शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘गाळमुक्त धरण’चे काम ६० टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 23:42 IST

शासनाने ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ ही योजना गत वर्षीपासून हाती घेतली आहे. गत वर्षी बोटावर मोजण्याइतकीच कामे जिल्हा प्रशासानाने हाती घेवून ती पूर्ण केली; पण यंदाच्या वर्षी एकूण ४८ कामांचे नियोजन करून त्यापैकी पहिल्या टप्प्यात २६ कामे हाती घेण्यात आले आहे. ती झटपट पूर्ण केली जात आहेत.

ठळक मुद्दे२५० शेतकऱ्यांनी नेला तलावातील गाळ : २२३.६४ स.घ.मि.ने वाढेल जलाशयांची पाणी साठवण क्षमता

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शासनाने ‘गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार’ ही योजना गत वर्षीपासून हाती घेतली आहे. गत वर्षी बोटावर मोजण्याइतकीच कामे जिल्हा प्रशासानाने हाती घेवून ती पूर्ण केली; पण यंदाच्या वर्षी एकूण ४८ कामांचे नियोजन करून त्यापैकी पहिल्या टप्प्यात २६ कामे हाती घेण्यात आले आहे. ती झटपट पूर्ण केली जात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील विविध तलावांमधून ६० टक्के गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे सदर तलावांची पाणी साठवण क्षमता २२३.६४ स.घ.मि.ने वाढणार आहे. इतकेच नव्हे तर २५० शेतकºयांना सदर तलावातील गाळ नि:शुल्क देण्यात आला आहे.गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील आष्टी व सेलू तालुका वगळता इतर सहा तालुक्यातील एकूण ४८ कामे हाती घेवून ती पावसाळ्या पूर्वी पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सदर ४८ कामांदरम्यान जिल्ह्यातील विविध जलायशांमधून एकूण ३ लाख ९३ हजार २७९.५ घ.मि. गाळाचा उपसा करून या जलाशयांच्या पाणी साठवण क्षमतेत ३९३.२९ स.घ.मि.ने वाढ करण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. सदर योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात २६ कामे हाती घेवून ती पूर्णत्त्वास नेण्याचा प्रयत्न होत आहे.आतापर्यंत शासकीय निधीतून ४२ हजार ३२ घ.मि. तर लोकसहभागातून १ लाख ९१ हजार ६१० घ.मि. गाळ विविध तलावातून काढण्यात आला आहे. जिल्ह्यातील विविध तलाव व जलाशयांमधुन आतापर्यंत २ लाख ३३ हजार ६४२ घ.मि. गाळ काढण्यात आल्याने सदर तलावांच्या पाणी साठवण क्षमतेत २२३.६४ स.घ.मि.ने वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले. तलावांमधून काढण्यात येत असलेला गाळ परिसरातील शेत जमिनीची सुपिकता वाढविण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवून शेतकºयांना नि:शुल्क दिल्या जात आहे. आतापर्यंत २५० शेतकºयांनी याचा लाभ घेतला असून ही योजना शेतकºयांसाठी फाद्याची ठरत आहे.हिंगणघाट विभाग आघाडीवरजिल्ह्यातील हिंगणघाट महसूल उपविभागात नऊ कामे करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी आठ कामे युद्धपातळीवर सुरू असल्याने व तेथे मोठ्या प्रमाणात कामे झाली असल्याने हिंगणघाट उपविभागाने सदर योजनेच्या कामात आघाडी घेतल्याचे सांगण्यात येते. तर वर्धा उपविभागात १३ पैकी ८ कामे व त्या खालोखाल आर्वी उपविभागात २६ पैकी ९ कामे सुरू असल्याचे सांगण्यात आले.गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेचे यंदाचे हे दुसरे वर्ष आहे. गत वर्षी बोटावर मोजण्या इतकी कामे पूर्ण झाली. परंतु, यंदा मोठ्या प्रमाणात कामे हाती घेवून ती पूर्णत्त्वास नेली जात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात पहिल्या टप्प्यातील ६० टक्के काम पूर्ण झाले आहेत. यामुळे जलाशयांची पाणी साठवण क्षमता २२३.६४ स.घ.मि.ने वाढणार आहे. यंदाचा पाणी फाऊंडेशनचा उपक्रम नुकताच संपल्याने या कामाला आता वेग दिल्या मिळणार आहे. नियोजित वेळेत गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजनेची जिल्ह्यातील संपूर्ण कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.-हेमंत गहलोत, जिल्हा जलसंवर्धन अधिकारी, जि.प. वर्धा.

टॅग्स :Damधरण