शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

४,५८५ शेतकरी सोयाबीनच्या मदतीला मुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 22:35 IST

साधारणत: शेती कसणारा म्हणजे शेतकरी असे बोलले जाते. व्यवहारात हा प्रकार जरी वास्तविकेशी निगडीत असला तरी शासकीय मदतीचा लाभ घेताना हा प्रकार अडचणीचा ठरत असल्याने पुन्हा एकदा समोर आले आहे.

ठळक मुद्देएक कोटी परत जाणार : विक्री पावती अन् सातबारावरील नावातील तफावतीमुळे गोंधळ

रूपेश खैरी।आॅनलाईन लोकमतवर्धा : साधारणत: शेती कसणारा म्हणजे शेतकरी असे बोलले जाते. व्यवहारात हा प्रकार जरी वास्तविकेशी निगडीत असला तरी शासकीय मदतीचा लाभ घेताना हा प्रकार अडचणीचा ठरत असल्याने पुन्हा एकदा समोर आले आहे. या प्रकारामुळे सोयाबीनच्या क्ंिवटलमागे मिळणाºया २०० रुपयांच्या मदतीपासून जिल्ह्यातील तब्बल ४,५८५ शेतकरी वंचित राहणार असल्याचे दिसून आले आहे.जिल्ह्यातील एवढे सोयाबीन उत्पादक शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार असले तरी या मदतीपोटी जिल्ह्यात आलेल्या एकूण रकमेपैकी १ कोटी रुपये परत जाणार आहे. यामुळे शासनाची ही योजना खºया शेतकऱ्याकरिता कुचकामी ठरत असल्याचे दिसून आले. हा घोळ कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीकरिता वापरलेल्या खºया नावाने पावती बनली आणि सातबारा मात्र दुसऱ्याच्याच नावाने असल्याने हा प्रकार घडल्याचे दिसून आले आहे. यामुळे शेतीत नुकसान सहन करणाºया शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.गत खरीपात सोयाबीन उत्पादकांना मिळालेल्या दरामुळे मोठा फटका बसला. यामुळे अशा शेतकऱ्याना दिलासा मिळावा म्हणून शासनाने बाजारात २५ क्विंटलपर्यंत सोयाबीन विक्री करणाऱ्यांना क्ंिवटलमागे २०० रुपयांची मदत जाहीर केली. ही मदत शेतकºयांना मिळावी याकरिता बाजार समितीकडून याद्या घेत त्याची माहिती शासनाच्या पणन महामंडळाकडे पाठविले.शेतकऱ्यांच्या याद्या तयार करताना सातबारा आणि विक्री पावती यात असलेल्या नावात तफावत असल्याचे दिसून आले. यामुळे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने पणन मंत्रालयाला या संदर्भात मार्गदर्शन मागण्यात आले. यावर त्यांनी ज्यांच्या नावे सातबारा आहे, अशाच शेतकºयांना मदत देण्याच्या सूचना केल्या. यामुळे सातबारा नसलेल्या शेतकऱ्यांच्या नावे रक्कम येवूनही ती त्यांना न मिळता शासन जमा होण्याची वेळ आली आहे. शासनाने पावतींवर नाव असलेल्या शेतकऱ्यांना जर मदत दिली असती तर झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांना मिळाली असती अशा प्रतिक्रीया शेतकऱ्यांकडून मिळत असून याचा विचार होणे गरजेचे आहे.भाषेच्या गोंधळामुळे मदत जमा होण्यास विलंबशेतकºयांच्या याद्या पहिले मराठीत तयार करण्यात आल्या होत्या. या याद्या इंग्रजीतून पाठविण्याच्या सूचना बँकांकडून आल्याने याद्या पुन्हा करण्यात आल्या. यामुळे रक्कम येवूनही ती शेतकºयांच्या खात्यात जमा होण्यास विलंब झाल्याचे सांगण्यात आले.जिल्ह्यात १९,४२६ शेतकऱ्यांकरिता आले होते ६ कोटीशासनाच्या सूचना येताच जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्यावतीने याद्या तयार करण्याचे काम करण्यात आले. प्रत्येक बाजार समितीतून पावत्या आणि शेतकºयांची नावे गोळा करून ती शासनाकडे पाठविली. वर्धा जिल्ह्यातून पाठविण्यात आलेल्या १९ हजार ४२६ शेतकऱ्यांकरिता एकूण ६ कोटी रुपयांची रक्कम मंजूर झाली. मात्र वाटप करताना शासनाकडून सातबाराची अट टाकण्यात आल्याने याचा लाभ १४ हजार ८४१ शेतकºयांनाच मिळणार असल्याचे दिसून आले आहे. या शेतकऱ्यांकरिता ४ कोटी ५४ लाख ८ हजार ८३० रुपये बँकेत पाठविण्यात आले आहे.तीन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कमयाद्यांच्या भाषेचा घोळ आटोपल्यानंतर रक्कम खाते असलेल्या बँकेकडे पाठविण्यात आली. यात आतापर्यंत हिंगणघाट, समुद्रपूर आणि आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. इतर तालुक्यातील शेतकºयांच्या खात्यात मात्र ही रक्कम जमा झाली नाही. यामुळे उर्वरीत पाच तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन मदतीच्या रकमेची प्रतीक्षा कामय आहे.शासनाच्या प्रथम सुचनेनुुसार बाजार समितीत पावत्यांवरील नावाची आणि विक्रीची यादी पाठविण्यात आली. यात पावतीत असलेले नाव आणि सातबारावर असलेल्या नावात तफावत असल्याने या संदर्भात काय करावे असे मार्गदर्शन शासनाला मागविण्यात आले. यावर शासनाने सातबारा महत्त्वाचा असे म्हणत मदत देण्याच्या सुचना केल्या. यानुसार बँकांत रकमा वळत्या करण्यात आल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांच्या नावे सातबारा नव्हता अशा शेतकऱ्यांना या मदतीपासून वंचित रहावे लागले.- ए.बी. कडू, जिल्हा उपनिबंधक, वर्धा.