शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

९८५ शेतकरी चणा विक्रीच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 23:55 IST

शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. या हंगामात बियाणे आणि खतांकरिता रक्कम गरजेची असताना नाफेडच्यावतीने खरेदी करण्यात आलेल्या शेतमालाचे चुकारे देण्यात आले नाही.

ठळक मुद्देशासकीय खरेदी बंद झाल्याने अनेक अडचणी : हंगाम तोंडावर असताना नाफेडची पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. या हंगामात बियाणे आणि खतांकरिता रक्कम गरजेची असताना नाफेडच्यावतीने खरेदी करण्यात आलेल्या शेतमालाचे चुकारे देण्यात आले नाही. शिवाय आॅनलाईन नोंदणी झाली असताना सेलू तालुक्यातील ९८५ शेतकरी चणा ठेवून आहेत.शेतातील चणा पीक घरी आले. शासनाची खरेदी सुरू होईल. बाजारात असलेल्या दरापेक्षा शासनाने जाहीर केलेला हमीभाव मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. यातून आलेल्या रकमेतून खरीपाच्या बी-बियाण्याची खरेदी होईल अशी शेतकऱ्यांची आशा पुरती मावळली. अनेक शेतकऱ्यांचा चणा पोत्यात भरून घरीच राहिला. यातून आर्थिक पाठबळ मिळाले नसल्याने पुन्हा एकदा कर्जमाफीचे गुऱ्हाळ सुरू झाले. यात कर्जमाफी झाल्यावरही दुबार कर्ज देण्यास बँका तयार नसल्याने शेतकऱ्यांना सावकाराच्या दारात उभी राहण्याची वेळ आली. चणा उत्पादक शेतकरी आर्थिक दृष्ट्या हतबल झाला आहे.किसान अधिकार अभियानाने शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केला तेव्हा २६ मे रोजी सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेलूच्या बाजारपेठेत नाफेडने खरेदी सुरू केली. यावेळी झालेल्या समारंभाप्रसंगी ही खरेदी सुरू राहील असे सांगण्यात आले. या दरम्यान चार दिवसात ३० शेतकऱ्यांचा चणा खरेदी केला व तेव्हापासून खरेदी बंद झाली. आताही खरेदी कधी सुरू होणार याबाबत कुणीही वाच्यता करीत नाही. शुभारंभाप्रसंगी मोठ्या तोºयात वागणारे बाजार समितीचे पदाधिकारी हातवर करीत आहे. पावसाळ्याचे दिवस आहे. माकडांनी घरावरील कवेलूचे तीन तेरा वाजविले. अशात नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा चणा बाजार समितीच्या शेडमध्ये ठेवण्यास अनुमती देण्याची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालासाठी असणाऱ्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचा साठा असल्याने शेतकऱ्यांना अडचण निर्माण होत आहे. येत्या दोन दिवसात चण्याची शासकीय खरेदी सुरू झाली नाही तर शेतकºयांच्या आक्रोशाला सामोर जाण्याची वेळ नाफेडवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.अनेकांची तुरही घरीचचणा खरेदीच्या पूर्वी तुरीच्या खरेदीतही हाच प्रकार घडला. ऐन वेळी तुरीची खरेदी बंद झाल्याने अनेकांना तुरी व्यापाऱ्यांना पड्या दरात देण्याची वेळ आली. गोदामाचे कारण काढून नाफेडच्यावतीने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या हमीभावाची आशा मावळल्या. तुरीच्या वादातच चण्याची खरेदी सुरू झाल्याने शेतकऱ्यांची चांगलीच फसगत झाल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी