शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

78 हजार गरजूंना मिळाला ‘जनआरोग्य’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2021 05:00 IST

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ९९६ उपचार व १२१ पाठपुरावा सेवा उपलब्ध आहेत. प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी १ लाख ५० हजार रुपयांची शस्त्रक्रिया सेवा या योजनेंतर्गत उपलब्ध आहे. अवयव प्रत्यारोपणासाठी २ लाख ५० हजार इतक्या खर्चाचा समावेश आहे, तर प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत प्रति कुटुंब ५ लाख इतक्या खर्चाच्या विम्याचा समावेश आहे. जिल्ह्यात आठ रुग्णालयांमध्ये ही योजना राबविण्यात येते.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गरजू व गरिबांना विनामूल्य उपचार व शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कार्यान्वित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील आठ रुग्णालयांमध्ये ७८ हजार रुग्णांवर विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात आल्याने त्यांना आधार मिळाला आहे. विशेष म्हणजे या योजनेतून शस्त्रक्रियांवर १९४ कोटींचा खर्च झाला आहे.महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ९९६ उपचार व १२१ पाठपुरावा सेवा उपलब्ध आहेत. प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी १ लाख ५० हजार रुपयांची शस्त्रक्रिया सेवा या योजनेंतर्गत उपलब्ध आहे. अवयव प्रत्यारोपणासाठी २ लाख ५० हजार इतक्या खर्चाचा समावेश आहे, तर प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत प्रति कुटुंब ५ लाख इतक्या खर्चाच्या विम्याचा समावेश आहे. जिल्ह्यात आठ रुग्णालयांमध्ये ही योजना राबविण्यात येते. त्यात कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम, आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी, जिल्हा रुग्णालय वर्धा, उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट व आर्वी, डॉ. राणे ऑर्थोपेडिक हॉस्पिटल आर्वी, डॉ. लोढा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल हिंगणघाट व ग्रामीण रुग्णालय कारंजाचा समावेश आहे.

रुग्णालयनिहाय शस्त्रक्रिया अन् खर्च...-    सेवाग्राम येथील रुग्णालयात ३१ हजार ७९४, सावंगी येथील रुग्णालयात ४२ हजार ६३७, जिल्हा रुग्णालय वर्धा येथे २ हजार १३७,  उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट व आर्वी तसेच ग्रामीण रुग्णालय कारंजा येथे ४१३,  डॉ. राणे हॉस्पिटल आर्वी येथे १ हजार २५८ व लोढा हॉस्पिटल हिंगणघाट येथे ४६२ गरजूंवर योजनेद्वारे शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

गरीब व गरजूंनाही चांगली आरोग्य सेवा मिळायला पाहिजे. त्यासाठी शासनाच्या विविध योजना असून त्याची प्रभावी अंमलबजावणी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात करावी. जनआरोग्य योजनेचा लाभ जास्तीत जास्त गरजूंना कसा देता येईल, यासाठी आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत. - प्रेरणा देशभ्रतार, जिल्हाधिकारी, वर्धा.

 

टॅग्स :Healthआरोग्य