शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

६३८ संसाराच्या पुन्हा जुळल्या रेशीम गाठी

By admin | Updated: April 18, 2017 01:19 IST

लग्नाच्या गाठी स्वर्गातच जुळतात, असे म्हटले जाते. मात्र लग्नानंतर समज गैरसमजामुळे निर्माण होणाऱ्या कलहावरचे उत्तर पृथ्वीवरच मिळते.

१,६१२ अर्ज दाखल : महिला तक्रार निवारण केंद्राचे कार्यगौरव देशमुख वर्धालग्नाच्या गाठी स्वर्गातच जुळतात, असे म्हटले जाते. मात्र लग्नानंतर समज गैरसमजामुळे निर्माण होणाऱ्या कलहावरचे उत्तर पृथ्वीवरच मिळते. वाद विकोपाला जाऊन विभक्त होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या संसाराला नवसंजिवनी देण्याचे काम पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्रातून चालत आलेले आहे. या केंद्रातून वर्धा जिल्ह्यात या वर्षातील म्हणजे १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ पर्यंतचा १२ महिन्यात विस्कटलेल्या ६३८ संसाराच्या गाठी पुन्हा जोडण्यात आल्या आहेत. या केंद्राने एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या १२ महिन्यात तुटणाऱ्या संसाराची घडी बसवित त्यांना ‘नांदा सौख्य भरे’ हा कान मंत्र दिला. पती-पत्नी हे संसाराची दोन चाके असून यातील एक चाक जरी अविश्वास, संशयाच्या गळात रूतले तर संसाराचा गाडा मध्येच थांबतो थेट घटस्फोट घेण्यापर्यंत प्रकारण पोहचते. अनेकांना न्यायालयाची पायरी चढावी लागते. तेथील फेऱ्या मारण्यातच काळ सरतो. नवरा-बायको सोबतच त्यांच्या मुलांसह दोन्ही कडील कुटुंबाचीही वाताहत होते. शिवाय या दोन्ही कुटुंबामध्ये निर्माण झालेले वैर आयुष्यभर राहते. छोट्या-छोट्या कारणामधून निर्माण झालेले गैरसमज केवळ सुसंवादाच्या अभवाने वाढत जातात. रेशीम गाठीचे बंध गळून पडतात. पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण केंद्राची संख्या ४ आहे. वर्धा जिल्ह्यातील तक्रार निवारण केंद्रामध्ये सेलू, हिंगणघाट, कारंजा हे तीन समुपदेशन केंद्र तसेच वर्धा येथे मुख्य केंद्र आहे.या तीन समुपदेशन केंद्रासह वर्धेच्या मुख्य महिला तक्रार निवारण केंद्रातील एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या १२ महिन्यामध्ये दाखल झालेल्या ७८९ तक्रारी पैकी २४२ संसाराची घडी बसविण्यात पोलिसांना यश आले आहे. वर्धा जिल्ह्यातील ४ केंद्रातून १ हजार ६१२ तक्रारी पैकी ६३८ संसाराच्या घडी बसविण्यात या विभागाला यश आले आहे.वर्धा पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली महिला तक्रार निवारण केंद्राच्या प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक प्रभा एकुरके, अनू राऊत (एएसआय), सुरेखा खापर्डे (एलएचसी), सविता मुडे (एलएचसी), अंजू वाघ (एनपीसी), विना क्षीरसागर व इतर महिला कर्मचारी तक्रारदारांचे समुपदेशन करून संसार तुटल्यावर होणारे परिणाम, त्यांची गंभीरता रागाच्या भरात घेण्यात येणारे निर्णय या बाबत मार्गदर्शन करीत आहेत. या १२ महिन्यात वर्धा जिल्ह्यात एकूण १ हजार ६१२ अर्ज दाखल झाले आहेत. यातील ६३८ अर्ज समुपदेशाने निकाली काढण्यात आली असून यांनी नव्याने संसार पुन्हा सुरू केला आहे. १ हजार ३९९ प्रकरणाचा निपटारा झाला आहे.यातील २१३ प्रकरणे प्रलंबित आहेत. ५७८ प्रकरणात तक्रारी फाईल झाल्या आहेत, आठ प्रकरण पोलीस ठाण्यात परत पाठविण्यात आली आहेत. २४ प्रकरणात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात १ प्रकरण बलात्काराचे आहे. महिलावर होणाऱ्या स्वास्थ्य अधिकार कौटुंबिक हिंसाचार २००५ नुसार न्यायालयात एकूण १२१ प्रकरणे दाखल असल्याचे पोलीस विभागाने सांगितले आहे.अधिकाधिक तक्रारी व्यसनाधीनतेच्या तक्रार निवारण केंद्राकडे येणाऱ्या बहुतेक तक्रारी या व्यसनाधीन पतीच्या असतात. दारूड्या नवऱ्याकडून होणाऱ्या छळ, मुलाबाळाची होणारी परवड या कारणामुळे पतीशी वाद, छळाला कंटाळून जाणाऱ्या अनेक महिला तक्रार निवारण केंद्राकडे येतात.या शिवाय संशयाची वृत्ती, पुरूषी अहंकार, विभक्त कुटुंब पद्धतीत ज्येष्ठाचा नसलेला आधार, छोट्या-छोट्या कारणावरून गैरसमज आणि सुसंवादाचा अभाव यामुळे संसार तुटत आहेत. विशेष म्हणजे सुशिक्षित, उच्च शिक्षित कुटुंबातूनही या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येत आहेत. या विभागातील स्थानिक समितीही यांना समुपदेश करण्यासाठी काम करीत असते. तसेच स्थानिक समितीमध्ये जिल्ह्यातील महिलांचा समावेश असून प्रत्येक महिन्याला बैठक घेण्यात येते.