शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

नुकसानाच्या तक्रारीला ५० दिवस लोटले; पंचनाम्याची प्रतीक्षा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 17:12 IST

पीकविमा कंपनी अधिकाऱ्यांची मनमानी : सोयाबिन पिकांची ९० टक्के झाली काढणी

लोकमत न्यूज नेटवर्क विजयगोपाल: देवळी तालुक्यातील विजयगोपाल महसूल मंडळात ३१ ऑगस्टला अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी या संदर्भात तक्रारीही केल्या. मात्र, याला ५० दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप पंचनामे करण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे. आजघडीला ९० टक्के सोयाबीन पिकाची काढणी झाल्याने कंपनीच्या आणि शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांत तीव्र असंतोष आहे.

शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतकऱ्यांना झालेल्या पिकाच्या नुकसानभरपाईसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविली आहे. शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभ घेण्यासाठी फक्त एक रुपयात शेतकऱ्यांना विमा काढून दिल्या गेला. वर्धा जिल्यात शासनाकडून आयसीआयसीआय लोम्बर्ड कंपनीने योजनेचे काम घेतले. हजारो शेतकऱ्यांनी हा पीक विमा काढलेला आहे. परंतु विमा काढल्यापासून तक्रार टाकल्यापासून आज जवळपास ५० दिवस झाले. जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांची सोयाबीन काढणी झाली. तरीही शेतकऱ्याच्या शेतात अजूनही पंचनामे झाले नाही, विजयगोपाल महसूल मंडळात ३१ ऑगस्टला अतिवृष्टी झाली होती. १४४ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. नुकसानाच्या ७२ तासांच्या आत तक्रारी केल्यास २५ दिवसांच्या आत पंचनामे केले जातील, असे सांगण्यात आले होते. परंतु तक्रारी टाकल्यापासून ५० दिवस पूर्ण झाले तरी पंचनामे करण्यात आले नाही. 

मंडळात १२०० तक्रारी विजयगोपाल महसूल मंडळात नुकसान झाल्याच्या १ हजार २०० तक्रारी आल्याचे कंपनीच्या तालुका कार्यालयातून कळविण्यात आले. आतापर्यंत निम्म्या तक्रारीचे पंचनामे झाले असून, अजून जवळपास ६०० ते ७०० तक्रारींचे पंचनामे व्हायचे असल्याचे बोलले जात आहे. एकट्या विजयगोपालमधील २०० पंचनामे बाकी असल्याचे सांगण्यात आले आहे.

"पंचनामे झाले नाही तर तक्रारी रद्द झाल्या असतील किंवा सरासरी सॅम्पल लागले असतील. हे बघून सांगावे लागेल." - वसीम शेख, जिल्हा समन्वयक, आयसीआयसीआय लोम्बार्ड.

"शेतात झालेल्या पीक नुकसानाची १ सप्टेंबरला तक्रार टाकली. अजूनपर्यंत शेतातील पंचनामे झाले नाहीत. माझ्यासारखे अजून २०० शेतकरी आहेत. जर दोन दिवसांत यावर काही तोडगा निघाला नाही तर आम्ही कंपनीविरोधात आंदोलन करू."- अभिलाष धांगे, शेतकरी 

"तुमच्या तक्रारी रद्द झाल्या असतील, असे सांगितले. परंतु डॉकेट आयडी आल्यावर तक्रारी रद्द कशा होतील आणि रद्द झाल्या तर शेतकऱ्यांना कळविले का नाही. ही कंपनीने शेतकऱ्याची फसवणूक केली आहे. याकरिता कंपनीला याचे परिणाम भोगावे लागतील."- राहुल पेटकर, उपजिल्हाध्यक्ष, युवा संघर्ष मोर्चा

टॅग्स :wardha-acवर्धाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र