शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, दुसऱ्यांदा म्हणाले...!
2
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
3
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
4
राज ठाकरे-निशिकांत दुबे वादावर स्वामी अविमुक्तेश्वरानंदांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
5
'हा' माणूस फक्त कुत्र्यांना फिरवून महिन्याला कमावतोय ४.५ लाख रुपये, बिझनेस आयडिया व्हायरल!
6
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
7
वाद झाला अन् मध्यरात्री... दापोलीत लहान भावाची धारदार शस्त्राने हत्या; उन्हवरे गाव हादरलं
8
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
9
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
10
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
11
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
12
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
13
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
14
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
15
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
16
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
17
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
18
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
19
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
20
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?

दीड वर्षांत ७०७ सर्पदंश

By admin | Updated: August 7, 2016 00:12 IST

पावसाळ्याच्या दिवसांत शेतात काम करीत असलेल्या शेतमजुरांना सर्पदंश होण्याचे प्रमाण अधिक आहे.

सहा जणांचा मृत्यू : जिल्ह्यात मुबलक औषधीसाठा रूपेश खैरी वर्धा पावसाळ्याच्या दिवसांत शेतात काम करीत असलेल्या शेतमजुरांना सर्पदंश होण्याचे प्रमाण अधिक आहे. यात वेळीच उपचार मिळाला तर त्यांचे प्राण वाचणे शक्य असल्याचे वर्धा जिल्ह्यात दिसून आले आहे. जिल्ह्यात गत दीड वर्षात ७०७ जणांना सर्पदंश झाल्याची नोंद आरोग्य विभागाकडे करण्यात आली आहे. यातील केवळ सहा जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. ही आकडेवारी शासकीय असून हा आकडा अधिक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय अशा एकूण आठ रुग्णालयांत गत दीड वर्षांत सर्पदंश झालेले एकूण ६३२ रुग्ण उपचाराकरिता दाखल झाले. यात २०२५-१६ या आर्थिक वर्षात ५६६ सर्पदंशाच्या रुग्णाची नोंद करण्यात आली असून यातील तिघांचा मृत्यू झाला आहे. तर याच आठ रुग्णालयांत सुरू वार्षिक सत्रात सर्पदंशाचे ६६ रुग्ण दाखल झाले. त्यांच्यावर उपचार करून त्यांचे प्राण वाचविण्यात जिल्हा आरोग्य विभागाला यश आले असून यातील एकाचाही मृत्यू झाला नसल्याची माहिती आहे. तर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सन २०१५-१६ या आर्थिक वर्षांत सर्पदंश झालेले एकूण ६५ रुग्ण दाखल झाले होते. त्यातील तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर सुरू वर्षांत केवळ १० रुग्ण आले असून त्यांच्यावर उपचार झाल्याने कुणाचाही मृत्यू झाला नसल्याचे सांगण्यात आले आहे. शासनाने मागविली सर्पमित्रांची माहिती साप म्हणताच अनेकांच्या अंगावर काटा उभा झाल्याशिवाय राहत नाही. सापांची भीती सर्वसमान्यांना वाटत असल्याने वर्धेत सापांपासून त्यांच्या बचावाकरिता व सर्परक्षणाकरिता जिल्ह्यात अनेक सर्पमित्र पुढे आले आहेत; मात्र त्यांची कुठलीही नोंद जिल्ह्याच्या वनविभागात नाही. शिवाय त्यांच्याकडून पकडण्यात येत असलेल्या सापांची नोंदही वन विभागाकडून कुठेच करण्यात येत नसल्याने जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सर्पमित्रांची माहिती गोळा करण्याच्या सूचना शासनाच्यावतीने देण्यात आल्याची माहिती आहे. वर्धेत २० च्या वर सर्पमित्र कार्यरत जिल्ह्यात घरोघरी निघणारे साप पकडण्याकरिता वर्धा, हिंगणघाट, आर्वी व समुद्रपूर या तालुक्यात एकूण २० सर्पमित्र असल्याची माहिती आहे. त्यांच्याकडून साप पकडून तो वनविभागाच्या स्वाधीन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. असे कधी कधीच होत असून सर्पमित्रच पकडलेले साप शहरालगत असलेल्या जंगलात सोडत असल्याचे दिसून आले आहे. या सर्पमित्रांसह सापांची कुठेच नोंद होत नाही.