शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

वर्ध्यात दारूबंदी नावालाच; बनावट दारूच्या घोटाने महिनाभरात आठ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2022 16:47 IST

मागील वर्षभरात पोलीस विभागाने दोन कोटी रुपयांवर दारूसाठा जप्त करून तब्बल साडेतीन हजार दारू विक्रेत्यांना अटक केल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देवर्षभरात २ कोटींवर दारूसाठा केला जप्त

वर्धा : वर्धा जिल्ह्यात १९७४ मध्ये दारूबंदी झाली असली तरीही आजघडीला मोठ्या प्रमाणात दारूची विक्री वर्धा जिल्ह्यातच सुरू आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्या बनावट दारूमुळे गेल्या महिनाभरात आठ ते नऊ जणांची प्रकृती बिघडून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे एक तर दारू खुली करा, अन्यथा कायमस्वरूपी तोडगा काढून दारू हद्दपार करा, अशी मागणी आता नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होते. वर्धा जिल्ह्याला महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांचा वारसा लाभल्याने १९७४ मध्ये जिल्हा दारूबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून वर्धा जिल्हा ‘ड्राय डिस्ट्रिक्ट’ म्हणून ओळखला जातो. मात्र, आजघडीला असे वास्तव आहे की, याच जिल्ह्यात बंदी नसलेल्या जिल्ह्यापेक्षा जास्त प्रामाणात म्हणजेच कोट्यवधी रुपयांच्या दारूची उलाढाल होते. हेही मात्र तितकेच खरे.

मागील वर्षभरात पोलीस विभागाने दोन कोटी रुपयांवर दारूसाठा जप्त करून तब्बल साडेतीन हजार दारू विक्रेत्यांना अटक केल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे, तर दारूची वाहतूक करणारी वाहनंही जप्त करण्यात आली आहेत. शहरासह जिल्ह्यात अगदी ठिकठिकाणी दारूची होणारी अवैध विक्री पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे, हे मात्र तितकेच खरे.

बनावट दारूचा कहर

जिल्ह्यात दारूबंदी असल्याने बनावट दारूचे विषही मोठ्या प्रमाणात विकले जाते. वर्ध्यात मध्य प्रदेश, दिल्ली आदी राज्यातील दारू विकली जात असल्याने मिळणाऱ्या दारूच्या बाटलीच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वर्ध्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारूची सर्रास होणारी विक्री पाहता नागरिकांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

पोलिसांचेही हात ओलेच...

जिल्ह्यात दारू विक्री रोखण्यासाठी विविध महिला मंडळांच्या रणरागिणींनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली, वारंवार पोलीस विभागाकडे निवेदने देत पाठपुरावाही करण्यात आला. मात्र, तरीदेखील जिल्ह्यात दारूबंदी केवळ नावालाच उरल्याचे दिसून येत आहे. याला काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कारणीभूत असल्याने अख्ख्या पोलीस विभागाची प्रतिमा मलिन होत चालली आहे. त्यामुळे याकडेही लक्ष देत दारूबंदी विशेष पोलीस ठाण्याची निर्मिती करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीalcohol prohibition actदारुबंदी कायदाwardha-acवर्धा