शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

५०० एकरातील पिके पुराच्या पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:00 IST

वर्धा नदीकाठावरील रोहणा, दिघी, सायखेडा व वडगांव येथील शेतकऱ्यांची अंदाजे ५०० एकरातील पिके पाण्याखाली आल्याने पिके धोक्यात आली आहे. निम्न वर्धा प्रकल्पातील ३१ दरवाजे ३० से.मी.ने उघडल्यामुळे नदीत ८५७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडला. रात्रीच्या सुमारास पाऊस सुरूच असल्याने धरणाचे सोडलेले पाणी व पावसाचे पाणी यामुळे वर्धा नदीतील पुराच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे मोठे नुकसान : निम्न वर्र्धा प्रकल्पाची ३१ दारे उघडली, सतर्कतेचा दिला इशारा

लोकमत न्यूज नेटवर्करोहणा : सततच्या पावसाने निम्न वर्धा प्रकल्पाचे ३१ दारे ३० सें.मी.ने उघडल्याने वर्धा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने तसेच पावसाच्या कोसळधाराने पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नदीकाठालगतच्या शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरुन सुमारे ५०० एकरातील पिके धोक्यात येण्याची शक्यता आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.वर्धा नदीकाठावरील रोहणा, दिघी, सायखेडा व वडगांव येथील शेतकऱ्यांची अंदाजे ५०० एकरातील पिके पाण्याखाली आल्याने पिके धोक्यात आली आहे. निम्न वर्धा प्रकल्पातील ३१ दरवाजे ३० से.मी.ने उघडल्यामुळे नदीत ८५७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडला. रात्रीच्या सुमारास पाऊस सुरूच असल्याने धरणाचे सोडलेले पाणी व पावसाचे पाणी यामुळे वर्धा नदीतील पुराच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. परिणामी, नदीला मिळणाऱ्या नदी,नाल्यांचे पाणी वर्धा नदीपात्रात समावू शकले नसल्याने नदीकाठावर असलेले जमीन पाण्याखाली गेली आहे. रोहणा, सायखेडा, दिघी, वडगाव येथील शेतकऱ्यांनी शेतात कापूस, तुर, सोयाबीन ही पीके घेतली आहे. शेतकºयांनी मोठा खर्च करुन पिके घेतली आहे.जमीनीत बऱ्यापैकी ओलावा असल्यामुळे बहुतेक शेतकºयांनी आपल्या पिकांना नुकताच रासायनिक खतांचा डोज दिला व कीड नियंत्रणासाठी महागड्या औषधींची फवारणी केली होती.मात्र, आता पीक धोक्यात आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे. शासनाने पिकांचे सर्वेक्षण करुन आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.

अप्पर वर्धा प्रकल्पाचे दार दोन सें.मी.ने उघडल्याने वर्धा नदीला आलेल्या पुराचे पाणी देऊरवाडा येथील पुलावरून वाहत असल्याने लोअर वर्धा प्रकल्पाचे दारं जास्त वर घेणे आवश्यक होते. म्हणून वरिष्ठांच्या आदेशान्वये सध्या ३१ दरवाजे १३० से.मी. उघडल्याने वर्धा नदीत ३४६६ क्युसेक प्रति सकेंद पाण्याचा विसर्ग सुरू आहे.- देवानंद कापडे, शाखा अभियंता निम्न वर्धा प्रकल्प, धनोडी (बहादुरपूर)महामार्गावरील पुलाचे पाणी थेट शेतातसाहूर : आधीच विविध संकटांनी ग्रासलेल्या शेतकऱ्यावर आता नवीनच संकट ओढावले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पूल शेतजमिनीच्या सात फूट उंच केल्याने पुलावरील पाणी थेट शेतकऱ्याच्या शेतात गेले असून पीक नष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकºयावर आत्महत्येची वेळ आली आहे. मात्र, कंत्राटदाराचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. साहूर नजीकच्या द्रुगवाडा येथील शेतकरी रामदास कोंढेकर यांचे राष्ट्रीय महामार्गालगत शेत आहे. महामार्गावर असलेल्या नाल्यावरील पूल हा शेतजमिनीच्या पातळीपेक्षा सात फूट खोल असून शेकडो एकरातील नालीचे पाणी पुलाच्या खड्ड्यात साचत असल्याने शेताला मोठाले भगदाड पडले असून शेतातील पिके धोक्यात आली आहे. रस्ता काठचे पाणी शेतात पाझरुन दोन एक शेत जलमय झाले आहे. हेच पाणी विहिरीत पाझरुन कृषीपंपासह विहिरी खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत आमदार दादाराव केचे यांनी आर.आर. कन्स्ट्रक्शनच्या कंत्राटदाराला स्वत: शेतात आणून दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, अद्यापही कंत्राटदाराने कुठलीही दुरुस्ती केलेली नाही. कंत्राटदाराने पुलाचे काम करताना शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष दिले नसल्याने साहूर येथील शेतकरी इंदिराबाई, दादाराव तळहांडे, शेख वशिक अली यांच्यासह अनेक शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आणली असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.याप्रकाराबाबत आष्टी येथील तहसीलदारांनी संबंधित कंत्राटदाराला नाली व पुलाची दुरुस्ती करुन पिकांच्या नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी, अन्यथा आमच्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही.शेतकरी-रामदास कोंढेकार .द्रुगवाडा.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर