शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

५ हजार ५०२ शेतकऱ्यांचे ४५.३८ कोटींचे कर्ज माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 05:00 IST

यावर्षी पीक कर्ज वाटपात नव्याने ४ हजार १४२ शेतकरी खातेदार जुळले असून त्यांना ३८.९९ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे यावर्षी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५ हजार ४६ पर्यंत वाढली आहे. त्यांना ५८.९४ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत बँकेतील पात्र लाभार्थ्यांची संख्या २११ असून यापैकी १७९ लाभार्थी शेतकऱ्यांना पावणेदोन कोटींची कर्जमाफी देण्यात आली.

ठळक मुद्दे३,९५० शेतकऱ्यांना ३०.१५ कोटींचे पीककर्ज : ४,१४२ नवे खातेदार

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : तालुक्यात महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत पात्र लाभार्थी शेतकºयांची संख्या ७ हजार ५७७ असून यापैकी ५ हजार ५०२ लाभार्थी शेतकऱ्यांना ४५.३८ कोटीची कर्जमाफी देण्यात आली आहे. तसेच योजनेत कर्जमाफी मिळालेल्या ५ हजार ५०२ शेतकऱ्यांपैकी ३ हजार ९५० शेतकऱ्यांना या हंगामाच्या ३० जुलैपर्यंत ३०.१५ कोटीचे पीककर्ज देण्यात आले आहे. तालुक्यातील १७ बँकापैकी १५ बँकांचे माध्यमातून पीक कर्जाचे वाटप केले जात आहे.तहसील कार्यालय व महाराष्ट्र बँक शाखेत आयोजित पीककर्ज वितरण पीक विमा तसेच महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी आढावा बैठकीत पालकमंत्री सुनील केदार यांना ही माहिती देण्यात आली. यावेळी खासदार रामदास तडस, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार राजेश सरवदे, महाराष्ट्र बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रिया बागडे व अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.यावर्षी पीक कर्ज वाटपात नव्याने ४ हजार १४२ शेतकरी खातेदार जुळले असून त्यांना ३८.९९ कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे यावर्षी पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या ५ हजार ४६ पर्यंत वाढली आहे. त्यांना ५८.९४ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत बँकेतील पात्र लाभार्थ्यांची संख्या २११ असून यापैकी १७९ लाभार्थी शेतकऱ्यांना पावणेदोन कोटींची कर्जमाफी देण्यात आली. कर्जमाफीतील या लाभार्थ्यांपैकी १०२ जणांना नव्याने ८३ लाखांचे पीककर्ज देण्यात आले. तसेच ९५ शेतकऱ्यांना ४८ लाखांचे नवीन पीक कर्जवाटप करण्यात आले. त्यामुळे यावर्षी नवीन व महात्मा ज्योतीराव फुले कर्जमाफी योजनेतील एकूण १९७ शेतकऱ्यांना १ कोटी ६८ लाख ७९ हजारांचे कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती बँक प्रशासनाने पालकमंत्र्यांना दिली.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जSunil Kedarसुनील केदार