शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

आधार खात्याशी लिंक नसल्याने 73 हजार शेतकरी अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 15:42 IST

PM Kisan Scheme : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून वर्षाला ६ हजार रुपये देण्याची घोषणा केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती.

वर्धा : पंतप्रधान किसान सन्मान योजनेतून वर्षाला ६ हजार रुपये देण्याची घोषणा केंद्र सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी केली होती. या योजनेत वर्धा जिल्ह्यात १.१३ लाख शेतक-यांची नोंदणी लाभार्थी म्हणून करण्यात आली. मात्र जिल्ह्यातील ७३ हजार ४१८ शेतक-यांचे बँक खाते आधारशी लिंक नसल्याने त्यांना या योजनेचा लाभच मिळाला नसल्याची माहिती पुढे आली आहे. वर्धा जिल्ह्यात १ लाख १३ हजार १३ शेतकरी पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे लाभार्थी म्हणून पात्र आहे. यापैकी ३९ हजार ४१८ शेतक-यांचे बँक खाते मोबाईल क्रमांक, आधार याच्याशी लिंक करण्यात आले आहे. या शेतक-यांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये प्रत्येकी २ हजार प्रमाणे तीन टप्प्यात दिले जात आहे. सप्टेंबर महिनाअखेरपर्यंत १.१३ लाख शेतक-यांची नोंदणी या योजनेच्या लाभासाठी करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने पीएम किसान पोर्टल येथे हे नावे नोंदविले. यापैकी ७३ हजार ५८७ शेतक-यांचे बँक खाते, मोबाईल क्रमांक, आधारशी लिंक झालेले नाहीत. त्यामुळे केवळ ३९ हजार ४१८ शेतक-यांनाच या योजनेचा लाभ मिळू शकला आहे.-----सेवा केंद्रात लिंकचे काम युद्धपातळीवर चालणारजिल्ह्यातील लाभ न मिळालेल्या ७३ हजार ५८५ शेतक-यांची संख्या लक्षात घेऊन आता बँक खाते, मोबाईल क्रमांक व आधार याच्याशी लिंक करण्याचे आदेश सेवा केंद्रांना प्रशासनाने दिले आहे. त्या दृष्टीने सर्व तहसीलदार व महाऑनलाइनचे समन्वयक शेतक-यांचे बँक खाते लिंक करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सदर कामाला गती देण्याच्या दृष्टीने कृषी आयुक्तांनीही जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत. 

टॅग्स :FarmerशेतकरीAdhar Cardआधार कार्डPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना