शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

नुकसानाच्या तक्रारीला ५० दिवस लोटले; पंचनाम्याची प्रतीक्षा कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 17:12 IST

पीकविमा कंपनी अधिकाऱ्यांची मनमानी : सोयाबिन पिकांची ९० टक्के झाली काढणी

लोकमत न्यूज नेटवर्क विजयगोपाल: देवळी तालुक्यातील विजयगोपाल महसूल मंडळात ३१ ऑगस्टला अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी या संदर्भात तक्रारीही केल्या. मात्र, याला ५० दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप पंचनामे करण्यात आले नसल्याने शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे. आजघडीला ९० टक्के सोयाबीन पिकाची काढणी झाल्याने कंपनीच्या आणि शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकऱ्यांत तीव्र असंतोष आहे.

शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी व शेतकऱ्यांना झालेल्या पिकाच्या नुकसानभरपाईसाठी प्रधानमंत्री पीकविमा योजना राबविली आहे. शेतकऱ्यांना या योजनेच्या लाभ घेण्यासाठी फक्त एक रुपयात शेतकऱ्यांना विमा काढून दिल्या गेला. वर्धा जिल्यात शासनाकडून आयसीआयसीआय लोम्बर्ड कंपनीने योजनेचे काम घेतले. हजारो शेतकऱ्यांनी हा पीक विमा काढलेला आहे. परंतु विमा काढल्यापासून तक्रार टाकल्यापासून आज जवळपास ५० दिवस झाले. जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांची सोयाबीन काढणी झाली. तरीही शेतकऱ्याच्या शेतात अजूनही पंचनामे झाले नाही, विजयगोपाल महसूल मंडळात ३१ ऑगस्टला अतिवृष्टी झाली होती. १४४ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली. नुकसानाच्या ७२ तासांच्या आत तक्रारी केल्यास २५ दिवसांच्या आत पंचनामे केले जातील, असे सांगण्यात आले होते. परंतु तक्रारी टाकल्यापासून ५० दिवस पूर्ण झाले तरी पंचनामे करण्यात आले नाही. 

मंडळात १२०० तक्रारी विजयगोपाल महसूल मंडळात नुकसान झाल्याच्या १ हजार २०० तक्रारी आल्याचे कंपनीच्या तालुका कार्यालयातून कळविण्यात आले. आतापर्यंत निम्म्या तक्रारीचे पंचनामे झाले असून, अजून जवळपास ६०० ते ७०० तक्रारींचे पंचनामे व्हायचे असल्याचे बोलले जात आहे. एकट्या विजयगोपालमधील २०० पंचनामे बाकी असल्याचे सांगण्यात आले आहे.

"पंचनामे झाले नाही तर तक्रारी रद्द झाल्या असतील किंवा सरासरी सॅम्पल लागले असतील. हे बघून सांगावे लागेल." - वसीम शेख, जिल्हा समन्वयक, आयसीआयसीआय लोम्बार्ड.

"शेतात झालेल्या पीक नुकसानाची १ सप्टेंबरला तक्रार टाकली. अजूनपर्यंत शेतातील पंचनामे झाले नाहीत. माझ्यासारखे अजून २०० शेतकरी आहेत. जर दोन दिवसांत यावर काही तोडगा निघाला नाही तर आम्ही कंपनीविरोधात आंदोलन करू."- अभिलाष धांगे, शेतकरी 

"तुमच्या तक्रारी रद्द झाल्या असतील, असे सांगितले. परंतु डॉकेट आयडी आल्यावर तक्रारी रद्द कशा होतील आणि रद्द झाल्या तर शेतकऱ्यांना कळविले का नाही. ही कंपनीने शेतकऱ्याची फसवणूक केली आहे. याकरिता कंपनीला याचे परिणाम भोगावे लागतील."- राहुल पेटकर, उपजिल्हाध्यक्ष, युवा संघर्ष मोर्चा

टॅग्स :wardha-acवर्धाFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र