शहरं
Join us  
Trending Stories
1
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
2
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
3
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
4
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
5
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
6
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
7
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
8
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
9
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
10
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
11
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
12
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
13
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?
14
नवा ट्विस्ट! "तू ये, नाहीतर तो मला मारून टाकेल"; लेकीचा 'तो' ऑडिओ ऐकून कुटुंबाला मोठा धक्का
15
इम्रान खान समर्थकांचा पाकिस्तानात मोठा राडा, ५००हून अधिक लोकांना अटक! झालं काय?
16
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
17
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
18
"घरं गाडली गेली, फक्त छप्पर बाहेर; आम्ही शिट्ट्या वाजवत होतो जेणेकरून लोकांना पळता येईल"
19
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
20
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश

८० टक्के पेरण्या आटोपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:23 IST

जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसादरम्यान जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी यंदा पेरणीची कामे आटोपली. तर बहूतांश शेतकऱ्यांनी त्याच महिन्याच्या अखेरीस झालेल्या जोरदार पावसादरम्यान विविध पिकांची पेरणी केली.

ठळक मुद्देकपाशीच्या लागवडीकडे पाठ : सोयाबीन लागवडीला शेतकऱ्यांची पसंती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसादरम्यान जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी यंदा पेरणीची कामे आटोपली. तर बहूतांश शेतकऱ्यांनी त्याच महिन्याच्या अखेरीस झालेल्या जोरदार पावसादरम्यान विविध पिकांची पेरणी केली. जिल्ह्यात आतापर्यंत पेरणीची कामे ८० टक्के पूर्ण झाली असून अनेक शेतकऱ्यांनी यंदा कपाशीच्या लागवडीकडे पाठ करीत सोयाबीनला पसंती दिल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.गत वर्षी कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. गुलाबी बोंडअळीने कपाशी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने यंदा घट नाही; पण ऐरवी लागवड होणारी कपाशीची शेतकरी पेरणी करतील असा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविला जात होता. जोरदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असतानाच जून महिन्याच्या शेवटी झालेल्या पावसादरम्यान अनेक शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना गती दिली. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात ८० टक्के पेरणीची कामे पूर्ण झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. यात तुरीची ४६ हजार ३९ हेक्टरवर, सोयाबीन ९० हजार ८३९ हेक्टरवर तर १ लाख ९८ हजार ५२६ हेक्टरवर कपाशीची लागवड झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.तर ४१० हेक्टरवर ज्वारी, ६२ हेक्टरवर मका, ११७.८ हेक्टरवर मुग, १४९.४ हेक्टरवर उडीद, ५४.०७ हेक्टरवर भुईमुंगाची लागवड करण्यात आली आहे. जून महिन्यात झालेल्या पावसादरम्यान ८० टक्के शेतकऱ्यांनी पेरणीची कामे आटोपली असली तरी २० टक्के शेतकऱ्यांना अजूनही पेरणी योग्य पावसाची प्रतीक्षाच आहे. यंदाच्या वर्षी वरुणराजा शेतकऱ्यांच्या वेळोवेळी अपेक्षा भंग करीत असल्याने शेती करावी की शेतजमिन कडीक ठेवायची असाच प्रश्न सध्या शेतकऱ्यांना सतावत आहे. ज्या शेतकऱ्यांनी जुन महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विविध पिकांची पेरणी केली. त्यांच्या शेतातील अंकुरलेले पीक पाण्याअभावी करपत असताना जून महिन्याच्या अखेरीस झालेला पाऊस पिकांना नवसंजीवणीच देणारा ठरला. येत्या काही दिवसात जोरदार पाऊस व्हावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांसह नागरिकांना आहे.उत्पन्नावर परिणाम होण्याची भीतीसध्याच्या विज्ञान युगात निसर्गावर अवलंबन शेती करणे म्हणजे जुगार खेळण्यागतच असल्याचे शेतकरी सांगतात. ज्यांनी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दुबार पेरणीची मोठी ‘रिस्क’ घेत विविध पिकांची पेरणी केली. त्यांच्या शेतातील पिकांना जूनच्या अखेरीस झालेला पाऊस नवसंजीवनी देणाराच ठरला. याच काळात जिल्ह्यातील बहूतांश शेतकऱ्यांनी विविध पिकांची पेरणी केली. सध्या स्थितीत जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणी करण्यात आलेल्या पिकाची बऱ्यापैकी झाली आहे तर जूनच्या शेवटात लागवड केलेले पीक सदर पिकांच्या तुलनेत वाढ होण्यामध्ये मागे असल्याने उत्पादनात घट होण्याची भीती आहे.मजूरही सहज मिळेनाजून महिन्याच्या अखेरीस जोरदार बरसल्यानंतर पावसाने थोडी उसंत घेतली आहे. उघाड मिळाल्याने सध्या निंदण, डवरण, खत देणे आदी कामे झटपट पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्राधान्य दिले जात आहे. परंतु, सदर कामे वेळीच पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना सहज मजुरही मिळत नसल्याने गावाबाहेरून शेतमजूर आणून ही कामे पुर्ण केली जात असल्याचे दिसून येत आहे.खतांच्या दरात वाढविविध पिकांची वाढ जोपाने व्हावी या उद्देशाने शेतकरी पिकांना रासायनिक खत देतात. परंतु, सध्यास्थितीत विविध खतांच्या दरात कमीत कमी ५० ते जास्तीत जास्त १०० रुपयांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटकाच सहन करावा लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्यावर्षी शासनाने सवलतीच्या दरात खत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी हवालदिल शेतकऱ्यांची आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस