शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

दोन वर्षांत सोसायटीला ७६४ पत्र

By admin | Updated: September 18, 2014 00:01 IST

सार्वजनिक बांधकाम विभाग आर्वी अंतर्गत ई-निविदा प्रणाली धाब्यावर बसवून दोन वर्षांत सोसायटीच्या नावाने तब्बल ७६४ कामांचे पत्र वाटप केले आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत खुद्द बांधकाम

ई-टेंडर प्रणाली गुंडाळली : माहिती अधिकारात पितळ उघडआष्टी (श़) : सार्वजनिक बांधकाम विभाग आर्वी अंतर्गत ई-निविदा प्रणाली धाब्यावर बसवून दोन वर्षांत सोसायटीच्या नावाने तब्बल ७६४ कामांचे पत्र वाटप केले आहे. माहिती अधिकार कायद्यांतर्गत खुद्द बांधकाम विभागानेच ही माहिती दिली आहे. शासनाकडून सदर कामाचा प्रोगाम व निधी मंजूर नसताना एवढी खटाटोप कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे़कार्यकारी अभियंत्यांना १५ लाखापर्यंतची कामे सोसायटीला देण्याचे अधिकार आहेत़ यासाठी उपविभागीय अभियंता कार्यालयाकडून कामाची माहिती प्राप्त करून घेत कामे वाटप करावी लागतात़ यात सोसायटी ३३ टक्के, सुशिक्षित बेरोजगार अभियंते ३३ टक्के, कंत्राटदार ३३ टक्के याप्रमाणे समप्रमाणात कामे देण्याचे शासनाने आदेश आहेत; पण येथील कार्यकारी अभियंता वाट्टेल तेव्हा कामाचे पत्र वाटत आहेत़ त्यापोटी ५ ते १० टक्के पर्यंत कमीशन उकळण्याचा प्रकार सुरू आहे. बांधकाम विभागाने किती कामे वाटप केली, यासाठी माहिती अधिकार कायद्यांतर्गत अर्ज केला असता प्राप्त माहितीमध्ये अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. १ एप्रिल २०१३ ते १० सप्टेंबर २०१४ या कालावधीमध्ये एकूण ७६४ कामांचे पत्र वाटप केल्याची माहिती टेंडर लिपीक धनंजय भाकरे यांनी दिली आहे. विशेष म्हणजे यातील एकही काम सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना दिले नाही. वाटप केलेली सर्वाधिक कामे देवळी व पुलगाव या दोन विभागातील आहेत़ सद्यस्थितीत आचारसंहिता लागली आहे. असे असताना कार्यकारी अभियंता पी.आर. जनबंधू सर्रास कामाचे पत्र वाटप करीत आहे. सर्व कामांसाठी शासनाने परवानगी दिली नाही. मागील वर्षी काम करणारे कंत्राटदार बील निघावे म्हणून कार्यालयाला येरझारा मारून थकले; पण संबंधित अधिकारी बील देण्यास टाळाटाळ करीत आहे.आर्वी विभागांतर्गत आर्वी, आष्टी, कारंजा, पुलगाव, देवळी, आर्वी उपविभाग क्रमांक ३ अशी एकूण ६ कार्यालये आहेत़ विकास कामाची देखभाल व दुरुस्ती करताना सर्व उपविभागाला समान निधीचे वाटप व्हायला पाहिजे; पण नियम पायदळी तुडवित कार्यकारी अभियंता जनबंधू नियमबाह्य कामांचे वाटप करीत आहे़ अधीक्षक अभियंता पदाचाही कार्यभार असल्याने वाटेल त्या कामांना मंजुरी देण्याचे काम सुरू आहे. पुलगाव व देवळी उपविभागात कामे झाली नाही; पण वारंवार बीले काढली जात आहेत़ पुलगाव-आर्वी, आर्वी-खरांगणा, आर्वी-आष्टी या मार्गावर खड्डे आहे़ ही कामे न करता पुलगाव, देवळी शहरात कामे झाल्याचे खर्च सांगतो़ या प्रकाराची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी करावी, अशी मागणी होत आहे़(प्रतिनिधी)