शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
5
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
6
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
7
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
8
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
9
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
10
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
11
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
12
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
13
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
14
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
15
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
16
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
17
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
18
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
19
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
20
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी

वर्ध्यात दारूबंदी नावालाच; बनावट दारूच्या घोटाने महिनाभरात आठ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2022 16:47 IST

मागील वर्षभरात पोलीस विभागाने दोन कोटी रुपयांवर दारूसाठा जप्त करून तब्बल साडेतीन हजार दारू विक्रेत्यांना अटक केल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देवर्षभरात २ कोटींवर दारूसाठा केला जप्त

वर्धा : वर्धा जिल्ह्यात १९७४ मध्ये दारूबंदी झाली असली तरीही आजघडीला मोठ्या प्रमाणात दारूची विक्री वर्धा जिल्ह्यातच सुरू आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्या बनावट दारूमुळे गेल्या महिनाभरात आठ ते नऊ जणांची प्रकृती बिघडून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे एक तर दारू खुली करा, अन्यथा कायमस्वरूपी तोडगा काढून दारू हद्दपार करा, अशी मागणी आता नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होते. वर्धा जिल्ह्याला महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांचा वारसा लाभल्याने १९७४ मध्ये जिल्हा दारूबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून वर्धा जिल्हा ‘ड्राय डिस्ट्रिक्ट’ म्हणून ओळखला जातो. मात्र, आजघडीला असे वास्तव आहे की, याच जिल्ह्यात बंदी नसलेल्या जिल्ह्यापेक्षा जास्त प्रामाणात म्हणजेच कोट्यवधी रुपयांच्या दारूची उलाढाल होते. हेही मात्र तितकेच खरे.

मागील वर्षभरात पोलीस विभागाने दोन कोटी रुपयांवर दारूसाठा जप्त करून तब्बल साडेतीन हजार दारू विक्रेत्यांना अटक केल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे, तर दारूची वाहतूक करणारी वाहनंही जप्त करण्यात आली आहेत. शहरासह जिल्ह्यात अगदी ठिकठिकाणी दारूची होणारी अवैध विक्री पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे, हे मात्र तितकेच खरे.

बनावट दारूचा कहर

जिल्ह्यात दारूबंदी असल्याने बनावट दारूचे विषही मोठ्या प्रमाणात विकले जाते. वर्ध्यात मध्य प्रदेश, दिल्ली आदी राज्यातील दारू विकली जात असल्याने मिळणाऱ्या दारूच्या बाटलीच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वर्ध्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारूची सर्रास होणारी विक्री पाहता नागरिकांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

पोलिसांचेही हात ओलेच...

जिल्ह्यात दारू विक्री रोखण्यासाठी विविध महिला मंडळांच्या रणरागिणींनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली, वारंवार पोलीस विभागाकडे निवेदने देत पाठपुरावाही करण्यात आला. मात्र, तरीदेखील जिल्ह्यात दारूबंदी केवळ नावालाच उरल्याचे दिसून येत आहे. याला काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कारणीभूत असल्याने अख्ख्या पोलीस विभागाची प्रतिमा मलिन होत चालली आहे. त्यामुळे याकडेही लक्ष देत दारूबंदी विशेष पोलीस ठाण्याची निर्मिती करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीalcohol prohibition actदारुबंदी कायदाwardha-acवर्धा