शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

नुकसानाच्या तक्रारीला ५० दिवस लोटले; पंचनाम्याची प्रतीक्षा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 17:12 IST

पीकविमा कंपनी अधिकाऱ्यांची मनमानी : सोयाबिन पिकांची ९० टक्के झाली काढणी

लोकमत न्यूज नेटवर्क विजयगोपाल: देवळी तालुक्यातील विजयगोपाल महसूल मंडळात ३१ ऑगस्टला अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी या संदर्भात तक्रारीही केल्या. मात्र, याला ५० दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप पंचनामे करण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे. आजघडीला ९० टक्के सोयाबीन पिकाची काढणी झाल्याने कंपनीच्या आणि शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांत तीव्र असंतोष आहे.

शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतकऱ्यांना झालेल्या पिकाच्या नुकसानभरपाईसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविली आहे. शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभ घेण्यासाठी फक्त एक रुपयात शेतकऱ्यांना विमा काढून दिल्या गेला. वर्धा जिल्यात शासनाकडून आयसीआयसीआय लोम्बर्ड कंपनीने योजनेचे काम घेतले. हजारो शेतकऱ्यांनी हा पीक विमा काढलेला आहे. परंतु विमा काढल्यापासून तक्रार टाकल्यापासून आज जवळपास ५० दिवस झाले. जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांची सोयाबीन काढणी झाली. तरीही शेतकऱ्याच्या शेतात अजूनही पंचनामे झाले नाही, विजयगोपाल महसूल मंडळात ३१ ऑगस्टला अतिवृष्टी झाली होती. १४४ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. नुकसानाच्या ७२ तासांच्या आत तक्रारी केल्यास २५ दिवसांच्या आत पंचनामे केले जातील, असे सांगण्यात आले होते. परंतु तक्रारी टाकल्यापासून ५० दिवस पूर्ण झाले तरी पंचनामे करण्यात आले नाही. 

मंडळात १२०० तक्रारी विजयगोपाल महसूल मंडळात नुकसान झाल्याच्या १ हजार २०० तक्रारी आल्याचे कंपनीच्या तालुका कार्यालयातून कळविण्यात आले. आतापर्यंत निम्म्या तक्रारीचे पंचनामे झाले असून, अजून जवळपास ६०० ते ७०० तक्रारींचे पंचनामे व्हायचे असल्याचे बोलले जात आहे. एकट्या विजयगोपालमधील २०० पंचनामे बाकी असल्याचे सांगण्यात आले आहे.

"पंचनामे झाले नाही तर तक्रारी रद्द झाल्या असतील किंवा सरासरी सॅम्पल लागले असतील. हे बघून सांगावे लागेल." - वसीम शेख, जिल्हा समन्वयक, आयसीआयसीआय लोम्बार्ड.

"शेतात झालेल्या पीक नुकसानाची १ सप्टेंबरला तक्रार टाकली. अजूनपर्यंत शेतातील पंचनामे झाले नाहीत. माझ्यासारखे अजून २०० शेतकरी आहेत. जर दोन दिवसांत यावर काही तोडगा निघाला नाही तर आम्ही कंपनीविरोधात आंदोलन करू."- अभिलाष धांगे, शेतकरी 

"तुमच्या तक्रारी रद्द झाल्या असतील, असे सांगितले. परंतु डॉकेट आयडी आल्यावर तक्रारी रद्द कशा होतील आणि रद्द झाल्या तर शेतकऱ्यांना कळविले का नाही. ही कंपनीने शेतकऱ्याची फसवणूक केली आहे. याकरिता कंपनीला याचे परिणाम भोगावे लागतील."- राहुल पेटकर, उपजिल्हाध्यक्ष, युवा संघर्ष मोर्चा

टॅग्स :wardha-acवर्धाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र