शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

78 हजार गरजूंना मिळाला ‘जनआरोग्य’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 05:00 IST

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ९९६ उपचार व १२१ पाठपुरावा सेवा उपलब्ध आहेत. प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी १ लाख ५० हजार रुपयांची शस्त्रक्रिया सेवा या योजनेंतर्गत उपलब्ध आहे. अवयव प्रत्यारोपणासाठी २ लाख ५० हजार इतक्या खर्चाचा समावेश आहे, तर प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत प्रति कुटुंब ५ लाख इतक्या खर्चाच्या विम्याचा समावेश आहे. जिल्ह्यात आठ रुग्णालयांमध्ये ही योजना राबविण्यात येते.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गरजू व गरिबांना विनामूल्य उपचार व शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कार्यान्वित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील आठ रुग्णालयांमध्ये ७८ हजार रुग्णांवर विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांना आधार मिळाला आहे. विशेष म्हणजे या योजनेतून शस्त्रक्रियांवर १९४ कोटींचा खर्च झाला आहे.महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ९९६ उपचार व १२१ पाठपुरावा सेवा उपलब्ध आहेत. प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी १ लाख ५० हजार रुपयांची शस्त्रक्रिया सेवा या योजनेंतर्गत उपलब्ध आहे. अवयव प्रत्यारोपणासाठी २ लाख ५० हजार इतक्या खर्चाचा समावेश आहे, तर प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत प्रति कुटुंब ५ लाख इतक्या खर्चाच्या विम्याचा समावेश आहे. जिल्ह्यात आठ रुग्णालयांमध्ये ही योजना राबविण्यात येते. त्यात कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम, आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी, जिल्हा रुग्णालय वर्धा, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट व आर्वी, डॉ. राणे ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आर्वी, डॉ. लोढा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल हिंगणघाट व ग्रामीण रुग्णालय कारंजाचा समावेश आहे.

रुग्णालयनिहाय शस्त्रक्रिया अन् खर्च...-    सेवाग्राम येथील रुग्णालयात ३१ हजार ७९४, सावंगी येथील रुग्णालयात ४२ हजार ६३७, जिल्हा रुग्णालय वर्धा येथे २ हजार १३७,  उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट व आर्वी तसेच ग्रामीण रुग्णालय कारंजा येथे ४१३,  डॉ. राणे हॉस्पिटल आर्वी येथे १ हजार २५८ व लोढा हॉस्पिटल हिंगणघाट येथे ४६२ गरजूंवर योजनेद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

गरीब व गरजूंनाही चांगली आरोग्य सेवा मिळायला पाहिजे. त्यासाठी शासनाच्या विविध योजना असून त्याची प्रभावी अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात करावी. जनआरोग्य योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजूंना कसा देता येईल, यासाठी आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. - प्रेरणा देशभ्रतार, जिल्हाधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Healthआरोग्य