शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

समृद्धीत 38 आदिवासींची 42.99 हेक्टर जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2022 05:00 IST

वर्धा जिल्ह्यातून गेलेल्या या ५८ किमीच्या मार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी या महामार्गासाठी वर्धा जिल्ह्यातील तब्बल ३८ आदिवासींची ४२.९९ हेक्टर जमीन घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे आदिवासींची जमीन अधिग्रहित करताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रीतसर परवानगी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. वर्ध्यातील सेलू, वर्धा व आर्वी या तीन तालुक्यांतील ३४ गावांमधून हा महामार्ग गेला आहे. जिल्ह्यातून गेलेल्या या समृद्धी महामार्गाची लांबी ५८ किमी, तर रुंदी १२० मीटर आहे.

ठळक मुद्दे७८२ हेक्टर जमीन अधिग्रहिततीन तालुक्यातून गेलाय ५८ किमीचा महामार्ग

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महासमृद्धी महामार्गासाठी वर्धा जिल्ह्यात एकूण ७८२ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातून गेलेल्या या ५८ किमीच्या मार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी या महामार्गासाठी वर्धा जिल्ह्यातील तब्बल ३८ आदिवासींची ४२.९९ हेक्टर जमीन घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे आदिवासींची जमीन अधिग्रहित करताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रीतसर परवानगी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.वर्ध्यातील सेलू, वर्धा व आर्वी या तीन तालुक्यांतील ३४ गावांमधून हा महामार्ग गेला आहे. जिल्ह्यातून गेलेल्या या समृद्धी महामार्गाची लांबी ५८ किमी, तर रुंदी १२० मीटर आहे. सहा पदरी असलेल्या या महामार्गावर पाच मोठ्या आणि २७ लहान पुलांसह विनाअडथळा वाहतूक होण्यासाठी नऊ उड्डाणपूल तयार करण्यात आले आहेत. शिवाय ३४ भुयारी मार्ग निर्माण करण्यात आलेत. पादचाऱ्यांकरिता १२ भुयारी मार्गांचा समावेश आहे. येळाकेळी व विरूळ येथे इंटरचेंजेसही देण्यात आले आहेत. महामार्गाच्या वाहनांमुळे वन्यप्राणी विचलित होऊ नये, यासाठी दोन ठिकाणी उन्नत मार्ग राहणार आहेत. एकूणच या महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हा प्रवास अतिजलदगतीने तसेच अवघ्या काही तासांतच पूर्ण होणार आहे. त्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांसह नागरिकांना होणार असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

तीन तालुक्यांतून गेलाय समृद्धी महामार्ग-    हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महासमृद्धी महामार्ग हा वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा व आर्वी तालुक्यातून गेलेला आहे. वर्धा तालुक्यातील महाकाळ, पिपरी, पांढरकवडा, गणेशपूर, दिग्रस, झाडगाव, वाठोडा, धामणगाव, डोरली, लोणसावळी तर सेलू तालुक्यातील सेलडोह, खडकी (आ.), धोंडगाव, आमगाव (ख.), केळझर, किन्हाळा, इटाळा, कोटंबा, धानोली (मे.), मोहनापूर, कान्हापूर, गोंदापूर, सुरगाव, वानोडा, केळी, खडकी (बे.) तसेच आर्वी तालुक्यातील बोरी, मानकापूर, रेणकापूर, हुसेनपूर, विरूळ, सावरखेड, निजामपूर, पिंपळगाव या गावांतून हा महामार्ग गेला आहे. वर्धा जिल्ह्यात महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे.

महामार्ग सहापदरी -   वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे ५८ किमीचे काम पूर्ण झाले आहे. या महामार्गाची लांबी ५८ किमी तसेच रुंदी १२० मीटर असून तो दोन-चार नव्हे तर तब्बल सहापदरी आहे. त्यासाठी २ हजार ७६२ कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

समृद्धी मुंबई-नागपूर या महानगरांना जोडणारा-    वर्धा जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील एकूण ७८२ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आलेला हा महामार्ग राज्याची राजधानी असलेल्या मुंबई आणि उपराजधानी असलेल्या नागपूर या महानगरांना जोडणारा आहे.

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग