शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

८० टक्के पेरण्या आटोपल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 23:23 IST

जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसादरम्यान जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी यंदा पेरणीची कामे आटोपली. तर बहूतांश शेतकऱ्यांनी त्याच महिन्याच्या अखेरीस झालेल्या जोरदार पावसादरम्यान विविध पिकांची पेरणी केली.

ठळक मुद्देकपाशीच्या लागवडीकडे पाठ : सोयाबीन लागवडीला शेतकऱ्यांची पसंती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या पावसादरम्यान जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी यंदा पेरणीची कामे आटोपली. तर बहूतांश शेतकऱ्यांनी त्याच महिन्याच्या अखेरीस झालेल्या जोरदार पावसादरम्यान विविध पिकांची पेरणी केली. जिल्ह्यात आतापर्यंत पेरणीची कामे ८० टक्के पूर्ण झाली असून अनेक शेतकऱ्यांनी यंदा कपाशीच्या लागवडीकडे पाठ करीत सोयाबीनला पसंती दिल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.गत वर्षी कपाशी पिकावर मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. गुलाबी बोंडअळीने कपाशी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याने यंदा घट नाही; पण ऐरवी लागवड होणारी कपाशीची शेतकरी पेरणी करतील असा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविला जात होता. जोरदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा असतानाच जून महिन्याच्या शेवटी झालेल्या पावसादरम्यान अनेक शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना गती दिली. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात ८० टक्के पेरणीची कामे पूर्ण झाल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. यात तुरीची ४६ हजार ३९ हेक्टरवर, सोयाबीन ९० हजार ८३९ हेक्टरवर तर १ लाख ९८ हजार ५२६ हेक्टरवर कपाशीची लागवड झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.तर ४१० हेक्टरवर ज्वारी, ६२ हेक्टरवर मका, ११७.८ हेक्टरवर मुग, १४९.४ हेक्टरवर उडीद, ५४.०७ हेक्टरवर भुईमुंगाची लागवड करण्यात आली आहे. जून महिन्यात झालेल्या पावसादरम्यान ८० टक्के शेतकऱ्यांनी पेरणीची कामे आटोपली असली तरी २० टक्के शेतकऱ्यांना अजूनही पेरणी योग्य पावसाची प्रतीक्षाच आहे. यंदाच्या वर्षी वरुणराजा शेतकऱ्यांच्या वेळोवेळी अपेक्षा भंग करीत असल्याने शेती करावी की शेतजमिन कडीक ठेवायची असाच प्रश्न सध्या शेतकऱ्यांना सतावत आहे. ज्या शेतकऱ्यांनी जुन महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विविध पिकांची पेरणी केली. त्यांच्या शेतातील अंकुरलेले पीक पाण्याअभावी करपत असताना जून महिन्याच्या अखेरीस झालेला पाऊस पिकांना नवसंजीवणीच देणारा ठरला. येत्या काही दिवसात जोरदार पाऊस व्हावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांसह नागरिकांना आहे.उत्पन्नावर परिणाम होण्याची भीतीसध्याच्या विज्ञान युगात निसर्गावर अवलंबन शेती करणे म्हणजे जुगार खेळण्यागतच असल्याचे शेतकरी सांगतात. ज्यांनी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दुबार पेरणीची मोठी ‘रिस्क’ घेत विविध पिकांची पेरणी केली. त्यांच्या शेतातील पिकांना जूनच्या अखेरीस झालेला पाऊस नवसंजीवनी देणाराच ठरला. याच काळात जिल्ह्यातील बहूतांश शेतकऱ्यांनी विविध पिकांची पेरणी केली. सध्या स्थितीत जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणी करण्यात आलेल्या पिकाची बऱ्यापैकी झाली आहे तर जूनच्या शेवटात लागवड केलेले पीक सदर पिकांच्या तुलनेत वाढ होण्यामध्ये मागे असल्याने उत्पादनात घट होण्याची भीती आहे.मजूरही सहज मिळेनाजून महिन्याच्या अखेरीस जोरदार बरसल्यानंतर पावसाने थोडी उसंत घेतली आहे. उघाड मिळाल्याने सध्या निंदण, डवरण, खत देणे आदी कामे झटपट पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांकडून प्राधान्य दिले जात आहे. परंतु, सदर कामे वेळीच पूर्ण करण्यासाठी शेतकऱ्यांना सहज मजुरही मिळत नसल्याने गावाबाहेरून शेतमजूर आणून ही कामे पुर्ण केली जात असल्याचे दिसून येत आहे.खतांच्या दरात वाढविविध पिकांची वाढ जोपाने व्हावी या उद्देशाने शेतकरी पिकांना रासायनिक खत देतात. परंतु, सध्यास्थितीत विविध खतांच्या दरात कमीत कमी ५० ते जास्तीत जास्त १०० रुपयांनी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटकाच सहन करावा लागत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्यावर्षी शासनाने सवलतीच्या दरात खत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी हवालदिल शेतकऱ्यांची आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस