शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात दारूबंदी नावालाच; बनावट दारूच्या घोटाने महिनाभरात आठ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2022 16:47 IST

मागील वर्षभरात पोलीस विभागाने दोन कोटी रुपयांवर दारूसाठा जप्त करून तब्बल साडेतीन हजार दारू विक्रेत्यांना अटक केल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देवर्षभरात २ कोटींवर दारूसाठा केला जप्त

वर्धा : वर्धा जिल्ह्यात १९७४ मध्ये दारूबंदी झाली असली तरीही आजघडीला मोठ्या प्रमाणात दारूची विक्री वर्धा जिल्ह्यातच सुरू आहे. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्या बनावट दारूमुळे गेल्या महिनाभरात आठ ते नऊ जणांची प्रकृती बिघडून त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे एक तर दारू खुली करा, अन्यथा कायमस्वरूपी तोडगा काढून दारू हद्दपार करा, अशी मागणी आता नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची विक्री होते. वर्धा जिल्ह्याला महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांचा वारसा लाभल्याने १९७४ मध्ये जिल्हा दारूबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून वर्धा जिल्हा ‘ड्राय डिस्ट्रिक्ट’ म्हणून ओळखला जातो. मात्र, आजघडीला असे वास्तव आहे की, याच जिल्ह्यात बंदी नसलेल्या जिल्ह्यापेक्षा जास्त प्रामाणात म्हणजेच कोट्यवधी रुपयांच्या दारूची उलाढाल होते. हेही मात्र तितकेच खरे.

मागील वर्षभरात पोलीस विभागाने दोन कोटी रुपयांवर दारूसाठा जप्त करून तब्बल साडेतीन हजार दारू विक्रेत्यांना अटक केल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे, तर दारूची वाहतूक करणारी वाहनंही जप्त करण्यात आली आहेत. शहरासह जिल्ह्यात अगदी ठिकठिकाणी दारूची होणारी अवैध विक्री पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे, हे मात्र तितकेच खरे.

बनावट दारूचा कहर

जिल्ह्यात दारूबंदी असल्याने बनावट दारूचे विषही मोठ्या प्रमाणात विकले जाते. वर्ध्यात मध्य प्रदेश, दिल्ली आदी राज्यातील दारू विकली जात असल्याने मिळणाऱ्या दारूच्या बाटलीच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वर्ध्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारूची सर्रास होणारी विक्री पाहता नागरिकांच्या आरोग्यावरही याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

पोलिसांचेही हात ओलेच...

जिल्ह्यात दारू विक्री रोखण्यासाठी विविध महिला मंडळांच्या रणरागिणींनी रस्त्यावर उतरून आंदोलने केली, वारंवार पोलीस विभागाकडे निवेदने देत पाठपुरावाही करण्यात आला. मात्र, तरीदेखील जिल्ह्यात दारूबंदी केवळ नावालाच उरल्याचे दिसून येत आहे. याला काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी कारणीभूत असल्याने अख्ख्या पोलीस विभागाची प्रतिमा मलिन होत चालली आहे. त्यामुळे याकडेही लक्ष देत दारूबंदी विशेष पोलीस ठाण्याची निर्मिती करण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीalcohol prohibition actदारुबंदी कायदाwardha-acवर्धा