शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्त्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
2
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
3
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
4
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
5
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
6
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
7
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
8
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
9
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
10
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
11
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
12
MSRTC: ...तरच जेष्ठ नागरिकांना एसटी तिकिट दरात ५० टक्क्यांची सवलत, नियमात बदल!
13
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?
14
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
15
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
16
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
17
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
18
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
19
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
20
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!

४९,४५८ शेतकरी कुटुंबांची स्वस्त धान्याकरिता भटकंती

By admin | Updated: February 28, 2017 01:12 IST

शासनाच्यावतीने शेतकऱ्यांना स्वस्त धान्य दुकानातून गहू व तांदूळ मिळण्याकरिता विशेष पॅकेज अंतर्गत योजना राबविली.

जिल्ह्याचे आवंटन मंजूर : धान्य दुकानात पोहोचण्याकरिता आणखी काही दिवसांचा विलंब रूपेश खैरी वर्धाशासनाच्यावतीने शेतकऱ्यांना स्वस्त धान्य दुकानातून गहू व तांदूळ मिळण्याकरिता विशेष पॅकेज अंतर्गत योजना राबविली. आजस्थितीत योजनेंतर्गत वितरीत होणारे धान्य दुकानांत नसल्याने ही योजना कागदावर असल्याच्या प्रतिक्रीया उमटत आहे. यामुळे योजनेचे लाभार्थी असलेल्या जिल्ह्यातील तब्बल ४९ हजार ४५८ शेतकरी कुटुंबांची स्वस्त धान्याकरिता वाताहात होत आहे. धान्याकरिता स्वस्त धान्य दुकानात गेलेल्या शेतकऱ्यांना दुकान मालक तुमचे धान्य यायचे आहे, असे म्हणत आल्या पावली परत पाठवितो. हा प्रकार आजचा नाही तर गत दोन ते तीन महिन्यांपासून सुरू आहे. जिल्ह्यातील काही दुकानात तर शेतकरी पॅकेजचे धान्य उपलब्ध नसल्याचे फलक लावले आहे. यामुळे लाभार्थी शेतकरी कुटुंबाची चांगलीच पंचाईत होत आहे. शासनाच्या आदेशानुसार विशेष पॅकेजअंतर्गत शेतकऱ्यांना धान्य पुरविण्याकरिता एकूण ८८८ दुकाने आहेत. या दुकानातून या शेतकऱ्यांना धान्याचा पुरवठा होत आहे. या सर्वच दुकानातून इतर लाभार्थ्यांना धान्य मिळत आहे. मात्र या विशेष पॅकेज योजनेतील लाभार्थी गेल्यास त्याला धान्य नसल्याचे सांगण्यात येते. या योजनेतील धान्यसाठ्याकरिता जिल्हा पुरवठा विभागाकडून मागणी केली होती. ती मागणी नुकतीच मान्य झाली असून त्याची रक्कम भारतीय खाद्य निगमच्या खात्यात जमा करण्याची तयारी पुरवठा विभागाने सुरू केली आहे. आवश्यक रक्कम भरल्यानंतर तत्काळ धान्याचा पुरवठा होईल अथवा नाही, याची शाश्वती नाही. यामुळे योजनेतील धान्याकरिता शेतकरी कुटुंबांना आखणी किती दिवस प्रतीक्षा करावी लागेल हे सांगणे कठीण आहे. ७५० मेट्रिक टन गहू आणि ५०० मेट्रिक टन तांदळाला मंजुरी या योजनेतील लाभार्थ्यांना धान्य मिळावे याकरिता जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आलेल्या मागणीनुसार ७५० मेट्रिक टन गहू आणि ५०० मेट्रिक टन तांदूळ मंजूर झाला आहे. त्याकरिता आवश्यक रक्कम भरण्याची प्रक्रिया पुरवठा विभागाकडून सुरू आहे. रक्कम भरल्यानंतरही हे धान्य किती दिवसात दुकानात पोहोचेल याची शाश्वती नसल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. खाद्य निगममध्ये हमालांचा घोळ रक्कम भरून धान्यसाठा दुकानात पोहोचविण्याचा जिल्हा पुरवठा विभागाचा प्रयत्न करीत आहे; मात्र येथे हमालांची कमतरता असल्याने त्यांच्याकडून गाड्या लोड होण्याकरिता विलंब होण्याची शक्यता आहे. यामुळे रक्कम भरूनही शेतकऱ्यांना तात्काळ धान्य मिळेल याची शाश्वती नसल्याची खंत पुरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. या योजनेत आवश्यक असलेल्या धान्य साठ्याचे आवंटन नुकतेच मंजूर झाले आहे. त्याची रक्कम खाद्य निगमच्या खात्यात भरण्याची तयारी सुरू आहे. रक्कम वळती होताच दुकानात धान्य पोहोचण्याची व्यवस्था होणे अपेक्षित आहे; मात्र खाद्य निगममध्ये हमालांची असलेली कमतरता यात खोड ठरू शकते. यामुळे दुकानात धान्य पोहोचण्याकरिता आणखी किती दिवस लागतील हे सांगणे सध्या कटीण आहे. - अनिल बन्सोड, जिल्हा पुरवठा अधिकारी, वर्धा.