शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

‘गाळमुक्त धरण’चे काम ६० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 23:42 IST

शासनाने ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ ही योजना गत वर्षीपासून हाती घेतली आहे. गत वर्षी बोटावर मोजण्याइतकीच कामे जिल्हा प्रशासानाने हाती घेवून ती पूर्ण केली; पण यंदाच्या वर्षी एकूण ४८ कामांचे नियोजन करून त्यापैकी पहिल्या टप्प्यात २६ कामे हाती घेण्यात आले आहे. ती झटपट पूर्ण केली जात आहेत.

ठळक मुद्दे२५० शेतकऱ्यांनी नेला तलावातील गाळ : २२३.६४ स.घ.मि.ने वाढेल जलाशयांची पाणी साठवण क्षमता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाने ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ ही योजना गत वर्षीपासून हाती घेतली आहे. गत वर्षी बोटावर मोजण्याइतकीच कामे जिल्हा प्रशासानाने हाती घेवून ती पूर्ण केली; पण यंदाच्या वर्षी एकूण ४८ कामांचे नियोजन करून त्यापैकी पहिल्या टप्प्यात २६ कामे हाती घेण्यात आले आहे. ती झटपट पूर्ण केली जात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील विविध तलावांमधून ६० टक्के गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे सदर तलावांची पाणी साठवण क्षमता २२३.६४ स.घ.मि.ने वाढणार आहे. इतकेच नव्हे तर २५० शेतकºयांना सदर तलावातील गाळ नि:शुल्क देण्यात आला आहे.गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील आष्टी व सेलू तालुका वगळता इतर सहा तालुक्यातील एकूण ४८ कामे हाती घेवून ती पावसाळ्या पूर्वी पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सदर ४८ कामांदरम्यान जिल्ह्यातील विविध जलायशांमधून एकूण ३ लाख ९३ हजार २७९.५ घ.मि. गाळाचा उपसा करून या जलाशयांच्या पाणी साठवण क्षमतेत ३९३.२९ स.घ.मि.ने वाढ करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. सदर योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात २६ कामे हाती घेवून ती पूर्णत्त्वास नेण्याचा प्रयत्न होत आहे.आतापर्यंत शासकीय निधीतून ४२ हजार ३२ घ.मि. तर लोकसहभागातून १ लाख ९१ हजार ६१० घ.मि. गाळ विविध तलावातून काढण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध तलाव व जलाशयांमधुन आतापर्यंत २ लाख ३३ हजार ६४२ घ.मि. गाळ काढण्यात आल्याने सदर तलावांच्या पाणी साठवण क्षमतेत २२३.६४ स.घ.मि.ने वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले. तलावांमधून काढण्यात येत असलेला गाळ परिसरातील शेत जमिनीची सुपिकता वाढविण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून शेतकºयांना नि:शुल्क दिल्या जात आहे. आतापर्यंत २५० शेतकºयांनी याचा लाभ घेतला असून ही योजना शेतकºयांसाठी फाद्याची ठरत आहे.हिंगणघाट विभाग आघाडीवरजिल्ह्यातील हिंगणघाट महसूल उपविभागात नऊ कामे करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी आठ कामे युद्धपातळीवर सुरू असल्याने व तेथे मोठ्या प्रमाणात कामे झाली असल्याने हिंगणघाट उपविभागाने सदर योजनेच्या कामात आघाडी घेतल्याचे सांगण्यात येते. तर वर्धा उपविभागात १३ पैकी ८ कामे व त्या खालोखाल आर्वी उपविभागात २६ पैकी ९ कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले.गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. गत वर्षी बोटावर मोजण्या इतकी कामे पूर्ण झाली. परंतु, यंदा मोठ्या प्रमाणात कामे हाती घेवून ती पूर्णत्त्वास नेली जात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील ६० टक्के काम पूर्ण झाले आहेत. यामुळे जलाशयांची पाणी साठवण क्षमता २२३.६४ स.घ.मि.ने वाढणार आहे. यंदाचा पाणी फाऊंडेशनचा उपक्रम नुकताच संपल्याने या कामाला आता वेग दिल्या मिळणार आहे. नियोजित वेळेत गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेची जिल्ह्यातील संपूर्ण कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.-हेमंत गहलोत, जिल्हा जलसंवर्धन अधिकारी, जि.प. वर्धा.

टॅग्स :Damधरण