शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
3
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
4
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
5
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
6
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
7
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
8
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
9
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
10
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
11
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
12
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
13
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
14
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
15
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
16
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
17
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
18
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
19
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
20
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?

५४७ शेतकरी घेतात भाजीपाल्याचे उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 05:00 IST

सदर बंदीच्या काळात याच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा हा नाशवंत शेतमाल (भाजीपाला) कुठलीही अडचण न येता नियमित बाजारपेठत पोहोचल्यास वर्धा जिल्ह्यात भाजीकोंडी होणार नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी कृषी विभागाकडून योग्य नियोजन करून त्यावर प्रभावी कार्यवाही होणेही गरजेचे आहे.

ठळक मुद्देहिंगणघाट ठरतेय हब : प्रभावी नियोजन झाल्यास सुटणार भाजीकोंडी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इतर जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात येणाऱ्या भाजीपाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बंदी घालण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून जिल्हाधिकाºयांचा हा निर्णय थोडा कठोर मात्र महत्त्वपूर्ण असून जिल्ह्यात कुठल्याही परिस्थितीत भाजीकोंडी होऊ नये यासाठी बुधवारी पार पडलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना योग्य नियोजनासह प्रभावी कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर कृषी विभागाने जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची गाव निहाय माहिती गोळा केली. जिल्ह्यातील ५११ गावांमधील ५४७ शेतकरी विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेत असल्याचे यातून पुढे आले आहे.वर्धा तालुक्यातील १२ गावांमधील ४५ शेतकरी विविध प्रकारचा १६२.२० क्विंटल, कारंजा तालुक्यातील २६ गावांमधील ५५ शेतकरी ३९२.४० क्विंटल, देवळी तालुक्यातील १४ गावांमधील ४१ शेतकरी ३५४.५ क्विंटल, सेलू तालुक्यातील १२ गावांमधील ५७ शेतकरी १५६८.९७ क्विंटल, समुद्रपूर तालुक्यातील १४ गावांमधील ३५ शेतकरी ४१३ क्विंटल, हिंगणघाट तालुक्यातील २१७ गावांमधील २०० शेतकरी ३५३६.३७ क्विंटल, आर्वी तालुक्यातील २०४ गावांमधील ५२ शेतकरी ४५७.२० क्विंटल तर आष्टी तालुक्यातील १२ गावांमधील ६२ शेतकरी २३१०.१० क्विंटल विविध प्रजातींच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. सदर बंदीच्या काळात याच भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा हा नाशवंत शेतमाल (भाजीपाला) कुठलीही अडचण न येता नियमित बाजारपेठत पोहोचल्यास वर्धा जिल्ह्यात भाजीकोंडी होणार नसल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, त्यासाठी कृषी विभागाकडून योग्य नियोजन करून त्यावर प्रभावी कार्यवाही होणेही गरजेचे आहे.भविष्यातील नियोजन गरजेचेकोरोनाविरुद्धची लढाई पुढील काही महिने सुरू राहील असे सांगण्यात येत आहे. याच काळात जीवनावश्यक वस्तू असलेल्या भाजीपाल्याची कोंडी वर्धा जिल्ह्यात होऊ नये म्हणून कृषी विभागाने आताच भविष्यातील संकट लक्षात घेऊन योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे.या नाशवंत शेतमालाचे होतेय जिल्ह्यात उत्पादनजिल्ह्यात कांदा, नाममात्र स्वरूपात बटाटा, टमाटर, अद्रक, हिंरवी मिर्ची, गवार, वाल, पत्ताकोबी, फुलकोबी, पालक, मेथी, सांबार, वांगी, चवळी, भेंडी, ढेमस आदी भाजीपाल्याचे उत्पादन सध्या वर्धा जिल्ह्यात होत असल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे.सद्यस्थितीत मुबलक प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन वर्धा जिल्ह्यात होत आहे. भविष्यात भाजीकोंडी होऊ नये म्हणून कृषी सहाय्यकांच्या मदतीने भाजीपाला उत्पादक व व्यापारी, अडते तसेच दलाल यांची साखळी तालुकास्तरावर करण्यात येत आहे. शिवाय प्रभावी कार्यवाही करण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कुणी कामात कुचराई करताना आढळल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वर्धा.

टॅग्स :vegetableभाज्याFarmerशेतकरी