शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

५४९ शाळांमध्ये स्वातंत्र्य दिनी एकाचवेळी वृक्षारोपण

By admin | Updated: August 15, 2015 02:13 IST

वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये जनतेचा सहभाग वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्येही या मोहिमेमधून जागृती निर्माण करण्यासाठी शनिवारी भारतीय स्वातंत्र्य ...

सामाजिक वनीकरणचा उपक्रम: दहा हजार ९८० विविध प्रजातींची रोपेवर्धा : वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये जनतेचा सहभाग वाढविण्यासोबतच विद्यार्थ्यांमध्येही या मोहिमेमधून जागृती निर्माण करण्यासाठी शनिवारी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमांनंतर जिल्ह्यातील ५४९ शाळांमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सामाजिक वनीकरण विभागातर्फे जिल्हा परिषदेच्या ५२५ व नगरपरिषदेच्या २४ शाळांमध्ये वृक्षारोपणाकरिता १० हजार ९८० विविध प्रजातींचे रोपे उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती वनीकरणचे उपसंचालक प्रवीणकुमार बडगे यांनी दिली आहे.वृक्षारोपण मोहीम उपवनसंरक्षक, उपसंचालक सामाजिक वनीकरण तसेच जिल्हा परिषद व नगर परिषदेमार्फत राबविण्यात येणार आहे. तालुकास्तरावर वनपरीक्षेत्र अधिकारी, तालुका लागवड अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांच्या समन्वयाने वृक्षारोपणाचे कार्यक्रम शाळांमध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत.शाळा परिसरामध्ये असलेलया मोकळ्या जागेत, संरक्षणासाठी कुंपण आणि पाण्याची सोय असलेल्या शाळांची या मोहिमेसाठी निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये वर्धा येथील ३८, सेलू ४५, देवळी ५९, हिंगणघाट १०३, समुद्रपूर ९४, आर्वी १२६, आष्टी ४१ आणि कारंजा तालुक्यातील ४३ शाळांची निवड करण्यात आली आहे. नगरपरिषदेच्या २४ शाळांच्या परिसरातही सामाजिक वनिकरण व वनविभागातर्फे वृक्ष लागवडीसाइी खड्डे खोदण्यासोबतच रोपेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. झेंडा वंदनानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम या शाळांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या मोहिमेसाठी फळ देणारी वृक्ष आंबा, चिंच, आवळा, कवठ तसेच सावली देणारी वृक्ष वड, पिंपळ, कडुनिंब, कॅसिचा, पळस, रेन ट्री, फुले देणाऱ्या वृक्षांमध्ये गुलमोहर आदी वृक्ष लावण्यात येणार आहेत.वृक्षारोपणानंतर वृक्ष संवर्धनासाठी किमान चार वर्ष पाणी पुरविणे तसेच संगोपन करण्याची जबाबदारी संबंधित शाळांची राहणार आहे. ज्या शाळांमध्ये वृक्षलागवड, संरक्षण आणि देखभालीमध्ये उत्कृष्ट कार्य करतील, अशा शाळांना तालुका, जिल्हा व विभागस्तरावर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय हरित सेना शाळांच्या धर्तीवर पर्यावरण रक्षक सेना हा उपक्रमही राबविण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक वनिकरण विभागाने दिली आहे.(प्रतिनिधी)