शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

निम्न वर्धा प्रकल्पातून होणार ५०५ मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 20:12 IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत झाला सामंजस्य करार

आर्वी : निम्न वर्धा प्रकल्पातून तब्बल ५०५ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती केली जाणार आहे. या तरंगता सौरऊर्जा प्रकल्प विकासासाठी राज्याच्या महानिर्मिती आणि केंद्राच्या सतलज जल विद्युत निगम लिमिटेडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

निम्न (लोअर) वर्धा प्रकल्प नजिकच्या वरुड-धानोडी येथील वर्धा नदीवर आहे. यावर प्रस्तावित तरंगता सौरऊर्जा प्रकल्पाकरिता महानिर्मितीने व्यवहार्यता सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार ७३२ हेक्टर जलक्षेत्राची निवड केली जाणार आहे. विकासकामांसाठी ३०३० कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे. वार्षिक हरित ऊर्जा निर्मिती १०५१.२८ दशलक्ष युनिट्स अपेक्षित असून ३६ महिन्यांमध्ये हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

तरंगता सौरऊर्जा प्रकल्पामुळे राज्यात सौरऊर्जा निर्मितीला चालना मिळेल. नूतनीकरण योग्य बंध पूर्ण करण्यास, सौरऊर्जा प्रकल्प स्थापित क्षमतेचे आणि निर्मितीचे समतुल्य उत्सर्जन टाळून कार्बन उत्सर्जन कमी करण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. यातून पारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी महाग जीवाश्म इंधन खरेदी टाळता येईल. प्रस्तावित ५०५ मेगावॅटच्या क्षमतेला लक्षात घेत, वार्षिक सीओ२ उत्सर्जन जवळपास आठ लाख ६२ हजार ४९ टन कमी होईल. 

वार्षिक कोळशाचाही वापर आठ लाख ४९ हजार ४३४ टनाने कमी होण्यास मदत मिळेल. प्रकल्पात ४९ टक्के सहभाग सतलज जल विद्युत निगम लिमिटेड आणि ५१ टक्के सहभाग महानिर्मितीचा राहणार आहे. या करारावर गुरुवारी स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. करार करताना महानिर्मिती आणि सतलज जल विद्युत निगम लिमिटेड, जलसंपदाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

१४०० जणांना मिळणार रोजगारया प्रकल्पामुळे आर्वी तालुक्याने उद्योग व रोजगार निर्मितीकडे पहिली झेप घेतली आहे. या प्रकल्पामुळे जवळपास १४०० व्यक्तींना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे बेराेजगारी कमी होण्यासही मदत मिळणार आहे.

आर्वी तालुक्यातील धानोडी येथील लोअर वर्धा प्रकल्पावर ५०५ मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पास राज्य सरकारने मान्यता दिली. केंद्राच्या सतलज जलविद्युत निगम व राज्याची महानिर्मिती संयुक्तपणे ३०३० कोटींची गुंतवणूक करून प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पातून १४०० व्यक्तींना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे.- सुमित वानखेडे, आर्वी

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस