शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण करातून ६.७५ कोटी वसूल

By admin | Updated: June 11, 2014 00:11 IST

शहरातून शिक्षणकराच्या नावावर गत आठ वर्षांत सहा कोटी ७५ लाख २१ हजार ६२२ रुपये वसूल करण्यात आले. हा कर वर्धा वासियांकडून नगर पालिकेच्यावतीने वसूल करण्यात येत असला तरी पालिकेच्या शिक्षण

माहितीचा अधिकार : पालिकेच्या शाळांचे खस्ता हाल, नावाचे फलक बेपत्ता, बसण्याकरिता बाकही नाही रूपेश खैरीे - वर्धा शहरातून शिक्षणकराच्या नावावर गत आठ वर्षांत सहा कोटी ७५ लाख २१ हजार ६२२ रुपये वसूल करण्यात आले. हा कर वर्धा वासियांकडून नगर पालिकेच्यावतीने वसूल करण्यात येत असला तरी पालिकेच्या शिक्षण विभागाला याचा कुठलाही लाभ होत नसल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले. मग शहरातून हा कर कशाकरिता, असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.नगर परिषदेच्यावतीने कर आकारताना प्रत्येक रहिवाशाकडून शिक्षणकर वसूल करण्यात येतो. या कराचा वापर शहराच्या शैक्षणिक विकासाकरिता करण्यात येत असल्याची धारणा कर देणाऱ्याच्या मनात येत आहे; मात्र वास्तव काही औरच आहे. या कराचा पालिकेला कुठलाही लाभ नाही. त्यांना यातील एक टक्काही वापरण्याची मुभा नाही. शासनाला शिक्षण कराच्या नावावर एवढा कर देणाऱ्या येथील पालिकेच्या शाळांची मात्र दैना झाली आहे. शहरात पालिकेच्या एकूण ११ शाळा आहेत. यात दहा प्राथमिक व एका हायस्कूलचा समावेश आहे. या शाळातून पालिकेच्यावतीने ज्ञानदानाचे कार्य होते. ज्ञानदान होत असल्याने या इमारती विविध सुविधांना सुसज्ज असणे अनिवार्य आहे. तसे शासनाचे नियमही आहेत. असे असताना येथे कुठल्याही सुविधा नाहीत. शिक्षणाच्या नावावर मोठा कर शासनालास देणाऱ्या पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्याकरिता साधे बाक नाहीत. त्यांना शाळेत चटईवर बसावे लागते. त्याही फाटक्याच. पिण्याकरिता शुद्ध पाणी नाही, तर स्वतंत्र शौचालयाची सुविधा शहरातील पालिकेच्या एकाही शाळेत नसल्याचे दिसून आले आहे.शासनाच्या नियमानूसार सर्वच शाळेत मुलांकरिता व मुलींकरिता स्वतंत्र शौचालय देण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र वर्धा शहरातील पालिकेच्या कुठल्याही शाळेत अशी सुविधा नाही. शहरातून वसूल होत असलेल्या कराच्या रक्कमेतून काहीच मिळत नसले तरी शासनाकडून येत असलेले ८० टक्के अनुदान व पालिकेचा २० टक्क्यांचा वाटा यातून पालिकेच्या शिक्षण विभागाचे कार्य सुरू असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. सुरू महिन्याच्या २६ तारखेपासून नवे शैक्षधिक सत्र सुरू आहे. असे असताना पालिकेच्या एकाही शाळेची रंगरंगोटी वा कुठलीही दुरूस्ती करण्यात आली नाही. शहरातील प्रत्येक शाळेला मोठ्या विभुतींची नावे देण्यात आली आहेत. त्यांची नावेही या शाळांवर दिसत नाही. काही ठिकाणी तर पालिकेची शाळा आहे हे कुणाला शोधूनही सापडणे कठीण आहे.