शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

शिक्षण करातून ६.७५ कोटी वसूल

By admin | Updated: June 11, 2014 00:11 IST

शहरातून शिक्षणकराच्या नावावर गत आठ वर्षांत सहा कोटी ७५ लाख २१ हजार ६२२ रुपये वसूल करण्यात आले. हा कर वर्धा वासियांकडून नगर पालिकेच्यावतीने वसूल करण्यात येत असला तरी पालिकेच्या शिक्षण

माहितीचा अधिकार : पालिकेच्या शाळांचे खस्ता हाल, नावाचे फलक बेपत्ता, बसण्याकरिता बाकही नाही रूपेश खैरीे - वर्धा शहरातून शिक्षणकराच्या नावावर गत आठ वर्षांत सहा कोटी ७५ लाख २१ हजार ६२२ रुपये वसूल करण्यात आले. हा कर वर्धा वासियांकडून नगर पालिकेच्यावतीने वसूल करण्यात येत असला तरी पालिकेच्या शिक्षण विभागाला याचा कुठलाही लाभ होत नसल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले. मग शहरातून हा कर कशाकरिता, असा सवाल सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.नगर परिषदेच्यावतीने कर आकारताना प्रत्येक रहिवाशाकडून शिक्षणकर वसूल करण्यात येतो. या कराचा वापर शहराच्या शैक्षणिक विकासाकरिता करण्यात येत असल्याची धारणा कर देणाऱ्याच्या मनात येत आहे; मात्र वास्तव काही औरच आहे. या कराचा पालिकेला कुठलाही लाभ नाही. त्यांना यातील एक टक्काही वापरण्याची मुभा नाही. शासनाला शिक्षण कराच्या नावावर एवढा कर देणाऱ्या येथील पालिकेच्या शाळांची मात्र दैना झाली आहे. शहरात पालिकेच्या एकूण ११ शाळा आहेत. यात दहा प्राथमिक व एका हायस्कूलचा समावेश आहे. या शाळातून पालिकेच्यावतीने ज्ञानदानाचे कार्य होते. ज्ञानदान होत असल्याने या इमारती विविध सुविधांना सुसज्ज असणे अनिवार्य आहे. तसे शासनाचे नियमही आहेत. असे असताना येथे कुठल्याही सुविधा नाहीत. शिक्षणाच्या नावावर मोठा कर शासनालास देणाऱ्या पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना बसण्याकरिता साधे बाक नाहीत. त्यांना शाळेत चटईवर बसावे लागते. त्याही फाटक्याच. पिण्याकरिता शुद्ध पाणी नाही, तर स्वतंत्र शौचालयाची सुविधा शहरातील पालिकेच्या एकाही शाळेत नसल्याचे दिसून आले आहे.शासनाच्या नियमानूसार सर्वच शाळेत मुलांकरिता व मुलींकरिता स्वतंत्र शौचालय देण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र वर्धा शहरातील पालिकेच्या कुठल्याही शाळेत अशी सुविधा नाही. शहरातून वसूल होत असलेल्या कराच्या रक्कमेतून काहीच मिळत नसले तरी शासनाकडून येत असलेले ८० टक्के अनुदान व पालिकेचा २० टक्क्यांचा वाटा यातून पालिकेच्या शिक्षण विभागाचे कार्य सुरू असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. सुरू महिन्याच्या २६ तारखेपासून नवे शैक्षधिक सत्र सुरू आहे. असे असताना पालिकेच्या एकाही शाळेची रंगरंगोटी वा कुठलीही दुरूस्ती करण्यात आली नाही. शहरातील प्रत्येक शाळेला मोठ्या विभुतींची नावे देण्यात आली आहेत. त्यांची नावेही या शाळांवर दिसत नाही. काही ठिकाणी तर पालिकेची शाळा आहे हे कुणाला शोधूनही सापडणे कठीण आहे.