शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षांत ७०७ सर्पदंश

By admin | Updated: August 7, 2016 00:12 IST

पावसाळ्याच्या दिवसांत शेतात काम करीत असलेल्या शेतमजुरांना सर्पदंश होण्याचे प्रमाण अधिक आहे.

सहा जणांचा मृत्यू : जिल्ह्यात मुबलक औषधीसाठा रूपेश खैरी वर्धा पावसाळ्याच्या दिवसांत शेतात काम करीत असलेल्या शेतमजुरांना सर्पदंश होण्याचे प्रमाण अधिक आहे. यात वेळीच उपचार मिळाला तर त्यांचे प्राण वाचणे शक्य असल्याचे वर्धा जिल्ह्यात दिसून आले आहे. जिल्ह्यात गत दीड वर्षात ७०७ जणांना सर्पदंश झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. यातील केवळ सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. ही आकडेवारी शासकीय असून हा आकडा अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय अशा एकूण आठ रुग्णालयांत गत दीड वर्षांत सर्पदंश झालेले एकूण ६३२ रुग्ण उपचाराकरिता दाखल झाले. यात २०२५-१६ या आर्थिक वर्षात ५६६ सर्पदंशाच्या रुग्णाची नोंद करण्यात आली असून यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर याच आठ रुग्णालयांत सुरू वार्षिक सत्रात सर्पदंशाचे ६६ रुग्ण दाखल झाले. त्यांच्यावर उपचार करून त्यांचे प्राण वाचविण्यात जिल्हा आरोग्य विभागाला यश आले असून यातील एकाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती आहे. तर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सन २०१५-१६ या आर्थिक वर्षांत सर्पदंश झालेले एकूण ६५ रुग्ण दाखल झाले होते. त्यातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर सुरू वर्षांत केवळ १० रुग्ण आले असून त्यांच्यावर उपचार झाल्याने कुणाचाही मृत्यू झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे. शासनाने मागविली सर्पमित्रांची माहिती साप म्हणताच अनेकांच्या अंगावर काटा उभा झाल्याशिवाय राहत नाही. सापांची भीती सर्वसमान्यांना वाटत असल्याने वर्धेत सापांपासून त्यांच्या बचावाकरिता व सर्परक्षणाकरिता जिल्ह्यात अनेक सर्पमित्र पुढे आले आहेत; मात्र त्यांची कुठलीही नोंद जिल्ह्याच्या वनविभागात नाही. शिवाय त्यांच्याकडून पकडण्यात येत असलेल्या सापांची नोंदही वन विभागाकडून कुठेच करण्यात येत नसल्याने जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सर्पमित्रांची माहिती गोळा करण्याच्या सूचना शासनाच्यावतीने देण्यात आल्याची माहिती आहे. वर्धेत २० च्या वर सर्पमित्र कार्यरत जिल्ह्यात घरोघरी निघणारे साप पकडण्याकरिता वर्धा, हिंगणघाट, आर्वी व समुद्रपूर या तालुक्यात एकूण २० सर्पमित्र असल्याची माहिती आहे. त्यांच्याकडून साप पकडून तो वनविभागाच्या स्वाधीन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. असे कधी कधीच होत असून सर्पमित्रच पकडलेले साप शहरालगत असलेल्या जंगलात सोडत असल्याचे दिसून आले आहे. या सर्पमित्रांसह सापांची कुठेच नोंद होत नाही.