शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

जिल्ह्यात ५१७ ग्रामपंचायती ब्रॉडब्रँडने जोडणार

By admin | Updated: September 11, 2014 23:44 IST

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जग जवळ येत असताना ग्रामपंचायती यात मागे राहू नये, बदलत्या जगाचा वेध घेता यावा तसेच माहिती तंत्रज्ञान सुविधांचा लाभ घेत काम अधिक गतीमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करता यावे

राज्यात २८ हजार ग्रामपंचायती : नागरिकांना होणार सुविधाप्रफुल्ल लुंगे - सेलूतंत्रज्ञानाच्या माध्यमातून जग जवळ येत असताना ग्रामपंचायती यात मागे राहू नये, बदलत्या जगाचा वेध घेता यावा तसेच माहिती तंत्रज्ञान सुविधांचा लाभ घेत काम अधिक गतीमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करता यावे या उदात्त हेतूने आगामी काळात देशातील ग्रामपंचायती, आॅप्टिकल फायबर नेटवर्कने, ब्रॉडबॅँड इंटरनेट कनेक्शनद्वारे जोडण्यात येणार आहे. राज्यातील २८ हजार ग्रामपंचायतींना त्यामुळे उच्च क्षमतेची आणि उच्च दर्जाची ब्रॉँडबॅँड इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळण्यास मदत होणार आहे. यात जिल्ह्यातील ५१७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या आधुनिक सुविधेमुळे राज्यात सुरू असलेल्या ई-गव्हर्नन्स आणि ई-पंचायत (संग्राम) या प्रकल्पांच्या अंमलबजावणीस गती येणार आहे. केंद्र सरकारने नॅशनल आॅप्टिकल फायबर नेटवर्क या योजनेद्वारे हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी केंद्राने भारत ब्रॉडबॅँड नेटवर्क लिमिटेड ही कंपनी स्थापन केली आहे. या अंतर्गत देशभरातील अडीच लाख ग्रामपंचायतीमध्ये ही ब्रॉडबॅँड इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेला राष्ट्रीय संपत्ती म्हणूनही जाहीर करण्यात आले आहे. ही योजना राबविण्यासाठी केंद्र व राज्य सरकार आणि भारत ब्रॉडबॅँड नेटवर्क लिमीटेड यांच्यात गत वर्षी त्रिपक्षीय सामंजस्य करार झाला आहे. ई-पंचायत कार्यक्रमांतर्गत राज्यात संग्राम अर्थात संगणीकृत ग्रामीण महाराष्ट्र या प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत राज्यातील सर्व जिल्हा परिषद सर्व पंचायत समिती आणि जवळपास २८ हजार ग्रामपंचायती इंटरनेटने जोडल्या आहेत. यापैकी २० हजार गावांमध्ये ई-बॅँकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली जात असून अशी सेवा देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.या आधुनिक प्रणालीमुळे गावखेडेही आता हायटेक होणार असल्याने महात्मा गांधीच्या स्वप्नातील खेड्यांचे चित्र निर्माण होत असल्याचा प्रत्यय येवू लागला आहे. ग्रामपंचायतीत इंटरनेट सुविधा सुरू झाल्यानंतर त्याचा सर्वाधिक लाभ शेतकऱ्यांना होणार असल्याचे बोलले जात आहे.