱ्यांचा चणा पोत्यात भरून घरीच राहिला. यातून आर्थिक पाठबळ मिळाले नसल्याने पुन्हा एकदा कर्जमाफीचे गुऱ्हाळ सुरू झाले. यात कर्जमाफी झाल्यावरही दुबार कर्ज देण्यास बँका तयार नसल्याने शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात उभी राहण्याची वेळ आली. चणा उत्पादक शेतकरी आर्थिक दृष्ट्या हतबल झाला आहे.किसान अधिकार अभियानाने शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला तेव्हा २६ मे रोजी सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलूच्या बाजारपेठेत नाफेडने खरेदी सुरू केली. यावेळी झालेल्या समारंभाप्रसंगी ही खरेदी सुरू राहील असे सांगण्यात आले. या दरम्यान चार दिवसात ३० शेतकऱ्यांचा चणा खरेदी केला व तेव्हापासून खरेदी बंद झाली. आताही खरेदी कधी सुरू होणार याबाबत कुणीही वाच्यता करीत नाही. शुभारंभाप्रसंगी मोठ्या तोºयात वागणारे बाजार समितीचे पदाधिकारी हातवर करीत आहे. पावसाळ्याचे दिवस आहे. माकडांनी घरावरील कवेलूचे तीन तेरा वाजविले. अशात नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा चणा बाजार समितीच्या शेडमध्ये ठेवण्यास अनुमती देण्याची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी असणाऱ्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचा साठा असल्याने शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत आहे. येत्या दोन दिवसात चण्याची शासकीय खरेदी सुरू झाली नाही तर शेतकºयांच्या आक्रोशाला सामोर जाण्याची वेळ नाफेडवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.अनेकांची तुरही घरीचचणा खरेदीच्या पूर्वी तुरीच्या खरेदीतही हाच प्रकार घडला. ऐन वेळी तुरीची खरेदी बंद झाल्याने अनेकांना तुरी व्यापाऱ्यांना पड्या दरात देण्याची वेळ आली. गोदामाचे कारण काढून नाफेडच्यावतीने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हमीभावाची आशा मावळल्या. तुरीच्या वादातच चण्याची खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच फसगत झाल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी