शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

समृद्धीत 38 आदिवासींची 42.99 हेक्टर जमीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2022 05:00 IST

वर्धा जिल्ह्यातून गेलेल्या या ५८ किमीच्या मार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी या महामार्गासाठी वर्धा जिल्ह्यातील तब्बल ३८ आदिवासींची ४२.९९ हेक्टर जमीन घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे आदिवासींची जमीन अधिग्रहित करताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रीतसर परवानगी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. वर्ध्यातील सेलू, वर्धा व आर्वी या तीन तालुक्यांतील ३४ गावांमधून हा महामार्ग गेला आहे. जिल्ह्यातून गेलेल्या या समृद्धी महामार्गाची लांबी ५८ किमी, तर रुंदी १२० मीटर आहे.

ठळक मुद्दे७८२ हेक्टर जमीन अधिग्रहिततीन तालुक्यातून गेलाय ५८ किमीचा महामार्ग

महेश सायखेडेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महासमृद्धी महामार्गासाठी वर्धा जिल्ह्यात एकूण ७८२ हेक्टर जमीन अधिग्रहित करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्यातून गेलेल्या या ५८ किमीच्या मार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी या महामार्गासाठी वर्धा जिल्ह्यातील तब्बल ३८ आदिवासींची ४२.९९ हेक्टर जमीन घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे आदिवासींची जमीन अधिग्रहित करताना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रीतसर परवानगी घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.वर्ध्यातील सेलू, वर्धा व आर्वी या तीन तालुक्यांतील ३४ गावांमधून हा महामार्ग गेला आहे. जिल्ह्यातून गेलेल्या या समृद्धी महामार्गाची लांबी ५८ किमी, तर रुंदी १२० मीटर आहे. सहा पदरी असलेल्या या महामार्गावर पाच मोठ्या आणि २७ लहान पुलांसह विनाअडथळा वाहतूक होण्यासाठी नऊ उड्डाणपूल तयार करण्यात आले आहेत. शिवाय ३४ भुयारी मार्ग निर्माण करण्यात आलेत. पादचाऱ्यांकरिता १२ भुयारी मार्गांचा समावेश आहे. येळाकेळी व विरूळ येथे इंटरचेंजेसही देण्यात आले आहेत. महामार्गाच्या वाहनांमुळे वन्यप्राणी विचलित होऊ नये, यासाठी दोन ठिकाणी उन्नत मार्ग राहणार आहेत. एकूणच या महामार्गामुळे नागपूर ते मुंबई हा प्रवास अतिजलदगतीने तसेच अवघ्या काही तासांतच पूर्ण होणार आहे. त्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांसह नागरिकांना होणार असल्याचे म्हटल्यास वावगे ठरू नये.

तीन तालुक्यांतून गेलाय समृद्धी महामार्ग-    हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महासमृद्धी महामार्ग हा वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा व आर्वी तालुक्यातून गेलेला आहे. वर्धा तालुक्यातील महाकाळ, पिपरी, पांढरकवडा, गणेशपूर, दिग्रस, झाडगाव, वाठोडा, धामणगाव, डोरली, लोणसावळी तर सेलू तालुक्यातील सेलडोह, खडकी (आ.), धोंडगाव, आमगाव (ख.), केळझर, किन्हाळा, इटाळा, कोटंबा, धानोली (मे.), मोहनापूर, कान्हापूर, गोंदापूर, सुरगाव, वानोडा, केळी, खडकी (बे.) तसेच आर्वी तालुक्यातील बोरी, मानकापूर, रेणकापूर, हुसेनपूर, विरूळ, सावरखेड, निजामपूर, पिंपळगाव या गावांतून हा महामार्ग गेला आहे. वर्धा जिल्ह्यात महामार्गाचे काम पूर्ण झाले आहे.

महामार्ग सहापदरी -   वर्धा जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे ५८ किमीचे काम पूर्ण झाले आहे. या महामार्गाची लांबी ५८ किमी तसेच रुंदी १२० मीटर असून तो दोन-चार नव्हे तर तब्बल सहापदरी आहे. त्यासाठी २ हजार ७६२ कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

समृद्धी मुंबई-नागपूर या महानगरांना जोडणारा-    वर्धा जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील एकूण ७८२ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण करण्यात आलेला हा महामार्ग राज्याची राजधानी असलेल्या मुंबई आणि उपराजधानी असलेल्या नागपूर या महानगरांना जोडणारा आहे.

 

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग